शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

निवडणुकीची पदे भरण्याचे अधिकार आता आयुक्तांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 02:02 IST

लोकसभा निवडणूक निष्पक्ष व पारदर्शीपणे पार पडावी यासाठी गेल्या दोन वर्षांपासून निवडणुकीसंदर्भातील मतदार याद्या, मतदान केंद्रांची कामे पाहणाऱ्या निवडणूक अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या ‘होलसेल भावात’ बदल्या करणाºया महसूल मंत्रालयाने निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची मुदत टळून गेल्यानंतर आता निवडणुकीशी संबंधित रिक्तपदे भरण्याचे अधिकार महसूल आयुक्तांना बहाल केले आहेत.

ठळक मुद्देवरातीमागून घोडे : राज्य सरकारच्या निर्र्णयावर टीका

नाशिक : लोकसभा निवडणूक निष्पक्ष व पारदर्शीपणे पार पडावी यासाठी गेल्या दोन वर्षांपासून निवडणुकीसंदर्भातील मतदार याद्या, मतदान केंद्रांची कामे पाहणाऱ्या निवडणूक अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या ‘होलसेल भावात’ बदल्या करणाºया महसूल मंत्रालयाने निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची मुदत टळून गेल्यानंतर आता निवडणुकीशी संबंधित रिक्तपदे भरण्याचे अधिकार महसूल आयुक्तांना बहाल केले आहेत. विशेष म्हणजे महसूल मंत्रालयाने राज्यातील सर्व पदे यापूर्वीच भरून टाकलेली असल्याने आता काढलेले आदेश म्हणजे वरातीमागून घोडे असल्याचे मानले जात आहे.निवडणूक आयोगाने गेल्या वर्षापासूनच निवडणुकीची तयारी सुरू करून, निवडणूक अधिकारी, सहायक निवडणूक अधिकाºयांकडून निवडणूक पूर्वतयारीची कामे करवून घेतली होती. मतदारांची अंतिम यादी जानेवारी महिन्यात प्रसिद्ध झाल्यानंतर आयोगाने निवडणुकीशी संबंधित कामे करणाºया अधिकाºयांच्या सरसकट बदल्या करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. त्यानुसार महसूल मंत्रालयाने राज्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या होलसेल बदल्या केल्या होत्या.सोयीच्या बदल्या करवून घेण्यासाठी अधिकाºयांना मंत्रालयाच्या पायºया झिजविण्याबरोबरच विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकाºयांची मनधरणी करावी लागली होती. मोठ्या उलाढाली होऊन राज्यातील जवळपास सर्वच निवडणूक अधिकाºयांची पदे २८ फेब्रुवारीपर्यंत भरण्यात आली असून, तसा अहवालही निवडणूक आयोगाला पाठविण्यात आला आहे. असे असताना गुरुवारी रात्री राज्याच्या महसूल मंत्रालयाने २६ फेब्रुवारीची मागील तारीख टाकून राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना पत्र पाठविले असून, त्यात म्हटले आहे की, महसूल विभागातील अपर उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार तथा अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या बदल्या, पदस्थापना करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार आपल्या विभागातील फक्तलोकसभा निवडणुकीशी संबंधित पद कोणत्याही कारणास्तव रिक्त झाल्यास, निवडणूक कामकाजाशी संंबंधित नसलेल्या जिल्ह्णांतर्गत, विभागांतर्गत निवडणूक आयोगाच्या पात्र अधिकाºयांमधून पदस्थापना देऊन असे पद भरण्याबाबत अधिकार देण्यात येत आहे. असे या पत्रात नमूद केलेआहे.व्हायरल पत्राद्वारे टीकास्त्रमहसूल खात्याचे सदरचे पत्र अधिकाºयांनीच सोशल माध्यमावर व्हायरल केले असून, या पत्राचा आधार घेऊन गेला महिनाभर महसूल मंत्रालयातील अधिकाºयांकडून बदल्यांच्या नावे केल्या गेलेल्या छळवणुुकीच्या घटनांना अधिकाºयांनी उजाळा दिला आहे. विभागीय आयुक्त जर बदल्या करण्यास सक्षम होते, तर तेव्हाच त्यांना अधिकार का दिले नाही? असा सवाल केला.

टॅग्स :GovernmentसरकारElectionनिवडणूक