शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आता राज्यराणी एक्स्प्रेसही पळविली नांदेडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 01:13 IST

मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेसला नांदेड-मुंबई अशी चालविण्यास रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी हिरवा झेंडा दाखविल्याने मुंबई-ठाणे जाणाऱ्या नाशिककर रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून तपोवन, नाशिक-पुणे एक्स्प्रेस व आता राज्यराणी एक्स्प्रेसचादेखील मार्ग वाढविल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देनाशिककरांवर अन्याय : नाशिक-पुणे एक्स्प्रेसनंतर रेल्वे मंत्रालयाकडून पुन्हा निर्णय

नाशिकरोड : मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेसला नांदेड-मुंबई अशी चालविण्यास रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी हिरवा झेंडा दाखविल्याने मुंबई-ठाणे जाणाऱ्या नाशिककररेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून तपोवन, नाशिक-पुणे एक्स्प्रेस व आता राज्यराणी एक्स्प्रेसचादेखील मार्ग वाढविल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.मुंबई-ठाणे परिसरात दररोज ये-जा करणाºया प्रवाशांची संख्या वाढल्याने पंचवटी एक्स्प्रेसला समांतर रेल्वे सुरू करण्याची नाशिककर प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी होती. ९ मार्च २०१२ रोजी मनमाड-एलटीटी राज्यराणी एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. प्रवाशांच्या मागणीनंतर राज्यराणी एक्स्प्रेस सीएसटीपर्यंत धावत आहे. मात्र राज्यराणी एक्स्प्रेसला दादरला थांबा देण्यात यावा व तिची परतीची वेळ बदलण्यात यावी या मागणीकडे रेल्वे मंत्रालयाने गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे नाशिककर रेल्वे प्रवाशांची दादर थांबा नसल्याने व वेळेमुळे परतीची गैरसोय तशीच आहे. राज्यराणी एक्स्प्रेस तोट्यात असल्याच्या कारणावरून यापूर्वीच राज्यराणी एक्स्प्रेस नांदेड-मुंबई करण्याचा रेल्वे मंत्रालयाकडून घाट घालण्यात आला होता. मात्र खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार योगेश घोलप, अनिल कदम यांनी राज्यराणी ही मनमाड-मुंबई अशीच ठेवावी, अशी मागणी लावून धरली होती. नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्याकडे राज्यराणी एक्स्प्रेस नांदेड-मुंबई सोडावी, अशी मागणी केली होती. राज्यराणी एक्स्प्रेस तोट्यात असल्याचे कारण पुढे करून रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी राज्यराणी एक्स्प्रेस नांदेड-मुंबई धावण्यास सोमवारी (१६ डिसेंबर) मंजुरी दिली आहे. राज्यराणी एक्स्प्रेस नांदेडकडूनच हाउसफुल्ल होऊन आल्यास नाशिककर रेल्वे प्रवाशांना त्यामध्ये जागा मिळणार नाही. त्यामुळे पुन्हा पंचवटी व गोदावरी एक्स्प्रेसवरील प्रवाशांचा ताण वाढणार आहे. यामुळे नाशिककर रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.तपोवन एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर मनमाड-सीएसटी अशी धावत होती. मात्र काही वर्षानंतर नाशिककरांकडून तपोवन एक्सप्रेस हिरावून घेत ती नांदेड-मुंबई करण्यात आली. काही वर्षांपूर्वी नाशिक-पुणे गाडी सुरु करण्यात आली. या गाडीला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना आता ती भुसावळहून सोडली जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तांत्रिक कामामुळे भुसावळ-पुणे एक्स्प्रेस ही नाशिक ऐवजी मनमाड-दौंडमार्गे धावत आहे. यामुळे नाशिककरांना पुण्याला रस्तामार्गे जाण्याची वेळ आल्याने पैसे व वेळेचा अपव्यय होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे