शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
5
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
8
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
9
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
10
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
11
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
12
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
13
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
14
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
15
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
16
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
17
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
18
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
19
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
20
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 

शिक्षक पात्रताधारकांचा आकडा लाखावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 18:50 IST

मालेगाव : राज्यात शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा राज्यात यावर्षी १९ जानेवारी घेण्यात आली. परीक्षेचा निकाल ५ आॅगस्ट रोजी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. शिक्षक पात्रताधारकांचा आकडा लाखावर गेला असतांना पात्र उमेदवारांना मात्र नोकरीची प्रतिक्षा लागून आहे.

ठळक मुद्देटीईटी परीक्षा : सर्व उमेदवारांना नोकरीची प्रतिक्षा

मालेगाव : राज्यात शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा राज्यात यावर्षी १९ जानेवारी घेण्यात आली. परीक्षेचा निकाल ५ आॅगस्ट रोजी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. शिक्षक पात्रताधारकांचा आकडा लाखावर गेला असतांना पात्र उमेदवारांना मात्र नोकरीची प्रतिक्षा लागून आहे.परीक्षेत पेपर १ व २ करिता ३ लाख ४३ हजार २८४ उमेदवार सहभागी झाले होते. यामधून पेपर एकचे १० हजार ४८७ उमेदवार तर पेपर दोनचे ६ हजार १०५ उमेदवार पात्र झाले आहेत. २०१३ पासून ते २०२० पर्यंत एकूण सहा वेळा टीईटी परीक्षा घेण्यात आली आहे. यातून ८६ हजार २९८ परीक्षार्थी पात्र झाले आहेत. या संदर्भात उर्दू शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस साजिद निसार अहमद म्हणाले की, राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या पात्रता परीक्षेत एकूण ८६ हजार तर केंद्रीय पात्रता परीक्षेत २० हजारच्या आसपास उमेदवार पात्र झाले आहेत. हा आकडा १ लाखाच्या वर असून सर्व उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यासाठी शासनाने तातडीने शिक्षकांची भरती करणे गरजेचे आहे. उर्वरित शिक्षक भरती प्रक्रि या सुरू करावी यासह अन्य मागण्यासाठी उर्दु शिक्षक संघातर्फे १ जूलैपासून राहत्या घरी गेल्या ४१ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. राज्यात २०१३ या वर्षाच्या टीईटी परीक्षेत ३१ हजार ७२ उमेदवार पात्र झाले होते. यातील काही उमेदवारांना अद्याप नोकरी मिळाली नाही आणि या वर्षाच्या सप्टेंबरमध्ये त्यांचे प्रमाणपत्राची मुदत संपत आहे. याबाबतीत तत्काळ निर्णय घेऊन न्याय द्यावा, तसेच पवित्र प्रणाली मार्फत सुरू असलेली भरती पूर्ण करावी , अशी मागणी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.चौकट :पात्र शिक्षक असे आहेत२०१३ - ३१,०७२२०१५ - ९५९५२०१७ - १०३३७३२०१८ - ९६७७२०२० - १६५९२

टॅग्स :examपरीक्षाTeacherशिक्षक