शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
4
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
5
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
9
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
10
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
11
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
12
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
13
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
14
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
15
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
16
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
17
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
18
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
19
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
20
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा

अहिंसा वर्ष म्हणून साजरे करणार :  ज्ञानमती माता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 01:22 IST

सटाणा : संपूर्ण जगात शांती आणि अहिंसा प्रस्थापित करण्यासाठी आणि विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी हे वर्ष अहिंसा वर्ष  म्हणून साजरे ...

सटाणा : संपूर्ण जगात शांती आणि अहिंसा प्रस्थापित करण्यासाठी आणि विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी हे वर्ष अहिंसा वर्ष  म्हणून साजरे करण्यात येणार असल्याची घोषणा गणिनीप्रमुख श्री ज्ञानमती माता यांनी केली. मांगीतुंगी, हस्तिनापूर आदी  ठिकाणी शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळांमध्ये विश्वशांतीसाठी विविध कार्यक्र मांद्वारे अहिंसेचा नारा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  बागलाण तालुक्यातील ऋषभदेवपुरम (मांगीतुंगी) येथे सोमवारपासून तीन दिवसांच्या विश्वशांती अहिंसा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि. २३) दुसऱ्या दिवशी सायंकाळी गणिनीप्रमुख ज्ञानमती यांच्या अध्यक्षतेखाली महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी त्यांनी ही घोषणा केली. आर्यिका चंदनामती माता, पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी उपस्थित महिलांनी अहिंसेवर आपापली मते मांडून संवाद साधला. प्रत्येक कुटुंबाने शिक्षणावर भर देऊन सुसंस्कृत पिढी घडविल्यास नक्कीच आपला देश अहिंसेकडे वाटचाल करेल, अशा विश्वास ज्ञानमती माता यांनी व्यक्त केला. अहिंसेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी येत्या वर्षभर  शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळांमध्ये पूजापाठ, जप, अनुष्ठान, हवन आदी कार्यक्रम घेण्यात  येणार आहे, जेणेकरून संपूर्ण  जगात विश्वशांती प्रस्थापित होईल, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.महिला मंडळाच्या राष्ट्रीय महामंत्री मनोरमा जैन (दिल्ली), प्रगती जैन (इंदूर), सुवर्णलता पाटणी (नाशिक), उषा पाटणी (लखनऊ), तृष्णा जैन यांनीही आपले विचार मांडले. यावेळी राष्ट्रीय जैन महिला मंडळाच्या वतीने श्री ज्ञानमती माता यांचा श्रीफळ ,वस्त्र भेट देऊन सन्मान करण्यात आला. तसेच इंदूर येथील महिला संघटनेच्या कार्याचा चंदनामती मातांनी गौरव केला. संमेलनास महामंत्री विजय जैन, जीवनप्रकाश जैन, अनिल जैन, अनुपमा मुळे, मीनाक्षी जैन, आचल जैन, अर्चना जैन, पद्मावती जैन, राणी पहाडे, मालती जैन, कुमकुम जैन, भारती कासलीवाल, कुसुम जैन, सुमन जैन, रचना पांडे यांच्यासह कानपूर, दिल्ली, मुंबई, लखनऊ, इंदूर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, पुणे, जळगाव, धुळे येथील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.विश्वशांतीसाठी शाकाहाराचा प्रचार आर्यिका चंदनामती माता यांनी विश्वशांतीसाठी शाकाहाराची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. आहारावरही माणसाची प्रवृत्ती अवलंबून असते. शाकाहारामुळे भारतीय संस्कृती टिकून आहे. मांसाहार सेवन केल्यास माणसाची प्रवृत्ती हिंसक होऊन समाजात अशांतता निर्माण होते. त्यामुळे कुटुंबातील महिलांनी आपल्या घरातूनच शाकाहारावर भर दिल्यास खºया अर्थाने विश्वशांतीचा संदेश जाईल, असे आवाहन त्यांनी केले. बेटी बचाव आणि प्लॅस्टिक निर्मूलनासाठी महिलांनी पुढे यावे यासाठी विश्वशांती अहिंसा संमेलनातून प्रचार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. निसर्ग वाचवण्यासाठी आणि पशू-पक्षी संवर्धनासाठी प्लॅस्टिकबंदी महत्त्वाची आहे. सामाजिक समतोल राखण्यासाठी बेटी बचावही तेवढेच महत्त्वाचे मानून महिलांबरोबरच पुरु षांनी पुढे यावे, असे आवाहन चंदनामती माताजी यांनी केले.रासायनिक सौंदर्यप्रसाधने त्यागण्याची शपथमहिला संमेलनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित महिलांनी विश्वशांतीच्या प्रचाराचे एक पाऊल म्हणून लिपस्टिक, रासायनिक सौंदर्यप्रसाधनांचा त्याग करण्याची सामुदायिक शपथ घेतली. या रासायनिक सौंदर्यप्रसाधनांमुळे अहिंसेला धोका असल्याचे सांगत त्यांनी ही शपथ घेतल्याचे जाहीर केले. तसेच फास्टफूडचादेखील त्याग करण्याची भूमिका घेत प्रत्येक महिलेने फास्टफूडचा त्याग करून कुटुंबातील प्रत्येक सदस्याला स्वत: तयार केलेले शाकाहारी भोजन देण्याचा आग्रह त्यांनी केला.

 

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरJain Tirthkshetraजैन तीर्थक्षेत्र