शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
3
लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
4
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
5
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
6
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
7
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
8
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
9
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
10
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
13
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
14
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
15
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
16
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
17
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
18
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
19
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
20
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...

‘परीक्षा’ आंदोलकांची मग ‘संरक्षण’ कुणाला? (विश्लेषण)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 17:27 IST

आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळांमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाºयांसाठी विशेष भरती असतांना सर्वांसाठी भरतीची जाहिरात काढून परीक्षा घेणाºया आदिवासी विकास ...

आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळांमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाºयांसाठी विशेष भरती असतांना सर्वांसाठी भरतीची जाहिरात काढून परीक्षा घेणाºया आदिवासी विकास विभागाविरोधात एल्गार पुकारलेल्या रोजंदारीवरील कामगारांचे बंड मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर शांत झाले. परीक्षा केंद्र ताब्यात घेऊन टोकाची आक्रमकता दाखविणाºया आंदोलकांनी पुढच्याच दिवशी आपले ‘बिºहाड’ गुंडाळले.परीक्षेला विरोध करीत ही संपुर्ण प्रक्रियाच नियमबाह्य असल्याचे सांगत आगोदर रोजंदारी व तासिका कर्मचाºयांची भरतीप्रक्रिया राबवावी अशी मागणी करीत राज्यभरातील सुमारे अडीच हजार रोजंदारीवरील कामगार रस्त्यावर उतरले होते. कोणत्याही क्षणी मोठा उद्रेक होऊ शकेल आणि कायदा सुव्यवस्था नियंत्रणात आणणे कठीण होऊ शकते असे खुद्द पोलीस यंत्रणेलाही वाटत असल्याने रोजंदारी कर्मचाºयांचे बिºहाड आंदोलन निर्णायकच होईल अशी काहीशी आशावादी परिस्थिती निर्माण झाली होती. किंबहूना याच अपेक्षेने पायी निघालेल्या मोर्चेकºयांच्या डोळ्यात शाश्वतीची आस होती. परीक्षा केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी गमिनी काव्याचा वापर करीत प्रसंगी पोलिसांशीही दोन हात करण्यास मागेपुढे न पाहाणाºया आंदोलकांचा रौद्रावतार अशा शाश्वतीला बळ देणारा होता.कोणत्याही अधिकाºयांशी किंवा आदिवासी मंत्र्यांशी न बोलता थेट मुख्यमंत्री बोलले तरच परीक्षा केंद्राचा ताबा सोडला जाईल अशी ठाम गर्जना केल्याने आता परीक्षा रद्द होतील, रोजंदारी कर्मचाºयांच्या भरतीचा मार्ग मोकळा होईल असे वाटत असतांना मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर तर सारे वातरवरणच बदलून गेले. रोजंदारीवरील कर्मचाºयांच्या नोकरीला संरक्षण दिले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन आंदोलनकर्त्यांना इतके शाश्वत का वाटले हे अद्यापही समजलेले नाही. कोणतेही लेखी उत्तर, कोणताही दिलासा देणारे पत्र नसतांनाही आंदोलक मागे फिरले असतील तर हा राजकीय विजय आणि आंदोलनाचा पराजय मानायचे का?ज्या भरतीला आंदोलकांचा विरोध होता त्या भरतीसाठीच आता आंदोलकांनी अर्ज दाखल केले आहेत. याचाच अर्थ भरतीप्रक्रिया आबाधित राहिली आणि त्याच प्रक्रियेतून सर्वांना यावे लागेल हे अधोरेखीत होऊन गेले. मग हा सारा खटाटोप करून आंदोलकांच्या हाती काय पडले हा प्रश्न उरतोच. बरं या साºया प्रकारात मुख्यमंत्र्यांनी आदिवासी विभागाच्या कोणत्याही प्रक्रिेयेला चुकीचे म्हटलेले नाही. त्यामुळे विभागाला क्लिनचिट मिळालीच शिवाय या चर्चेतून अधिकाºयांना बाजुला ठेवण्यातही मुख्यमंत्र्यांना यश आले असेच म्हणावे लागेल. मुख्यमंत्री महोदयांनी रोजंदारी कर्मचाºयांवर अन्याय होणार नाही त्यांच्या नोकरीला संरक्षण दिले जाईल असे आश्वासन देतांनाच भरती परीक्षेच्या गुणदानमध्ये भरघोस सुट देण्याचे सांगून परीक्षा दयावी लागेल हेही मान्य करवूनच घेतले. त्यामुळे ‘परीक्षा’ आंदोलकांची मग ‘संरक्षण’ कुणाला? या प्रश्नाचे उत्तर येणाºया काळात मिळेल, परंतु त्यावेळी वेळ गेलेली असेल. कारण डीबीटी आंदोलनाच्याबाबतीच अगदी असाच क्रमवार प्रसंग घडला होता आणि शेवटी डीबीटी लागू झाले होते.

 

टॅग्स :NashikनाशिकTrible Development Schemeआदिवासी विकास योजना