शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
6
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
7
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
8
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
9
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
10
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
11
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
12
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
13
भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!
14
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
15
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
16
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
17
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
18
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
19
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी

आता कुंभमेळ्याला जात नाही !

By admin | Updated: July 31, 2015 00:25 IST

श्रीएम यांची खंत : प्रारंभीचा हेतू उदात्त; आता मूळ उद्देशापासून भरकटला

नाशिक : देशातील सारे पंथ, संप्रदायांच्या अनुयायांनी एकत्र येऊन विचारमंथन करावे, असा उदात्त हेतू कुंभमेळा सुरू करण्यामागे होता, आता मात्र तो मूळ उद्देशापासून भरकटल्याने आपण कुंभमेळ्याला जात नाही, अशी खंत आध्यात्मिक गुरू महायोगी श्रीएम तथा मुमताज अली खान यांनी व्यक्त केली. देशात बंधुभाव निर्माण करण्यासाठी गेल्या १२ जानेवारीपासून त्यांनी कन्याकुमारी ते श्रीनगरपर्यंत ‘वॉक आॅफ होप’ ही पदयात्रा सुरू केली असून, आज ही यात्रा नाशकात पोहोचली. या पार्श्वभूमीवर श्रीएम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, समुद्रमंथनातून निर्माण झालेल्या अमृताचे थेंब पृथ्वीवर पडले वगैरे या गोष्टी प्रतीकात्मक आहे. मुळात एवढे साधू-महंत एकत्र येतात, तेथेच अमृताची निर्मिती होते. देशातील प्रत्येक संप्रदायाच्या विद्वानांनी नदीकिनारी एकत्र जमावे, विचारांची देवाणघेवाण करावी, असा कुंभमेळ्यामागचा मूळ उद्देश होता. पूर्वीचे कुंभमेळे तसे होतही असत. आता बनावट साधू वाढले आहेत; पण म्हणून ओरिजिनल कोणीच नाहीत, असे नाही. बनावट (ड्युप्लिकेट) तेव्हाच असते, जेव्हा मूळ (ओरिजिनल) अस्तित्वात असते. यापूर्वी आपण काही कुंभमेळ्यांना हजेरी लावली. आता मात्र जाणे बंद केल्याचे ते म्हणाले. आपल्या पदयात्रेबाबत त्यांनी सांगितले की, देशात एकता प्रस्थापित करण्यासाठी ही यात्रा सुरू केली असून, जाती-धर्मांपलीकडे आपण सारे मानव आहोत, हेच प्रत्येकाला सांगणे आहे. आतापर्यंत आम्ही ३ हजार २०० किलोमीटर अंतर चाललो असून, अद्याप पाच हजार किलोमीटर अंतर पार करायचे आहे. जाऊ तेथे आम्ही मानवतेचे बीज रोवतो आहोत. त्याचा वृक्ष कधी होईल, हे सांगता येणार नाही. ठिकठिकाणी विशिष्ट गटाची स्थापना करीत असून, त्यांना काही काळानंतर ‘टास्क’ दिला जाईल. कोणी कोणत्याही विचारसरणी, धर्माचे असोत, आपण सारे आधी माणूस आहोत, हे विसरू नये, असा संदेश त्यांनी तरुणांसाठी दिला. (प्रतिनिधी)