शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त विद्यापीठात ‘इंद्रधनुष्य’ युवक महोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 19:09 IST

नाशिक : विद्यापीठीय युवक महोत्सवात सादर होणाऱ्या सांस्कृतिक सोहळ्यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक होऊन त्यांना कलाक्षेत्राची दरवाजे खुले व्हावे यासाठी ...

ठळक मुद्देमुक्त विद्यापीठ: माजी कुलगुरू वेळूकर यांच्या हस्ते उद्घाटन

नाशिक: विद्यापीठीय युवक महोत्सवात सादर होणाऱ्या सांस्कृतिक सोहळ्यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक होऊन त्यांना कलाक्षेत्राची दरवाजे खुले व्हावे यासाठी असे महोत्सव व्यावसायिक दर्जाचे होणे अपेक्षित आहे. सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन मध्यप्रदेशातील जी.एच. रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू तथा मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांनी केले.विद्यापीठाच्या प्रांगणातील दादासाहेब फाळके सभागृहात आयोजित १६ व्या महाराष्टÑ राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य २००८’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन होते. व्यासपीठावर आमदार देवयानी फरांदे, मुंबईतील नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा.डॉ. शशी वंजारी, ुमंबई राजभवन प्रतिनिधी व परीक्षण समिती अध्यक्ष डॉ. प्रमोद पाबरेकर, सदस्य अनिल कुलकर्णी, ईश्वर मोटुर्ले, वित्त समिती अध्यक्ष प्रा. संजय चाकणे, वित्त समिती सदस्य सचिन मांडवगणे, डॉ. परिमल फडके, शिलारे, मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्राच्या संचालिका प्रा. डॉ. विजया पाटील उपस्थित होत्या.यावेळी वेळूकर म्हणाले, आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य ही कुठलीही स्पर्धा नाही तर हा विद्यापीठात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा उत्सव आहे. त्यामुळे या उत्सव एक आनंद सोहळा झाला पाहिजे. १९८७ मध्ये तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांच्या कार्यकाळात हा युवक महोत्सव सुरू झाला. या महोत्सवातून अनेक कलावंत उदयास आले आहेत. परंतु आता या महोत्सवाला अधिक व्यापक रंग देण्याची गरज असून व्यासासिकतेचे स्वरूप दिल्यास महोत्सवाचे महत्व अधिक वाढेल असे वेळूकर म्हणाले.अध्यक्षीय भाषणात ई. वायुनंदन यांनी नाशिक हे धार्मिक, अध्यात्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृट्या मोठा वारसा लाभलेले शहर असल्याचे म्हटले. आता नाशिक शहर हे शैक्षणिकदृष्ट्या देखील प्रगत होत असल्याने नाशिकची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अशाप्रकारच्या महोत्सवामुळे विद्यापीठांचे महत्व देखील अधिक वाढेल असे कुलगुरू म्हणाले.आमदार फरांदे यांनी शिक्षणाप्रमाणेच सांस्कृतिक कार्यक्रम आणि कलागुणांच्या सादरीकरणामुळे देखील आपल्या व्यक्तीमत्वाला वेगळे महत्व प्राप्त होत असते. आपल्या कलांचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांमधील दुसरीबाजूही समोर येते आणि त्यांच्या करियरसाठी कलागुण देखील वेगळे वळण देऊ शकतात असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी ठाकरसी विद्यापीठाच्या कुलगूुरू वंजारी यांनीही भाषण केले.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण