शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जात पडताळणी आता आणखी सुकर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 15:01 IST

अर्जदाराच्या रक्तसंबंधातील नातेवाईकाचे जात पडताळणी प्रमाणपत्र पुरावा म्हणून सादर केल्यास पंधरा दिवसात जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देरक्तसंबंधाचा पुरावा महत्वाचा : पंधरा दिवसात निर्णयजिल्हास्तरीय जात पडताळणी समितीकडे हजारो जात पडताळणी प्रमाणपत्रांचे प्रकरणे वर्षानुवर्षे पडून

 

नाशिक : जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी वर्षानुवर्षे वाट पाहण्याची यापुढे गरज भासणार नाही, त्यासाठी सामाजिक न्याय विभागाने दोन दिवसांपुर्वी राजपत्र प्रसिद्ध करून, अर्जदाराच्या रक्तसंबंधातील नातेवाईकाचे जात पडताळणी प्रमाणपत्र पुरावा म्हणून सादर केल्यास पंधरा दिवसात जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. सामजिक न्याय विभागाच्या या निर्णयामुळे विशेषत: शालेय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.राज्यातील सर्वच जिल्हास्तरीय जात पडताळणी समितीकडे हजारो जात पडताळणी प्रमाणपत्रांचे प्रकरणे वर्षानुवर्षे पडून असून, प्रत्येक वेळी अर्जदाराकडून नव नवीन कागदपत्रांची तसेच पुराव्यांची मागणी करून प्रकरणे प्रलंबीत ठेवण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. सर्व कागदपत्रांची पुर्तता करूनही समाजकल्याण विभागाकडून समितीच्या बैठका घेण्यास विलंब लावला जातो, बैठक झालीच तर या बैठकीसाठी समिती सदस्यच गैरहजर राहत असल्यामुळे प्रकरणांवर निर्णय घेतला जात नसल्यामुळे शालेय विद्यार्थी, पालक, शासकीय नोकरदार, राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात होती. अशा प्रलंबीत प्रकरणांमुळेच समाज कल्याण विभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांकडून पैशांची मागणीचे प्रकार घडत असल्याने त्यावर सामाजिक न्याय विभागाने अखेर तोडगा काढला आहे. या संदर्भातील महाराष्टÑ अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग अधिनियमात दुरूस्ती करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, पडताळणी समितीने दिलेले अर्जदाराच्या रक्तसंबंधातील वडिलांचे किंवा सख्ख्या चुलत्याचे किंवा वडीलांकडील रक्तसंबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकाचे जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास सदर वैधता प्रमाणपत्र महत्वाचा पुरावा मानून इतर कोणत्याही पुराव्याची मागणी न करता सक्षम प्राधिकाºयाने जातीचे प्रमाणपत्र निर्गमीत करावे. त्याचबरोबर अर्जदाराने पडताळणी समितीने निर्गमीत केलेले अर्जदाराच्या रक्तसंबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकांचे वैधता प्रमाणपत्र सादर केल्यास सक्षम प्राधिका-याने इतर कागदपत्रांची किंवा पुराव्याची मागणी न करता संबंधित अर्जदाराने सादर केलेले वैधता प्रमाणपत्र महत्वाचा पुरावा मानून जात प्रमाणपत्र निर्गमीत करावे.जात पडताळणी समितीला आवश्यकता वाटल्यास अर्जदाराकडे मुळ कागदपत्रांची मागणी करू शकतील, मात्र असे कागदपत्रे अर्जदाराने सादर केल्यास पंधरा दिवसात जिल्हा जात पडताळणी समिती त्यावर निर्णय घेऊन पडताळ णी प्रमाणपत्र अदा करतील असेही शासनाने आदेशात म्हटले असून, ज्या अर्जावर आक्षेप घेतला गेला त्या अर्जावरही ६० दिवसाच्या आत कार्यवाही करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्रMantralayaमंत्रालय