शहरं
Join us  
Trending Stories
1
जून ते सप्टेंबर ९९टक्के पाऊस; कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज
2
लग्नमंडपात पसरली शोककळा; मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू, 15 जखमी
3
मध्यरात्री लपून झाडांची कत्तल केल्याप्रकरणी पाेलिसांकडून पुण्यातील गेरा बिल्डरवर गुन्हा
4
आजचे राशीभविष्य: सरकारी लाभ, यश-कीर्ती वृद्धी; पद-प्रतिष्ठा वाढ, सुखकारक दिवस
5
Exit Polls चा परिणाम : आज 'मोदी स्टॉक्स'मध्ये दिसू शकते तेजी, काय म्हणताहेत एक्सपर्ट्स? जाणून घ्या
6
'या' चार राज्यांमध्ये मोठा उलटफेर होणार; भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता
7
"मला T20 World Cup बघायचाही नाही, जेव्हा मी...", रियान परागचं अनोखं विधान
8
प्रदोष शिवरात्रीचा शुभ संयोग: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता
9
पंचग्रही अद्भूत शुभ योग: ७ राशींना लाभ, लॉटरीची संधी; राजकारण्यांना यश, इच्छापूर्तीचा काळ!
10
मे महिन्यात देशभरात उष्माघाताचे ४६ बळी; तीन महिन्यांत ५६ मृत्यू, महाराष्ट्रात ११ जण मृत्युमुखी
11
पंचग्रही योग: ‘या’ ५ मूलांकांना सुख-समृद्धी काळ, धनलाभाची संधी; पद-पैसा वृद्धी, शुभ होईल!
12
अरुणाचलमध्ये भाजपच; सिक्कीम ‘एसकेएम’चेच; दोन राज्यांमधील विधानसभा निवडणूक
13
शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची उमेदवारी नक्की कोणाला?
14
WI vs PNG : हलक्यात घेऊन चालणार नाही! नवख्या संघानं वेस्ट इंडिजला घाम फोडला, कसाबसा सामना जिंकला
15
बॉम्बच्या धमकीमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, पॅरिसहून येणाऱ्या विमानात मिळाली चिठ्ठी
16
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे तिहार तुरुंगात आत्मसमर्पण
17
जोकोविचला पाच सेटपर्यंत करावा लागला संघर्ष, रॉजर फेडररच्या विक्रमाशी केली बरोबरी
18
अभिनेत्री रवीना टंडनसह ड्रायव्हरला संतप्त जमावाची मारहाण
19
उद्योगपती गौतम अदानी भारतात सर्वात श्रीमंत, जगात सर्वाधिक श्रीमंतांकडे किती संपत्ती? 
20
अनिल परब आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

आदिवासी लाभार्थींची वाढणार संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 12:19 AM

नाशिक : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाºया आदिवासी योजनांसाठी आवश्यक असलेल्या जातप्रमाणपत्राचा अडथळा आता दूर झाला असून, केवळ जातीच्या दाखल्यावर त्यांना जिल्हा परिषदेच्या आदिवासी योजनांसाठी अर्ज करता येणार आहे. यामुळे यापुढील काळात आदिवासी विभागातील लाभार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जातप्रमाणपत्राच्या अटीमुळे लाभार्थींचे प्रमाण काहीसे कमी झाले होते.

ठळक मुद्देअडसर दूर : जातपडताळणीची अट शिथिलजिल्हा परिषदेच्या आदिवासी योजनांसाठी अर्ज करता येणार

नाशिक : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाºया आदिवासी योजनांसाठी आवश्यक असलेल्या जातप्रमाणपत्राचा अडथळा आता दूर झाला असून, केवळ जातीच्या दाखल्यावर त्यांना जिल्हा परिषदेच्या आदिवासी योजनांसाठी अर्ज करता येणार आहे. यामुळे यापुढील काळात आदिवासी विभागातील लाभार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जातप्रमाणपत्राच्या अटीमुळे लाभार्थींचे प्रमाण काहीसे कमी झाले होते.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आदिवासींसाठी राबविण्यात येणाºया अनेक योजनांसाठी राज्य शासनाने जात प्रमाणपत्र पडताळणीची अट घातली होती. परंतु अनेकांकडे जात पडताळणीचे प्रमाणपत्रच उपलब्ध नसल्याने आदिवासी योजनांसाठीचे अर्ज करण्याचे प्रमाणे कमी झाले होते. या जाचक अटींमुळे आदिवासी बांधव योजनांपासून दुरावत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आदिवासी नेत्यांनी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा आणि मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतलीहोती.आदिवासी भागातील एस.सी, एस.टी. संवर्गातील नागरिकांना जातीचे दाखले देण्यात आले असले तरी जातप्रमाणपत्र पडताळणीचे दाखले केवळ निवडणूक आणि शैक्षणिक कामासाठीच देण्याची तरतूद आहे. त्यामुळे योजनांसाठी पडताळणीचे दाखलेच दिले जात नसल्याने आदिवासी बांधवांपुढे मोठी अडचण निर्माण झाली होती.शासनाच्या महत्त्वकांक्षी विहीर खोदण्याच्या योजनेसाठीही यामुळे अर्ज करण्याची संख्या अवघे दहा टक्के इतकीच होती. सदर बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर आता जात प्रमाणपत्राची अट शिथिल करण्यात आली असून, तसा अद्यादेश शासनाने गेल्या शनिवारी काढला. त्यानुसार आता शाळा सोडल्याचा दाखला किंवा कुटुंबातील रक्ताच्या नात्यातील प्रमाणपत्र ग्राह्ण धरण्यात येणार आहे. त्यामुळे आदिवासी योजनेच्या मागील अडसर दूर झाल्याने यापुढील काळात योजनेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. लाभार्थी वंचितजिल्हा परिषदेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना विहीर बांधण्यासाठी देण्यात येणाºया आर्थिक लाभासाठी अर्ज केलेल्यांची प्रकरणे फेटाळण्यात आल्याने अनेकांचा हिरमोड झाला होता, तर प्रमाणपत्र योजनेच्या कामासाठी मिळत नसल्यानेदेखील मोठी अडचण निर्माण झाली होती. आता जात प्रमाणपत्राची अट शिथिल करण्यात आल्यामुळे योजनेपासून वंचित राहिलोल्यांना दिलासा मिळणार आहे. यापूर्वी या योजनेसाठी अर्ज केलेल्यांची प्रकरणेदेखील ग्राह्ण धरली जाणार आहेत.