शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

दोघा नगरसेवकांचेच अधिकृत राजीनामे; बाकी मात्र सोयीचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:58 IST

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या नगरसेवकांचे राजीनाम्याचे पेव फुटले असून आधी भाजपा आणि शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी राजीनामे दिले होते. पाठोपाठ मंगळवारी (दि.१५) शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी म्हणजे उरलेल्या ३४ जणांनी राजीनामे दिल्याने नाशिक महपाालिकेचे राजकारण ढवळून निघाले आहे.

ठळक मुद्देमहापालिकेतील बळ : भाजपा ६५, तर शिवसेनेचे शून्य !

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या नगरसेवकांचे राजीनाम्याचे पेव फुटले असून आधी भाजपा आणि शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी राजीनामे दिले होते. पाठोपाठ मंगळवारी (दि.१५) शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी म्हणजे उरलेल्या ३४ जणांनी राजीनामे दिल्याने नाशिक महपाालिकेचे राजकारण ढवळून निघाले आहे. सध्याची स्थिती बघितली तर भाजपचे ६५ नगरसेवक असून, जर शिवसेनेचे ३४ नगरसेवक आहेत. त्यांनी राजीनामा दिल्याची केवळ घोषणा केली आहे. प्रत्यक्षात त्यांनी प्रत्यक्ष येऊन महापालिकेत राजीनामे दिलेच तर शिवसेनेचे संख्याबळ शून्य होईल अन्यथा राजीनामा केवळ दबावतंत्र आणि सोयीचे राजकारण ठरेल. २०१७ मध्ये झालेल्या मनपा निवडणुकीत ६१ प्रभागातील १२२ जागांपैकी भाजपाला ६६ जागांवर विजय मिळाला, तर शिवसेनेला ३५ जागांवर संधी मिळाली. भाजपचे महापालिकेत पूर्णत: बहुमत आहे. महापालिकेच्या निवडणुका शिवसेना आणि भाजपने स्वबळावर निवडणूक लढविली होती. लोकसभा निवडणुकीनंतर युती करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला असला तरी प्रत्यक्षात दोन उपसभापतिपदे देण्यापलीकडे त्यांना भाजपने स्थान दिले नाही. विधानसभा निवडणुकीत राजीनामा सत्र सध्या सुरू आहे. यात सर्व प्रथम शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी राजीनामा दिला. दातीर नाशिक पश्चिम मतदारसंघातून इच्छुक होते, परंतु ही जागा भाजपकडून सुटणार नाही असे दिसताच त्यांनी निवडणूक लढविण्यासाठी मनसेत प्रवेश केला. त्यानंतर भाजपच्या नाशिकरोड येथील नगरसेविका सरोज आहिरे यांनीदेखील देवळाली मतदारसंघात युतीकडून उमेदवारी न मिळताच राष्टÑवादीत प्रवेश केला.या राजीनाम्यांना अर्थ नाहीशिवसेनेच्या ३४ नगरसेवकांनी राजीनामा देण्याची घोषणा केली असली तरी त्यांनी हे राजीनामे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. महापालिकेच्या अधिनियमातील तरतुदीनुसार प्रत्यक्ष आयुक्तांना भेटून राजीनामे दिले तरच ते अधिकृत मानले जातात. यापूर्वी दिलीप दातीर यांनी आयुक्तांना वॉट््स अ‍ॅपवर राजीनामा दिला होता, मात्र त्यांना कायदेशीर तरतूद स्पष्ट करण्यात आल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष येऊन आयुक्तांकडे राजीनामा सादर केला होता. त्यानंतर भाजपच्या सरोज आहिरे यांनी शहराध्यक्षांकडे राजीनामा दिला, परंतु त्यानंतर त्यांनीही प्रत्यक्ष आयुक्तांकडे येऊन राजीनामा दिला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv Senaशिवसेना