शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांचे ऑडिट करावेच लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:18 IST

नाशिक : कोरोनाच्या काळात असलेल्या निर्बंधांमुळे शैक्षणिक संस्था बंदच होत्या. त्यामुळे त्यांच्या साधनसामग्रीचा कोणताही वापर विद्यार्थ्यांसाठी झालेला नाही. असे ...

नाशिक : कोरोनाच्या काळात असलेल्या निर्बंधांमुळे शैक्षणिक संस्था बंदच होत्या. त्यामुळे त्यांच्या साधनसामग्रीचा कोणताही वापर विद्यार्थ्यांसाठी झालेला नाही. असे असतानाही पालकांकडून शुल्क वसूल करणे आणि प्रसंगी विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देण्याचा त्यांचा हक्क हिरावून घेणे गैर असतानाही शैक्षणिक संस्थांकडून असे प्रकार करण्यात आलेले आहेत. त्यांना शासकीय यंत्रणेचा धाक वाटावा, यासाठी सर्व विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांचे ऑडिट करून नफेखोरीला आळा घालावा, असा ठराव ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या जनसुनावणी कार्यक्रमात करण्यात आला.

ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने त्र्यंबकनाका येथील कविवर्य टिळक वाचनालयात जनसुनावणी घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त न्यायाधीश जस्टीस प्रकाश परांजपे होते. चालू शैक्षणिक वर्षात (२०२१-२२) शुल्कात १५ टक्के सवलत देणे भाग पाडले होते. परंतु, दि. ४ सप्टेंबर रोजी औरंगाबाद उच्च न्यायालयाने या निर्णयाच्या अंमलबजावणीवर स्थगिती आणल्याने विद्यार्थी, पालकांच्या संतप्त प्रतिक्रिया जनसुनावणीत उमटल्या.

शिक्षणाला केवळ शैक्षणिक संस्था सेवा देणाऱ्या आणि विद्यार्थी सेवेचे उपभोग घेणारे ग्राहक एवढा संकुचित ठेवता कामा नये, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस ॲड. मनीष बस्ते यांनी केले. प्रा.डॉ. मिलिंद वाघ यांनी ऑनलाइन शिक्षणासाठी लागणारी उपकरणे, परीक्षा घेण्याच्या खासगी यंत्रणा, त्यातील खासगी गुंतवणूकदार यांच्यामध्ये निर्माण झालेल्या नव्या हितसंबंधांमुळे शाळा, महाविद्यालये सुरू करण्यासाठी दिरंगाई तर होत नाही ना? असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला.

सेवानिवृत्त न्यायाधीश जस्टीस प्रकाश परांजपे यांनी महाराष्ट्र शासनाने आपली पालकत्वाची भूमिका बजावून राज्यातील विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन कोरोनाकाळातील संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी उचलली पाहिजे, असे प्रतिपादन केले. जनसुनावणीची भूमिका ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे राज्याध्यक्ष विराज देवांग यांनी मांडली. सूत्रसंचालन गायत्री मोगल व तल्हा शेख यांनी केले. जनसुनावणीचे ठराव अविनाश दोंदे यांनी मांडले. प्राजक्ता कापडणे यांनी आभार मानले. जनसुनावणी यशस्वी करण्याकरिता जयंत विजयपुष्प, सागर जाधव, अजिंक्य म्होडक, हर्षाली देवरे, कैफ शेख, प्रज्वल खैरनार, शरद खाडे आदींनी परिश्रम घेतले.

--इन्फो-

जनसुनावणीतील ठराव :

१) राज्य शासनाने कोरोनाकाळात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जबाबदारी घ्यावी.

२) सर्व विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांचे ऑडिट करून नफेखोरीला आळा घालावा.

३) सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तत्काळ अदा करावी.

४) ऑनलाइन शिक्षणामुळे ढासळलेल्या शैक्षणिक गुणवत्तेबद्दल हस्तक्षेप करावा.

५) ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक असलेली उपकरणे मोफत द्यावी.

६) राज्यातील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे उघडून पूर्ववत करावी.

७) गळती झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणावे.