शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

नोटा काढणाऱ्यांच्या बोटाला शाई

By admin | Updated: November 18, 2016 00:28 IST

रांगा कायम : आजपासून दोन हजारच मिळणार असल्याने नागरिक हवालदिल

नाशिक : पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे गुरुवारी (दि. १७)देखील शहरातील बँकांमध्ये पैसे बदलण्यासाठी आणि खात्यातून पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. विशेष म्हणजे गर्दी टाळण्यासाठी सरकारच्या निर्देशानुसार टपाल कार्यालयात गुरुवारपासून नागरिकांच्या बोटाला शाई लावण्यास प्रारंभ झाला. दिवसभरात जिल्ह्यातील टपाल कार्यालयातून एक कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. दुसरीकडे शुक्रवारपासून बॅँकेत दोन हजार रुपये मिळणार असल्याच्या बातमीमुळे गुरुवारी बॅँक आणि टपाल कार्यालयात रांगा अधिकच वाढल्या.चलनातून बाद करण्यात आलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी नागरिकांची होणारी गर्दी बघता सरकारने बोटावर शाई लावण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी शहरातील बँकांंमध्ये मात्र नागरिकांच्या बोटाला शाई लावण्यात आली नाही, परंतु पोस्टाच्या मुख्यालयात चलन बदलण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या उजव्या हाताच्या बोटाला शाई लावण्यात येत होती. शहरातील बँकांमध्ये अजून ही शाईच दाखल झालेली नसल्याचे बँक शाखा अधिकाऱ्यांनी सांगितले.बँकांमध्ये जशी चलन बदलण्यासाठी गर्दी होती तशीच गर्दी एटीएम केंद्रांबाहेरही बघायला मिळत होती. एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याने एटीएमच्या कार्यक्षमतेवरही परिणाम झाला आहे. एटीएम मशीनमध्ये केवळ शंभर रुपयांचाच भरणा केला जात असल्याने मशीनमधल्या नोटा लवकर संपून ग्राहकांच्या पदरी निराशा पडत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत सकाळपासूनच दिवसभर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कॅश डिपॉझिट मशीन (सीडीएम)मधून आपल्या खात्यावर पैसे जमा करता येत असले तरी याठिकाणीही मोठ्या रांगा लागल्या होत्या. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखा वगळता इतर राष्ट्रीयीकृत, नागरी तसेच खासगी बँकांमधील गर्दी दुपारी ओसरली होती.लग्नसराई जवळ आल्याने अनेक नागरिकांना लग्नाची खरेदी करायची होती, परंतु नोटा बंदीच्या निर्णयामुळे अनेकांची लग्ने खोळंबलेली असताना गुरुवारी दिल्ली येथे केंद्रीय अर्थसचिव शशिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत ज्यांच्या घरी लग्नकार्य आहे त्यांना आता बँक खात्यातून अडीच लाख रुपये काढता येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली असून, या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवार (दि. १८) पासून करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार असला तरी आता साधारण नागरिकांना आपल्या खात्यातून केवळ दोन हजार रुपये मिळणार असल्याने चलन टंचाई वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम बाजारपेठेवर होणार असून, आर्थिक उलाढाल ठप्प होण्याची भिती व्यावसायिक आणि नागरिक व्यक्त करीत आहेत. एकीकडे प्रेसमध्ये नोटांची छपाई वाढविण्यात आली असून, दररोजच नोटा रिझर्व्ह बॅँकेकडे पोहचत असताना मर्यादा घटविण्याचे कारण काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.नोटा बदलण्यासाठी टपाल कार्यालयात आलेल्या ग्राहकाच्या बोटावर अशी शाई लावण्यात आली.