शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

टोल कंपन्यांकडून मला ऑफर राज ठाकरे यांचा दावा : महाविकास आघाडीत जाणे शक्य नाही

By suyog.joshi | Updated: February 2, 2024 15:52 IST

मुंबई-पुणे महामार्गावर किती पैसे वसूल केले जातात, याबाबत सर्व कागदपत्रे घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्या भेटून त्याचे प्रेझेंटेशन दाखवत आकडेवारी देणार आहे.

नाशिक : टोलला माझा विरोध नसून टोल वसुलीला विरोध आहे, असे सांगत महाविकास आघाडीत जाणे कदापि शक्य नसल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी राज यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना आपल्या शैलीत उत्तरे दिली. टोल वसुलीवर जी कॅश घेतली जाते त्याला माझा विरोध असून, त्यात कोणतीही स्पष्टता नाही.

मुंबई-पुणे महामार्गावर किती पैसे वसूल केले जातात, याबाबत सर्व कागदपत्रे घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्या भेटून त्याचे प्रेझेंटेशन दाखवत आकडेवारी देणार आहे. पैसे टोलवाल्यांच्या खिशात जात आहेत किंवा त्याच्या खिशातील पैसे राजकीय पक्षाच्या फंडात जात असतील तर ते मी सहन करणार नाही. रस्त्यांमध्ये जर खड्डे असतील तर टोल कशासाठी? कोकणातील रस्ता पूर्ण नाही तरी तिथे एक टोल आहे. ट्रान्सहार्बर रोडवर चांगले कॅमेरे, मग टोलवर कॅमेरे बसवा माणूस कशाला पाहिजे? असा उलट प्रश्न विचारत राज्य सरकार आणि खासगी माणसाच्या खिशात किती पैसे जातात, हे बघायला पाहिजे. मलाही टोल कंपन्यांकडून ऑफर आल्या, त्यांना म्हटलं इथेच मारीन, असेही राज यांनी सांगितले.

महागाईवर कोणी बोलत नाही

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राज म्हणाले, दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, इंधन दरवाढीवर कुणी बोलायला तयार नाही. मराठी माणसाला घर नाकारलं त्यावर कुणी बोलत नाही, अशा सर्व राजकीय घडामोडी सुरू आहेत. जेथे बोलायला पाहिजे, तेथे कोणी बोलत नाही, अशी अवस्था झाली आहे.

सत्तेतील गटबाजी दिसत नाही

पक्षातील गटबाजीच्या प्रश्नावर बोलतांना राज म्हणाले, सर्वच पक्षात सध्या गटबाजी आहे. फक्त सत्तेतील गटबाजी दिसत नाही, ती विरोधी पक्षातील दिसते.लोकसभा निवडणूक येत आहे, तेव्हा त्यांच्यातील तडे दिसू लागतील, तसा आमचा उघडा कारभार आहे. काल आमच्या कार्यकर्त्यांना पहिला डोस दिला, त्याचा फरक पडला नाही तर पुन्हा देऊ. ज्यांची पोच नाही त्यांच्या भरवश्यावर निवडणूका लढवणार नाही. दोन चार टाळक्यांच्या भरवशावर निवडणूक लढणार नाही. ५२ पत्त्याचा कॅट किती दिवस पिसणार?

परत उपोषण कशासाठी

मराठा आरक्षणप्रश्नी बोलतांना राज म्हणाले, आरक्षण हा तांत्रिक विषय आहे. सर्व मागण्या मान्य झाल्या, आता परत मनोज जरांगे पाटील यांचे परत उपोषण कशासाठी? असे सांगत हा कुणाच्या राजकीय अजेंड्याचा विषय आहे एकदा विचार व्हायला हवा. मराठा समाजाच्या बांधवांनी याचा विचार केला पाहिजे. आरक्षणाबाबत केंद्रालाच विचार करावा लागला तर त्यांना प्रत्येक राज्यात जावे लागेल असेही राज म्हणाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNashikनाशिक