शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
5
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
6
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
7
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
8
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
9
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
10
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
11
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."
12
Operation Sindoor: मोठी बातमी! कंदहार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
13
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानच्या दोन मित्रराष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर, जयशंकर यांची भेट
15
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
16
तुम्हीही वारंवार पर्सनल लोन घेता? मग 'हे' ५ मोठे तोटे समजून घ्या; अनेकजण करतात दुर्लक्ष
17
Mumbai: पत्नीची हत्या करून मृतदेह बेडमध्ये लपवला, मुंबईतील गोरेगाव येथील धक्कादायक प्रकार
18
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
19
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
20
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!

आता राज्यराणी एक्स्प्रेसही पळविली नांदेडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 01:13 IST

मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेसला नांदेड-मुंबई अशी चालविण्यास रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी हिरवा झेंडा दाखविल्याने मुंबई-ठाणे जाणाऱ्या नाशिककर रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून तपोवन, नाशिक-पुणे एक्स्प्रेस व आता राज्यराणी एक्स्प्रेसचादेखील मार्ग वाढविल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देनाशिककरांवर अन्याय : नाशिक-पुणे एक्स्प्रेसनंतर रेल्वे मंत्रालयाकडून पुन्हा निर्णय

नाशिकरोड : मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेसला नांदेड-मुंबई अशी चालविण्यास रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी हिरवा झेंडा दाखविल्याने मुंबई-ठाणे जाणाऱ्या नाशिककररेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून तपोवन, नाशिक-पुणे एक्स्प्रेस व आता राज्यराणी एक्स्प्रेसचादेखील मार्ग वाढविल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.मुंबई-ठाणे परिसरात दररोज ये-जा करणाºया प्रवाशांची संख्या वाढल्याने पंचवटी एक्स्प्रेसला समांतर रेल्वे सुरू करण्याची नाशिककर प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी होती. ९ मार्च २०१२ रोजी मनमाड-एलटीटी राज्यराणी एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. प्रवाशांच्या मागणीनंतर राज्यराणी एक्स्प्रेस सीएसटीपर्यंत धावत आहे. मात्र राज्यराणी एक्स्प्रेसला दादरला थांबा देण्यात यावा व तिची परतीची वेळ बदलण्यात यावी या मागणीकडे रेल्वे मंत्रालयाने गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे नाशिककर रेल्वे प्रवाशांची दादर थांबा नसल्याने व वेळेमुळे परतीची गैरसोय तशीच आहे. राज्यराणी एक्स्प्रेस तोट्यात असल्याच्या कारणावरून यापूर्वीच राज्यराणी एक्स्प्रेस नांदेड-मुंबई करण्याचा रेल्वे मंत्रालयाकडून घाट घालण्यात आला होता. मात्र खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार योगेश घोलप, अनिल कदम यांनी राज्यराणी ही मनमाड-मुंबई अशीच ठेवावी, अशी मागणी लावून धरली होती. नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्याकडे राज्यराणी एक्स्प्रेस नांदेड-मुंबई सोडावी, अशी मागणी केली होती. राज्यराणी एक्स्प्रेस तोट्यात असल्याचे कारण पुढे करून रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी राज्यराणी एक्स्प्रेस नांदेड-मुंबई धावण्यास सोमवारी (१६ डिसेंबर) मंजुरी दिली आहे. राज्यराणी एक्स्प्रेस नांदेडकडूनच हाउसफुल्ल होऊन आल्यास नाशिककर रेल्वे प्रवाशांना त्यामध्ये जागा मिळणार नाही. त्यामुळे पुन्हा पंचवटी व गोदावरी एक्स्प्रेसवरील प्रवाशांचा ताण वाढणार आहे. यामुळे नाशिककर रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.तपोवन एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर मनमाड-सीएसटी अशी धावत होती. मात्र काही वर्षानंतर नाशिककरांकडून तपोवन एक्सप्रेस हिरावून घेत ती नांदेड-मुंबई करण्यात आली. काही वर्षांपूर्वी नाशिक-पुणे गाडी सुरु करण्यात आली. या गाडीला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना आता ती भुसावळहून सोडली जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तांत्रिक कामामुळे भुसावळ-पुणे एक्स्प्रेस ही नाशिक ऐवजी मनमाड-दौंडमार्गे धावत आहे. यामुळे नाशिककरांना पुण्याला रस्तामार्गे जाण्याची वेळ आल्याने पैसे व वेळेचा अपव्यय होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे