शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

दोघा नगरसेवकांचेच अधिकृत राजीनामे; बाकी मात्र सोयीचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:58 IST

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या नगरसेवकांचे राजीनाम्याचे पेव फुटले असून आधी भाजपा आणि शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी राजीनामे दिले होते. पाठोपाठ मंगळवारी (दि.१५) शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी म्हणजे उरलेल्या ३४ जणांनी राजीनामे दिल्याने नाशिक महपाालिकेचे राजकारण ढवळून निघाले आहे.

ठळक मुद्देमहापालिकेतील बळ : भाजपा ६५, तर शिवसेनेचे शून्य !

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या नगरसेवकांचे राजीनाम्याचे पेव फुटले असून आधी भाजपा आणि शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी राजीनामे दिले होते. पाठोपाठ मंगळवारी (दि.१५) शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी म्हणजे उरलेल्या ३४ जणांनी राजीनामे दिल्याने नाशिक महपाालिकेचे राजकारण ढवळून निघाले आहे. सध्याची स्थिती बघितली तर भाजपचे ६५ नगरसेवक असून, जर शिवसेनेचे ३४ नगरसेवक आहेत. त्यांनी राजीनामा दिल्याची केवळ घोषणा केली आहे. प्रत्यक्षात त्यांनी प्रत्यक्ष येऊन महापालिकेत राजीनामे दिलेच तर शिवसेनेचे संख्याबळ शून्य होईल अन्यथा राजीनामा केवळ दबावतंत्र आणि सोयीचे राजकारण ठरेल. २०१७ मध्ये झालेल्या मनपा निवडणुकीत ६१ प्रभागातील १२२ जागांपैकी भाजपाला ६६ जागांवर विजय मिळाला, तर शिवसेनेला ३५ जागांवर संधी मिळाली. भाजपचे महापालिकेत पूर्णत: बहुमत आहे. महापालिकेच्या निवडणुका शिवसेना आणि भाजपने स्वबळावर निवडणूक लढविली होती. लोकसभा निवडणुकीनंतर युती करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला असला तरी प्रत्यक्षात दोन उपसभापतिपदे देण्यापलीकडे त्यांना भाजपने स्थान दिले नाही. विधानसभा निवडणुकीत राजीनामा सत्र सध्या सुरू आहे. यात सर्व प्रथम शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी राजीनामा दिला. दातीर नाशिक पश्चिम मतदारसंघातून इच्छुक होते, परंतु ही जागा भाजपकडून सुटणार नाही असे दिसताच त्यांनी निवडणूक लढविण्यासाठी मनसेत प्रवेश केला. त्यानंतर भाजपच्या नाशिकरोड येथील नगरसेविका सरोज आहिरे यांनीदेखील देवळाली मतदारसंघात युतीकडून उमेदवारी न मिळताच राष्टÑवादीत प्रवेश केला.या राजीनाम्यांना अर्थ नाहीशिवसेनेच्या ३४ नगरसेवकांनी राजीनामा देण्याची घोषणा केली असली तरी त्यांनी हे राजीनामे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. महापालिकेच्या अधिनियमातील तरतुदीनुसार प्रत्यक्ष आयुक्तांना भेटून राजीनामे दिले तरच ते अधिकृत मानले जातात. यापूर्वी दिलीप दातीर यांनी आयुक्तांना वॉट््स अ‍ॅपवर राजीनामा दिला होता, मात्र त्यांना कायदेशीर तरतूद स्पष्ट करण्यात आल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष येऊन आयुक्तांकडे राजीनामा सादर केला होता. त्यानंतर भाजपच्या सरोज आहिरे यांनी शहराध्यक्षांकडे राजीनामा दिला, परंतु त्यानंतर त्यांनीही प्रत्यक्ष आयुक्तांकडे येऊन राजीनामा दिला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv Senaशिवसेना