शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

आता ग्राहकांबरोबरच शेतकरी हिताचाही विचार

By admin | Updated: February 13, 2016 00:02 IST

केंद्रीय पथकाची भूमिका : आले वाढीचा अंदाज घ्यायला; पण भाव होते कोसळलेले

 नाशिक : पाऊस कमी झाला म्हणून कांद्याचे दर वाढण्याची धास्ती बाळगून नाशिकमध्ये पाहणीसाठी आलेल्या केंद्राच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना येथे मात्र भाव कोसळल्याने धक्का बसला. शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना मिळणाऱ्या दरातील तफावत ही केवळ मध्यस्थांच्या साखळीमुळे निर्माण होत असते. त्यामुळे त्यावर योग्य ती दखल घेण्याची सूचना केंद्रशासनाला करण्यात येईल, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.गेल्यावर्षी देशभरात पुरेसा पाऊस झालेला नाही, त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्णातील लासलगावसह विविध ठिकाणी जाऊन आढावा घेण्यासाठी केंद्रशासनाच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे संचालक मो. झाकीर हुसेन आणि सहायक संचालक दिनेश कुमार नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. ग्रामीण भागात शेतकरी आणि बाजार समितीशी चर्चा केल्यानंतर पथकाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत माहितीची देवाण-घेवाण केली. त्याचबरोबर पत्रकारांशी वार्तालापही केला. कांद्याचे दर वाढले तर ग्राहकांना अडचण होते हे खरे असले तरी केवळ ग्राहकहिताचाच विचार सरकार करत नाही, शेतकऱ्यांचाही विचार करावा लागणार आहे. कारण शेतकऱ्यांनी माल पिकवला नाही तर काय अवस्था होईल याचा विचार करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. ग्राहकांना जास्त दर मोजावे लागले की आरडाओरड होते, मात्र दर कोसळले की शेतकऱ्यांचा विचार होत नाही हे मान्य करताना त्यांनी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे असे नमूद केले. सध्या बाजारात शेतकऱ्यांना मिळणारा भाव आणि ग्राहकांना प्रति किलो मिळणारा कांदा यात तफावत असल्याने मध्यस्थ यंत्रणेबाबत सरकारने विचार करावा अशी सूचना केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास मंडळाने कांद्याचा उत्पादन खर्चासहीत ठरविलेला दर सुमारे ९०० रुपये आहे. त्याचा विचार करून दर कोसळत असताना सरकारने कांदा खरेदी करावा, केंद्रशासनाकडे असलेला राखीव फंड आपत्काळात खरेदीसाठी उपयोगात आणावा, कांद्याला हमी भाव मिळावा अशा विविध सूचना लासलगाव बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील आणि अन्य अधिकाऱ्यांनी केल्या. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंग कुशवाह तसेच सहकार आणि कृषी खात्याचे अन्य अधिकारी उपस्थित होते.