शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

आता पाणीपट्टीही वाढणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:59 AM

नाशिक : महापालिकेने मिळकत करांमध्ये ३३ ते ८२ टक्क्यांपर्यंत दरवाढ करत नाशिककरांना दणका दिल्यानंतर आता पाणीपट्टी दरातही वाढ करण्याची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. प्रामुख्याने, महावितरण कंपनीच्या धर्तीवर टेलिस्कोपी पद्धतीने पाणीपट्टीची आकारणी केली जाण्याची शक्यता असून, त्यामुळे पाण्याच्या अनिर्बंध वापराला चाप बसू शकतो. दरम्यान, महापालिकेने खासगी संस्थेमार्फत केलेल्या पाणी लेखापरीक्षणाच्या अहवालानुसार, ४४.५० टक्के पाण्याचा हिशेबच लागत नसल्याने या हिशेबबाह्य पाण्याच्या वापरावरही मर्यादा आणण्याच्या दृष्टीने उपाययोजना केली जाण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमहापालिका : महावितरणच्या धर्तीवर टेलिस्कोपी पद्धतीने आकारणी शक्यहिशेबबाह्य पाण्याच्या वापरावरही मर्यादा आणण्याच्या दृष्टीने उपाययोजना केली जाण्याची शक्यताआयुक्तांकडून कठोर उपाययोजनेचे संकेत

नाशिक : महापालिकेने मिळकत करांमध्ये ३३ ते ८२ टक्क्यांपर्यंत दरवाढ करत नाशिककरांना दणका दिल्यानंतर आता पाणीपट्टी दरातही वाढ करण्याची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. प्रामुख्याने, महावितरण कंपनीच्या धर्तीवर टेलिस्कोपी पद्धतीने पाणीपट्टीची आकारणी केली जाण्याची शक्यता असून, त्यामुळे पाण्याच्या अनिर्बंध वापराला चाप बसू शकतो. दरम्यान, महापालिकेने खासगी संस्थेमार्फत केलेल्या पाणी लेखापरीक्षणाच्या अहवालानुसार, ४४.५० टक्के पाण्याचा हिशेबच लागत नसल्याने या हिशेबबाह्य पाण्याच्या वापरावरही मर्यादा आणण्याच्या दृष्टीने उपाययोजना केली जाण्याची शक्यता आहे.मंगळवारी (दि.२०) झालेल्या महासभेत मिळकत करांमध्ये भाडेमूल्यावर आधारित दरवाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. या करवाढीस विरोधी पक्षांनी विरोध दर्शविला आहे. महासभेत प्रशासनाकडून पाणीपुरवठा दरात वाढ करण्याचाही प्रस्ताव ठेवण्यात आला होता. सदरचा प्रस्ताव मात्र, प्रशासनाकडून त्यात सुधारणा करण्यासाठी मागे घेण्यात आला होता. संबंधित प्रस्ताव माजी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी ठेवलेला होता. त्यात पंचवार्षिक वाढ प्रस्तावित करत दरवर्षी प्रत्येकी एक रुपया वाढ सुचविण्यात आली होती. सद्यस्थितीत घरगुती वापरासाठी पाच रुपये प्रती हजार लिटर, बिगर घरगुतीसाठी २२ रुपये प्रती हजार लिटर तर औद्योगिक वापरासाठी २७ रुपये प्रती हजार लिटर याप्रमाणे दर आकारणी केली जाते. कृष्ण यांनी घरगुतीसाठी पहिल्या वर्षी ७ रुपये, बिगर घरगुतीसाठी २५ रुपये तर औद्योगिकसाठी ३० रुपये दर प्रस्तावित केले होते. त्यानंतर, त्यात दरवर्षी प्रत्येकी एक रुपयाने वाढ सुचविण्यात आलेली होती. दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मिळकत कराचा सुधारित प्रस्ताव महासभेत ठेवला आणि त्याला मंजुरीही घेतली. मात्र, पाणीपट्टीत सुधारणा करण्यासाठी संबंधित प्रस्ताव मागे घेतला. आता पाणीपट्टी दरात सुधारणा करण्याची तयारी सुरू असून, महावितरणच्या धर्तीवर ज्या पद्धतीने विजेची बिल आकारणी केली जाते, त्यानुसार टेलिस्कोपी पद्धतीने महापालिकेनेही पाण्याचा ठराविक हिशेबबाह्य पाण्यावरही नजरमहापालिकेने नियुक्त केलेल्या मे. एन. जे. एस. इंजिनिअर्स (इंडिया) प्रा. लिमिटेड या संस्थेने तयार केलेल्या पाणी लेखापरीक्षणाच्या अहवालानुसार, तब्बल ४४.५० टक्के पाण्याचा वापर फुकटात होत असून, त्याचा कुठेही हिशेब नाही. केवळ ४५ टक्के पाण्याचेच बिलिंग होत असल्याचे लेखापरीक्षणातून निदर्शनास आले आहे. सदर हिशेबबाह्य पाण्याचा वापर २० टक्क्यांपर्यंत आणण्याचे उद्दिष्ट महापालिकेला देण्यात आले आहे. दरम्यान, थेट गळती १४.५० टक्के आढळून आली आहे. हिशेबबाह्य पाणीवापराबाबतही आयुक्तांकडून कठोर उपाययोजनेचे संकेत मिळत आहेत.