शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

‘...ऐ मौत तुने मुझे जमींदार कर दिया’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 17:42 IST

त्यांच्या निधनाने सोशलमिडियाही गहिवरला असून नेटिझन्सकडून इंदोरी यांना श्रध्दांजली अर्पण करत त्यांचे विविध शायरी सचित्र पोस्ट करण्यात आली.

ठळक मुद्देनेटिझन्सकडून इंदोरी यांना श्रध्दांजली अर्पण कधी न भरून येणारी हानी झाली, असे उर्दूप्रेमींनी म्हटले

नाशिक : दो गज जमी ही सही, ये मेरी मिलकीयत तो हैं, ए मौत, तुने मुझे जमींदार कर दिया...!

मैं जब मर जाऊं, तो मेरी अलग पहचान लिख देना, लहु से मेरी पेशानी पें हिन्दुस्तान लिख देना...!

अब ना मैं हुं, ना बाकी हैं जमाने मेरे फिर भी मशहूर हैं शहरो मे फसाने मेरे...! अशा एकापेक्षा एक सरस उर्दू शेरोशायरीची आगळीवेगळी कला आत्मसात असलेले देशाचे श्रेष्ठ शायर व गीतकार डॉ. राहत रफ्तुल्लाह कुरैशी उर्फ इंदौरी (७०) यांचे मंगळवारी (दि.११) संध्याकाळी अचानकपणे निधन झाल्याची वार्ता आली आणि सर्वत्र शोककळा पसरली. शहरातील उर्दूप्रेमींसह इंदौरी यांच्या चाहत्यांनी कधी न भरून येणारी हानी झाली असे म्हटले आहे.वर्तमानस्थितीवर विशेष करून रचना सादर करणारे राहत यांचा चाहतावर्ग मोठा आहे. ते सुरूवातीला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीला होते; मात्र त्यांना शायरी स्वस्थ बसू देत नव्हती. कालंतराने ते मुशायऱ्यांकडे वळले आणि भारताचे मोठे शायर म्हणून नावारूपाला आले. देशासह परदेशांमध्येही त्यांची ख्याती पसरली होती. त्यांच्या निधनाने सोशलमिडियाही गहिवरला असून नेटिझन्सकडून इंदोरी यांना श्रध्दांजली अर्पण करत त्यांचे विविध शायरी सचित्र पोस्ट करण्यात आली.इंदौरी हे एक सुप्रसिध्द उर्दू कवी होते. त्यांनी गझल सादर करण्याची एक वेगळी शैली, देहबोली आत्मसात केलेली होती. त्यांच्या निधनाने उर्दू साहित्यक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. ते वर्तमानावर परखडपणे शायरी करणारे शायर होते. - नासिर शकेब, ज्येष्ठ शायर, नाशिकराहतसाहेबांची गझल सादर करण्याची अदा सगळ्यात श्रेष्ठ होती. शायरीच्या सादरीकरणाची अफलातून कला त्यांच्याकडे उपजत होती. मागील पन्नास वर्षांमध्ये अशाप्रकारची कला कोणत्याही शायरकडे पहावयास मिळाली नाही. प्रखर देशभक्तीपर शायरी इंदोरी साहेबांनी लिहीलेली आहे. राहत साहेबांच्या निधनाने उर्दू साहित्यक्षेत्राची मोठी हानी झाली आहे. -अ‍ॅड. नंदकिशोर भुतडा, उर्दूप्रेमीउर्दू साहित्याच्या सेवेत इंदोरी साहेबांनी संपुर्ण आयुष्य वेचले. त्यांच्या आवाजात एक जादू होती ती, मुशायºयात सहज दिसून येत असे. त्यांचे भारतावरील प्रेम देशभक्तीपर शायरीतून दिसून येते. ‘कभी-कभी तो कोई मौत को तरसता हैं, किसी-किसीको अचानक खुदा बुलाता हैं...’ - इरशाद वसीम, शायरराहत साहेब मुशाय-याचे ‘बादशाह’ होते. त्यांच्या निधनाने मोठी हानी झाली. त्यांनी नेहमीच निरपेक्ष व निडर होऊन आपले विचार शायरीद्वारे जनतेपर्यंत पोहोचविले. त्यांची मागील चाळीस वर्षांपासून शायरीच्या मंचावर सत्ता होती. त्यांच्या शायरीद्वारे ते नेहमीच आठवणीत राहतील. त्यांनी आपले उभे आयुष्य उर्दू शायरीला दिले.-रईसा खुमार, शायर, नाशिक

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशNashikनाशिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस