शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
8
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
9
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
10
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
11
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
12
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
13
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
14
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
15
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
16
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
17
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
18
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
19
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
20
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ

आता कुंभमेळ्याला जात नाही !

By admin | Updated: July 31, 2015 00:25 IST

श्रीएम यांची खंत : प्रारंभीचा हेतू उदात्त; आता मूळ उद्देशापासून भरकटला

नाशिक : देशातील सारे पंथ, संप्रदायांच्या अनुयायांनी एकत्र येऊन विचारमंथन करावे, असा उदात्त हेतू कुंभमेळा सुरू करण्यामागे होता, आता मात्र तो मूळ उद्देशापासून भरकटल्याने आपण कुंभमेळ्याला जात नाही, अशी खंत आध्यात्मिक गुरू महायोगी श्रीएम तथा मुमताज अली खान यांनी व्यक्त केली. देशात बंधुभाव निर्माण करण्यासाठी गेल्या १२ जानेवारीपासून त्यांनी कन्याकुमारी ते श्रीनगरपर्यंत ‘वॉक आॅफ होप’ ही पदयात्रा सुरू केली असून, आज ही यात्रा नाशकात पोहोचली. या पार्श्वभूमीवर श्रीएम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, समुद्रमंथनातून निर्माण झालेल्या अमृताचे थेंब पृथ्वीवर पडले वगैरे या गोष्टी प्रतीकात्मक आहे. मुळात एवढे साधू-महंत एकत्र येतात, तेथेच अमृताची निर्मिती होते. देशातील प्रत्येक संप्रदायाच्या विद्वानांनी नदीकिनारी एकत्र जमावे, विचारांची देवाणघेवाण करावी, असा कुंभमेळ्यामागचा मूळ उद्देश होता. पूर्वीचे कुंभमेळे तसे होतही असत. आता बनावट साधू वाढले आहेत; पण म्हणून ओरिजिनल कोणीच नाहीत, असे नाही. बनावट (ड्युप्लिकेट) तेव्हाच असते, जेव्हा मूळ (ओरिजिनल) अस्तित्वात असते. यापूर्वी आपण काही कुंभमेळ्यांना हजेरी लावली. आता मात्र जाणे बंद केल्याचे ते म्हणाले. आपल्या पदयात्रेबाबत त्यांनी सांगितले की, देशात एकता प्रस्थापित करण्यासाठी ही यात्रा सुरू केली असून, जाती-धर्मांपलीकडे आपण सारे मानव आहोत, हेच प्रत्येकाला सांगणे आहे. आतापर्यंत आम्ही ३ हजार २०० किलोमीटर अंतर चाललो असून, अद्याप पाच हजार किलोमीटर अंतर पार करायचे आहे. जाऊ तेथे आम्ही मानवतेचे बीज रोवतो आहोत. त्याचा वृक्ष कधी होईल, हे सांगता येणार नाही. ठिकठिकाणी विशिष्ट गटाची स्थापना करीत असून, त्यांना काही काळानंतर ‘टास्क’ दिला जाईल. कोणी कोणत्याही विचारसरणी, धर्माचे असोत, आपण सारे आधी माणूस आहोत, हे विसरू नये, असा संदेश त्यांनी तरुणांसाठी दिला. (प्रतिनिधी)