शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
2
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
3
लडाख: गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली, २ जवान शहीद, ३ जण गंभीर जखमी
4
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
5
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
6
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
7
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
8
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
9
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
10
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
11
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
12
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
13
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
14
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
15
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?
16
सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी
17
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
18
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
19
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
20
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत

दोघा नगरसेवकांचेच अधिकृत राजीनामे; बाकी मात्र सोयीचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:58 IST

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या नगरसेवकांचे राजीनाम्याचे पेव फुटले असून आधी भाजपा आणि शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी राजीनामे दिले होते. पाठोपाठ मंगळवारी (दि.१५) शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी म्हणजे उरलेल्या ३४ जणांनी राजीनामे दिल्याने नाशिक महपाालिकेचे राजकारण ढवळून निघाले आहे.

ठळक मुद्देमहापालिकेतील बळ : भाजपा ६५, तर शिवसेनेचे शून्य !

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या नगरसेवकांचे राजीनाम्याचे पेव फुटले असून आधी भाजपा आणि शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी राजीनामे दिले होते. पाठोपाठ मंगळवारी (दि.१५) शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी म्हणजे उरलेल्या ३४ जणांनी राजीनामे दिल्याने नाशिक महपाालिकेचे राजकारण ढवळून निघाले आहे. सध्याची स्थिती बघितली तर भाजपचे ६५ नगरसेवक असून, जर शिवसेनेचे ३४ नगरसेवक आहेत. त्यांनी राजीनामा दिल्याची केवळ घोषणा केली आहे. प्रत्यक्षात त्यांनी प्रत्यक्ष येऊन महापालिकेत राजीनामे दिलेच तर शिवसेनेचे संख्याबळ शून्य होईल अन्यथा राजीनामा केवळ दबावतंत्र आणि सोयीचे राजकारण ठरेल. २०१७ मध्ये झालेल्या मनपा निवडणुकीत ६१ प्रभागातील १२२ जागांपैकी भाजपाला ६६ जागांवर विजय मिळाला, तर शिवसेनेला ३५ जागांवर संधी मिळाली. भाजपचे महापालिकेत पूर्णत: बहुमत आहे. महापालिकेच्या निवडणुका शिवसेना आणि भाजपने स्वबळावर निवडणूक लढविली होती. लोकसभा निवडणुकीनंतर युती करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला असला तरी प्रत्यक्षात दोन उपसभापतिपदे देण्यापलीकडे त्यांना भाजपने स्थान दिले नाही. विधानसभा निवडणुकीत राजीनामा सत्र सध्या सुरू आहे. यात सर्व प्रथम शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी राजीनामा दिला. दातीर नाशिक पश्चिम मतदारसंघातून इच्छुक होते, परंतु ही जागा भाजपकडून सुटणार नाही असे दिसताच त्यांनी निवडणूक लढविण्यासाठी मनसेत प्रवेश केला. त्यानंतर भाजपच्या नाशिकरोड येथील नगरसेविका सरोज आहिरे यांनीदेखील देवळाली मतदारसंघात युतीकडून उमेदवारी न मिळताच राष्टÑवादीत प्रवेश केला.या राजीनाम्यांना अर्थ नाहीशिवसेनेच्या ३४ नगरसेवकांनी राजीनामा देण्याची घोषणा केली असली तरी त्यांनी हे राजीनामे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. महापालिकेच्या अधिनियमातील तरतुदीनुसार प्रत्यक्ष आयुक्तांना भेटून राजीनामे दिले तरच ते अधिकृत मानले जातात. यापूर्वी दिलीप दातीर यांनी आयुक्तांना वॉट््स अ‍ॅपवर राजीनामा दिला होता, मात्र त्यांना कायदेशीर तरतूद स्पष्ट करण्यात आल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष येऊन आयुक्तांकडे राजीनामा सादर केला होता. त्यानंतर भाजपच्या सरोज आहिरे यांनी शहराध्यक्षांकडे राजीनामा दिला, परंतु त्यानंतर त्यांनीही प्रत्यक्ष आयुक्तांकडे येऊन राजीनामा दिला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv Senaशिवसेना