शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

दोन हजार ग्रामपंचायत सदस्यांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 01:26 IST

ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागांवर निवडणूक लढवून विजयी झाल्यानंतरही जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या जिल्ह्णातील दोन हजारांहून अधिक ग्रामपंचायत सदस्यांना प्रशासनाने नोटिसा बजावल्या

नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागांवर निवडणूक लढवून विजयी झाल्यानंतरही जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या जिल्ह्णातील दोन हजारांहून अधिक ग्रामपंचायत सदस्यांना प्रशासनाने नोटिसा बजावल्या असून, जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. मुदतीत प्रमाणपत्र सादर न केल्यास या सर्वांचे सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता आहे.लोकप्रतिनिधी कायद्यान्वये राखीव जागेवर निवडणूक लढविणाºया उमेदवाराने निवडणुकीत नामांकन दाखल करताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असून, जात वैधता पडताळणीसाठी समितीकडे दिली असेल तर त्याबाबतची पावती नामांकनासोबत जोडणे क्रमप्राप्त आहे. अशा उमेदवाराने राखीव जागेवर निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत समितीकडून जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त करून ते निवडणूक अधिकाºयाकडे सुपूर्द करणे अनिवार्य असून, तसे न करणाºया उमेदवाराचे सदस्यत्व रद्द करण्याची कायदेशीर तरतूद आहे. या तरतुदीला कोल्हापूर जिल्ह्णातील काही सदस्यांनी थेट उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर आॅक्टोबर महिन्यात राज्य सरकारने जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाºया सदस्यांचे सदस्यत्व रद्द ठरविण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र अशा सदस्यांची संख्या हजारोंच्या घरात असल्याची बाब निदर्शनास आली.सरकारने मुदतवाढ देऊनही जिल्ह्णात सुमारे दोन हजारांहून अधिक ग्रामपंचायत सदस्यांनी जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अशा सर्व सदस्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द का करू नये, अशा नोटिसा प्रशासनाने बजावल्या आहेत.राज्य मंत्रिमंडळाने ३१ मार्च २०१६ नंतर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या सदस्यांना बारा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याचे व ११ आॅक्टोबर २०१८ पूर्वी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या सदस्यांना ते निवडणूक अधिकाºयाकडे सादर करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्याचा निर्णय घेतला होता.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतNashikनाशिक