शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

कालवा समितीच्या बैठका जिल्ह्यांतच होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 20:32 IST

नाशिक : धरणांमधून शेतीसाठी सोडण्यात येणारी आवर्तने तसेच शहरी भागातील पाणीपुवरवठ्याच्या नियोजनासंदर्भातील बैठका आता पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्या-त्या जिल्ह्यातच होणार ...

नाशिक : धरणांमधून शेतीसाठी सोडण्यात येणारी आवर्तने तसेच शहरी भागातील पाणीपुवरवठ्याच्या नियोजनासंदर्भातील बैठका आता पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्या-त्या जिल्ह्यातच होणार आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील या संदर्भातील निर्णय लवकरच जाहीर करतील, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.नाशिक जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.१८) जिल्हा नियोजन भवन येथे पार पडली. यावेळी झालेल्या चर्चेप्रसंगी आमदार माणिकराव कोकाटे यांनी कालवा समितीच्या बैठकांमध्ये स्थानिक आमदारांना विचारात घेऊन त्यांची भूमिका जाणून घेणे महत्त्वाचे असते. असे सांगतानाच जलसंपदामंत्र्यांकडे मुंबईत बैठक घेतली जात असल्याने ही पद्धत बदलली पाहिजे, अशी मागणी केली होती. त्यानुसार पालकमंत्री भुजबळ यांनी या संदर्भातील निर्णय लवकरच जाहीर होणार असल्याचे सांगताना पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीची बैठक घेण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले.जिल्ह्याच्या पाणी नियोजनासंदर्भात यापूर्वी मुंबईत जलसंपदामंत्र्यांकडे बैठका घेण्यास सुरुवात झालेली होती. तसा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. परंतु आता लवकरच या संदर्भातील फेर आदेश निघणार असून, जिल्ह्याच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालीच अशा बैठकांना पुन्हा सुरुवात होईल, अशी शक्यता भुजबळ यांनी वर्तविली.दरम्यान, पाणी नियोजनासंदर्भातील अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आमदारांचा सहभाग आणि भूमिका महत्त्वाची असल्याने आमदरांनाच कालवा समितीचे अध्यक्षपद मिळावे, अशी मागणीदेखील काही आमदारांनी यावेळी केली. जिल्ह्याच्या पाणी नियोजनासंदर्भात पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा यापूर्वीचा अनुभव आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणीच अशा बैठका होणार घेण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणारा आहे.

टॅग्स :NashikनाशिकDamधरण