शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
6
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
7
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
8
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
9
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
10
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
11
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
12
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
13
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
14
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
15
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
16
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
17
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
18
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
19
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
20
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांचे ऑडिट करावेच लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:18 IST

नाशिक : कोरोनाच्या काळात असलेल्या निर्बंधांमुळे शैक्षणिक संस्था बंदच होत्या. त्यामुळे त्यांच्या साधनसामग्रीचा कोणताही वापर विद्यार्थ्यांसाठी झालेला नाही. असे ...

नाशिक : कोरोनाच्या काळात असलेल्या निर्बंधांमुळे शैक्षणिक संस्था बंदच होत्या. त्यामुळे त्यांच्या साधनसामग्रीचा कोणताही वापर विद्यार्थ्यांसाठी झालेला नाही. असे असतानाही पालकांकडून शुल्क वसूल करणे आणि प्रसंगी विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देण्याचा त्यांचा हक्क हिरावून घेणे गैर असतानाही शैक्षणिक संस्थांकडून असे प्रकार करण्यात आलेले आहेत. त्यांना शासकीय यंत्रणेचा धाक वाटावा, यासाठी सर्व विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांचे ऑडिट करून नफेखोरीला आळा घालावा, असा ठराव ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या जनसुनावणी कार्यक्रमात करण्यात आला.

ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने त्र्यंबकनाका येथील कविवर्य टिळक वाचनालयात जनसुनावणी घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त न्यायाधीश जस्टीस प्रकाश परांजपे होते. चालू शैक्षणिक वर्षात (२०२१-२२) शुल्कात १५ टक्के सवलत देणे भाग पाडले होते. परंतु, दि. ४ सप्टेंबर रोजी औरंगाबाद उच्च न्यायालयाने या निर्णयाच्या अंमलबजावणीवर स्थगिती आणल्याने विद्यार्थी, पालकांच्या संतप्त प्रतिक्रिया जनसुनावणीत उमटल्या.

शिक्षणाला केवळ शैक्षणिक संस्था सेवा देणाऱ्या आणि विद्यार्थी सेवेचे उपभोग घेणारे ग्राहक एवढा संकुचित ठेवता कामा नये, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस ॲड. मनीष बस्ते यांनी केले. प्रा.डॉ. मिलिंद वाघ यांनी ऑनलाइन शिक्षणासाठी लागणारी उपकरणे, परीक्षा घेण्याच्या खासगी यंत्रणा, त्यातील खासगी गुंतवणूकदार यांच्यामध्ये निर्माण झालेल्या नव्या हितसंबंधांमुळे शाळा, महाविद्यालये सुरू करण्यासाठी दिरंगाई तर होत नाही ना? असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला.

सेवानिवृत्त न्यायाधीश जस्टीस प्रकाश परांजपे यांनी महाराष्ट्र शासनाने आपली पालकत्वाची भूमिका बजावून राज्यातील विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन कोरोनाकाळातील संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी उचलली पाहिजे, असे प्रतिपादन केले. जनसुनावणीची भूमिका ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे राज्याध्यक्ष विराज देवांग यांनी मांडली. सूत्रसंचालन गायत्री मोगल व तल्हा शेख यांनी केले. जनसुनावणीचे ठराव अविनाश दोंदे यांनी मांडले. प्राजक्ता कापडणे यांनी आभार मानले. जनसुनावणी यशस्वी करण्याकरिता जयंत विजयपुष्प, सागर जाधव, अजिंक्य म्होडक, हर्षाली देवरे, कैफ शेख, प्रज्वल खैरनार, शरद खाडे आदींनी परिश्रम घेतले.

--इन्फो-

जनसुनावणीतील ठराव :

१) राज्य शासनाने कोरोनाकाळात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जबाबदारी घ्यावी.

२) सर्व विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांचे ऑडिट करून नफेखोरीला आळा घालावा.

३) सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तत्काळ अदा करावी.

४) ऑनलाइन शिक्षणामुळे ढासळलेल्या शैक्षणिक गुणवत्तेबद्दल हस्तक्षेप करावा.

५) ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक असलेली उपकरणे मोफत द्यावी.

६) राज्यातील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे उघडून पूर्ववत करावी.

७) गळती झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणावे.