शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

‘...ऐ मौत तुने मुझे जमींदार कर दिया’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 17:42 IST

त्यांच्या निधनाने सोशलमिडियाही गहिवरला असून नेटिझन्सकडून इंदोरी यांना श्रध्दांजली अर्पण करत त्यांचे विविध शायरी सचित्र पोस्ट करण्यात आली.

ठळक मुद्देनेटिझन्सकडून इंदोरी यांना श्रध्दांजली अर्पण कधी न भरून येणारी हानी झाली, असे उर्दूप्रेमींनी म्हटले

नाशिक : दो गज जमी ही सही, ये मेरी मिलकीयत तो हैं, ए मौत, तुने मुझे जमींदार कर दिया...!

मैं जब मर जाऊं, तो मेरी अलग पहचान लिख देना, लहु से मेरी पेशानी पें हिन्दुस्तान लिख देना...!

अब ना मैं हुं, ना बाकी हैं जमाने मेरे फिर भी मशहूर हैं शहरो मे फसाने मेरे...! अशा एकापेक्षा एक सरस उर्दू शेरोशायरीची आगळीवेगळी कला आत्मसात असलेले देशाचे श्रेष्ठ शायर व गीतकार डॉ. राहत रफ्तुल्लाह कुरैशी उर्फ इंदौरी (७०) यांचे मंगळवारी (दि.११) संध्याकाळी अचानकपणे निधन झाल्याची वार्ता आली आणि सर्वत्र शोककळा पसरली. शहरातील उर्दूप्रेमींसह इंदौरी यांच्या चाहत्यांनी कधी न भरून येणारी हानी झाली असे म्हटले आहे.वर्तमानस्थितीवर विशेष करून रचना सादर करणारे राहत यांचा चाहतावर्ग मोठा आहे. ते सुरूवातीला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीला होते; मात्र त्यांना शायरी स्वस्थ बसू देत नव्हती. कालंतराने ते मुशायऱ्यांकडे वळले आणि भारताचे मोठे शायर म्हणून नावारूपाला आले. देशासह परदेशांमध्येही त्यांची ख्याती पसरली होती. त्यांच्या निधनाने सोशलमिडियाही गहिवरला असून नेटिझन्सकडून इंदोरी यांना श्रध्दांजली अर्पण करत त्यांचे विविध शायरी सचित्र पोस्ट करण्यात आली.इंदौरी हे एक सुप्रसिध्द उर्दू कवी होते. त्यांनी गझल सादर करण्याची एक वेगळी शैली, देहबोली आत्मसात केलेली होती. त्यांच्या निधनाने उर्दू साहित्यक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. ते वर्तमानावर परखडपणे शायरी करणारे शायर होते. - नासिर शकेब, ज्येष्ठ शायर, नाशिकराहतसाहेबांची गझल सादर करण्याची अदा सगळ्यात श्रेष्ठ होती. शायरीच्या सादरीकरणाची अफलातून कला त्यांच्याकडे उपजत होती. मागील पन्नास वर्षांमध्ये अशाप्रकारची कला कोणत्याही शायरकडे पहावयास मिळाली नाही. प्रखर देशभक्तीपर शायरी इंदोरी साहेबांनी लिहीलेली आहे. राहत साहेबांच्या निधनाने उर्दू साहित्यक्षेत्राची मोठी हानी झाली आहे. -अ‍ॅड. नंदकिशोर भुतडा, उर्दूप्रेमीउर्दू साहित्याच्या सेवेत इंदोरी साहेबांनी संपुर्ण आयुष्य वेचले. त्यांच्या आवाजात एक जादू होती ती, मुशायºयात सहज दिसून येत असे. त्यांचे भारतावरील प्रेम देशभक्तीपर शायरीतून दिसून येते. ‘कभी-कभी तो कोई मौत को तरसता हैं, किसी-किसीको अचानक खुदा बुलाता हैं...’ - इरशाद वसीम, शायरराहत साहेब मुशाय-याचे ‘बादशाह’ होते. त्यांच्या निधनाने मोठी हानी झाली. त्यांनी नेहमीच निरपेक्ष व निडर होऊन आपले विचार शायरीद्वारे जनतेपर्यंत पोहोचविले. त्यांची मागील चाळीस वर्षांपासून शायरीच्या मंचावर सत्ता होती. त्यांच्या शायरीद्वारे ते नेहमीच आठवणीत राहतील. त्यांनी आपले उभे आयुष्य उर्दू शायरीला दिले.-रईसा खुमार, शायर, नाशिक

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशNashikनाशिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस