शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

ऑक्टोबर महिन्यामध्ये  झाला १२६ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 02:52 IST

परतीच्या ऑक्टोबर महिन्याच्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले असून, तीन आठवड्यातच जवळपास १२६ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसाने जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीतही वाढ झाली असली तरी, गेल्या वर्षाच्या तुलनेत हा पाऊस कमीच आहे.  ऑक्टोबर महिन्याच्या पावसाला परतीचा वा अवकाळी पाऊस म्हणूनही संबोधले जाते. 

ठळक मुद्दे पिकांना मोठा फटका : जिल्ह्यात सरासरी १०९ टक्के नोंद

नाशिक : परतीच्या ऑक्टोबर महिन्याच्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले असून, तीन आठवड्यातच जवळपास १२६ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसाने जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीतही वाढ झाली असली तरी, गेल्या वर्षाच्या तुलनेत हा पाऊस कमीच आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पावसाला परतीचा वा अवकाळी पाऊस म्हणूनही संबोधले जाते. नाशिक जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात ९२३ मिलीमीटर पावसाची यापूर्वीची नोंद करण्यात आली असून, यंदा मात्र १ ते २२ ऑक्टोबर दरम्यान ११७२ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. त्याची टक्केवारी १२६ इतकी आहे. जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर दरम्यान वार्षिक पर्जन्यमान १५९२८ मिलीमीटर इतके असून, आजवर १७,४५७ मिलीमीटर इतका म्हणजेच वार्षिक पर्जन्यमानाच्या १०९ टक्के इतकी पावसाची नाेंद झाली आहे. सध्या सुरू असलेला पाऊस परतीचा वा अवकाळी म्हणून ओळखला जात असला तरी, दरवर्षी या पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान होते. शेतकऱ्यांनी जून, जुलैमध्ये पेरणी केलेले पीक ऑक्टोबर महिन्यात काढणीला आलेले असताना पावसामुळे शेतातील पीक झोपते तर ज्यांनी अगोदर काढून ठेवलेले खळ्यावरचे पीक पावसाच्या पाण्यात  भिजून नुकसान होते. दरम्यान, झालेल्या पावसामुले अनेक ठिकाणी शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तत्काल पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त भागातील शेतकर्यांनी केली आहे. तसेच अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून अनेकांना बेघर होण्याची वेल आली असून त्यांचेही पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे.  गेल्या वर्षी जिल्ह्यात १८ ऑक्टोबरपासून हजेरी लावलेल्या अवकाळी पावसाने तब्बल पंधरा दिवस मुक्काम ठोकला होता. त्यामुळे द्राक्ष, मका, सोयाबीन, भात पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. शासनाला पीक पंचनामे करण्याचे आदेश द्यावे लागले होते. यंदादेखील या अवकाळी पावसाने भात, द्राक्ष बागांचे मोठे नुकसान केले आहे.

टॅग्स :Rainपाऊस