शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

आता ग्राहकांबरोबरच शेतकरी हिताचाही विचार

By admin | Updated: February 13, 2016 00:02 IST

केंद्रीय पथकाची भूमिका : आले वाढीचा अंदाज घ्यायला; पण भाव होते कोसळलेले

 नाशिक : पाऊस कमी झाला म्हणून कांद्याचे दर वाढण्याची धास्ती बाळगून नाशिकमध्ये पाहणीसाठी आलेल्या केंद्राच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना येथे मात्र भाव कोसळल्याने धक्का बसला. शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना मिळणाऱ्या दरातील तफावत ही केवळ मध्यस्थांच्या साखळीमुळे निर्माण होत असते. त्यामुळे त्यावर योग्य ती दखल घेण्याची सूचना केंद्रशासनाला करण्यात येईल, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.गेल्यावर्षी देशभरात पुरेसा पाऊस झालेला नाही, त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्णातील लासलगावसह विविध ठिकाणी जाऊन आढावा घेण्यासाठी केंद्रशासनाच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे संचालक मो. झाकीर हुसेन आणि सहायक संचालक दिनेश कुमार नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. ग्रामीण भागात शेतकरी आणि बाजार समितीशी चर्चा केल्यानंतर पथकाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत माहितीची देवाण-घेवाण केली. त्याचबरोबर पत्रकारांशी वार्तालापही केला. कांद्याचे दर वाढले तर ग्राहकांना अडचण होते हे खरे असले तरी केवळ ग्राहकहिताचाच विचार सरकार करत नाही, शेतकऱ्यांचाही विचार करावा लागणार आहे. कारण शेतकऱ्यांनी माल पिकवला नाही तर काय अवस्था होईल याचा विचार करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. ग्राहकांना जास्त दर मोजावे लागले की आरडाओरड होते, मात्र दर कोसळले की शेतकऱ्यांचा विचार होत नाही हे मान्य करताना त्यांनी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे असे नमूद केले. सध्या बाजारात शेतकऱ्यांना मिळणारा भाव आणि ग्राहकांना प्रति किलो मिळणारा कांदा यात तफावत असल्याने मध्यस्थ यंत्रणेबाबत सरकारने विचार करावा अशी सूचना केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास मंडळाने कांद्याचा उत्पादन खर्चासहीत ठरविलेला दर सुमारे ९०० रुपये आहे. त्याचा विचार करून दर कोसळत असताना सरकारने कांदा खरेदी करावा, केंद्रशासनाकडे असलेला राखीव फंड आपत्काळात खरेदीसाठी उपयोगात आणावा, कांद्याला हमी भाव मिळावा अशा विविध सूचना लासलगाव बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील आणि अन्य अधिकाऱ्यांनी केल्या. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंग कुशवाह तसेच सहकार आणि कृषी खात्याचे अन्य अधिकारी उपस्थित होते.