शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

निवडणुकीची पदे भरण्याचे अधिकार आता आयुक्तांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 02:02 IST

लोकसभा निवडणूक निष्पक्ष व पारदर्शीपणे पार पडावी यासाठी गेल्या दोन वर्षांपासून निवडणुकीसंदर्भातील मतदार याद्या, मतदान केंद्रांची कामे पाहणाऱ्या निवडणूक अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या ‘होलसेल भावात’ बदल्या करणाºया महसूल मंत्रालयाने निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची मुदत टळून गेल्यानंतर आता निवडणुकीशी संबंधित रिक्तपदे भरण्याचे अधिकार महसूल आयुक्तांना बहाल केले आहेत.

ठळक मुद्देवरातीमागून घोडे : राज्य सरकारच्या निर्र्णयावर टीका

नाशिक : लोकसभा निवडणूक निष्पक्ष व पारदर्शीपणे पार पडावी यासाठी गेल्या दोन वर्षांपासून निवडणुकीसंदर्भातील मतदार याद्या, मतदान केंद्रांची कामे पाहणाऱ्या निवडणूक अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या ‘होलसेल भावात’ बदल्या करणाºया महसूल मंत्रालयाने निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची मुदत टळून गेल्यानंतर आता निवडणुकीशी संबंधित रिक्तपदे भरण्याचे अधिकार महसूल आयुक्तांना बहाल केले आहेत. विशेष म्हणजे महसूल मंत्रालयाने राज्यातील सर्व पदे यापूर्वीच भरून टाकलेली असल्याने आता काढलेले आदेश म्हणजे वरातीमागून घोडे असल्याचे मानले जात आहे.निवडणूक आयोगाने गेल्या वर्षापासूनच निवडणुकीची तयारी सुरू करून, निवडणूक अधिकारी, सहायक निवडणूक अधिकाºयांकडून निवडणूक पूर्वतयारीची कामे करवून घेतली होती. मतदारांची अंतिम यादी जानेवारी महिन्यात प्रसिद्ध झाल्यानंतर आयोगाने निवडणुकीशी संबंधित कामे करणाºया अधिकाºयांच्या सरसकट बदल्या करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. त्यानुसार महसूल मंत्रालयाने राज्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या होलसेल बदल्या केल्या होत्या.सोयीच्या बदल्या करवून घेण्यासाठी अधिकाºयांना मंत्रालयाच्या पायºया झिजविण्याबरोबरच विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकाºयांची मनधरणी करावी लागली होती. मोठ्या उलाढाली होऊन राज्यातील जवळपास सर्वच निवडणूक अधिकाºयांची पदे २८ फेब्रुवारीपर्यंत भरण्यात आली असून, तसा अहवालही निवडणूक आयोगाला पाठविण्यात आला आहे. असे असताना गुरुवारी रात्री राज्याच्या महसूल मंत्रालयाने २६ फेब्रुवारीची मागील तारीख टाकून राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना पत्र पाठविले असून, त्यात म्हटले आहे की, महसूल विभागातील अपर उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार तथा अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या बदल्या, पदस्थापना करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार आपल्या विभागातील फक्तलोकसभा निवडणुकीशी संबंधित पद कोणत्याही कारणास्तव रिक्त झाल्यास, निवडणूक कामकाजाशी संंबंधित नसलेल्या जिल्ह्णांतर्गत, विभागांतर्गत निवडणूक आयोगाच्या पात्र अधिकाºयांमधून पदस्थापना देऊन असे पद भरण्याबाबत अधिकार देण्यात येत आहे. असे या पत्रात नमूद केलेआहे.व्हायरल पत्राद्वारे टीकास्त्रमहसूल खात्याचे सदरचे पत्र अधिकाºयांनीच सोशल माध्यमावर व्हायरल केले असून, या पत्राचा आधार घेऊन गेला महिनाभर महसूल मंत्रालयातील अधिकाºयांकडून बदल्यांच्या नावे केल्या गेलेल्या छळवणुुकीच्या घटनांना अधिकाºयांनी उजाळा दिला आहे. विभागीय आयुक्त जर बदल्या करण्यास सक्षम होते, तर तेव्हाच त्यांना अधिकार का दिले नाही? असा सवाल केला.

टॅग्स :GovernmentसरकारElectionनिवडणूक