शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेत आता स्थानिकांना रोजगार

By admin | Updated: July 18, 2014 00:36 IST

पालिकेत आता स्थानिकांना रोजगार

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक जिव्हाळ्याच्या मुद्द्यांना हात घालणाऱ्या मनसेच्या सत्ताधिकाऱ्यांनी स्थानिक भूमिपुत्रांचा मुद्दा पुढे करीत रोजगाराची मागणी पुढे केली. त्याला सर्वच पक्षांनी साथ देत परप्रांतीय ठेकेदारांपेक्षा स्थानिक युवकांना रोजगार देण्याचे मनसेला टोले लगावतच हा मुद्दा उचलून धरला. त्यामुळे पालिकेत सुरक्षारक्षकांबरोबरच सर्व प्रकारच्या रिक्त जागांवर तातडीने भरती मोहीम राबवावी, असे आदेश महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी प्रशासनाला दिले आहेत.रुग्णालयांमधील अर्भक चोरी रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील पालिकांना दिले आहेत. त्यानुसार पालिकेच्या विविध प्रसूतिगृहांमध्ये १५५ सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचा प्रस्ताव होता. तथापि, सदरचे काम एका ठेकेदार कंपनीला अगोदरच देण्यात आले असून, त्याची मुदत संपत असल्याने हा प्रस्ताव मांडताना सुमारे अडीच कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्याचा त्यात अंतर्भाव होता. परंतु नगरसेवकांनी त्यास कडाडून विरोध केला. पालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसताना ठेकेदाराला एवढी रक्कम देण्याची गरज नाही. तसेच उच्च न्यायालयाचे केवळ नाशिक महापालिकेला आदेश नाहीत. अर्भक सुरक्षितताच हवी असेल, तर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले किंवा केवळ प्रवेशद्वारावर कर्मचारी नियुक्त करण्यात आले तरी काम होऊ शकते, त्यासाठी ठेकेदार पोसण्याची गरज काय, असा प्रश्न बहुतांशी सदस्यांनी केला.ठेकेदाराकडील कामगार मागच्या दाराने पालिकेच्या सेवेत कायम होतात, असा अनुभव असल्याने पालिकेनेच भरती मोहीम राबवून स्थानिक भूमिपुत्रांना न्याय द्यावा, अशी मागणी मनसेच्या अनिल मटाले यांनी केली. त्यानंतर सर्वपक्षीयांनी त्यास दुजोरा दिला. केवळ प्रसूतिगृहच नव्हे, तर उद्याने आणि अन्य मिळकतींमध्येदेखील सुरक्षा कर्मचाऱ्यांची गरज आहे. तसेच पालिकेत अन्य पदे रिक्त आहेत. स्थानिक भूमिपुत्रांच्या न्यायासाठी राज ठाकरे लढतात, मग पालिकेत स्थानिक भूमिपुत्रांची भरती का करीत नाही, असा प्रश्न विरोधकांनी केला. त्यानुसार महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी पालिकेच्या सुरक्षारक्षकपदासाठी मानधनावर भरतीप्रक्रिया राबवावी, तसेच पालिकेतील अन्य रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया तातडीने राबवावी, असा निर्णय दिला. यावेळी झालेल्या चर्चेत उद्धव निमसे, अरविंद शेळके, यशवंत निकुळे, प्रा. देवयानी फरांदे, प्रा. कविता कर्डक, प्रा. कुणाल वाघ, दिनकर पाटील, सुजाता डेरे, शशिकांत जाधव, रंजना पवार, प्रकाश लोंढे यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)