शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

ऑक्टोबर महिन्यामध्ये  झाला १२६ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 02:52 IST

परतीच्या ऑक्टोबर महिन्याच्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले असून, तीन आठवड्यातच जवळपास १२६ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसाने जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीतही वाढ झाली असली तरी, गेल्या वर्षाच्या तुलनेत हा पाऊस कमीच आहे.  ऑक्टोबर महिन्याच्या पावसाला परतीचा वा अवकाळी पाऊस म्हणूनही संबोधले जाते. 

ठळक मुद्दे पिकांना मोठा फटका : जिल्ह्यात सरासरी १०९ टक्के नोंद

नाशिक : परतीच्या ऑक्टोबर महिन्याच्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले असून, तीन आठवड्यातच जवळपास १२६ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसाने जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीतही वाढ झाली असली तरी, गेल्या वर्षाच्या तुलनेत हा पाऊस कमीच आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पावसाला परतीचा वा अवकाळी पाऊस म्हणूनही संबोधले जाते. नाशिक जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात ९२३ मिलीमीटर पावसाची यापूर्वीची नोंद करण्यात आली असून, यंदा मात्र १ ते २२ ऑक्टोबर दरम्यान ११७२ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. त्याची टक्केवारी १२६ इतकी आहे. जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर दरम्यान वार्षिक पर्जन्यमान १५९२८ मिलीमीटर इतके असून, आजवर १७,४५७ मिलीमीटर इतका म्हणजेच वार्षिक पर्जन्यमानाच्या १०९ टक्के इतकी पावसाची नाेंद झाली आहे. सध्या सुरू असलेला पाऊस परतीचा वा अवकाळी म्हणून ओळखला जात असला तरी, दरवर्षी या पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान होते. शेतकऱ्यांनी जून, जुलैमध्ये पेरणी केलेले पीक ऑक्टोबर महिन्यात काढणीला आलेले असताना पावसामुळे शेतातील पीक झोपते तर ज्यांनी अगोदर काढून ठेवलेले खळ्यावरचे पीक पावसाच्या पाण्यात  भिजून नुकसान होते. दरम्यान, झालेल्या पावसामुले अनेक ठिकाणी शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तत्काल पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त भागातील शेतकर्यांनी केली आहे. तसेच अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून अनेकांना बेघर होण्याची वेल आली असून त्यांचेही पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे.  गेल्या वर्षी जिल्ह्यात १८ ऑक्टोबरपासून हजेरी लावलेल्या अवकाळी पावसाने तब्बल पंधरा दिवस मुक्काम ठोकला होता. त्यामुळे द्राक्ष, मका, सोयाबीन, भात पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. शासनाला पीक पंचनामे करण्याचे आदेश द्यावे लागले होते. यंदादेखील या अवकाळी पावसाने भात, द्राक्ष बागांचे मोठे नुकसान केले आहे.

टॅग्स :Rainपाऊस