शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

नाशिक शहरात ध्वनी प्रदुषाचा दणदणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 18:58 IST

नाशिक- राज्यात सर्वाधिक चांगले हवा पाणी असलेल्या नाशिक शहराविषयी आजही राज्यस्तरावर चांगले मत असले तरी दिवसेंदिवस प्रदुषणात वाढ होत आहे. विशेषत: नाशिक महापालिकेने सालाबादाप्रमाणे केलेल्या पर्यावरण अहवालात ध्वनी प्रदुषणात वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

ठळक मुद्दे धोकादायक पातळीवर ‘आवाज’ पर्यावरण तपासणी अहवालाचा निष्कर्ष

नाशिक- राज्यात सर्वाधिक चांगले हवा पाणी असलेल्या नाशिक शहराविषयी आजही राज्यस्तरावर चांगले मत असले तरी दिवसेंदिवस प्रदुषणात वाढ होत आहे. विशेषत: नाशिक महापालिकेने सालाबादाप्रमाणे केलेल्या पर्यावरण अहवालात ध्वनी प्रदुषणात वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दरवर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर दरम्यान शहराच्या विविध भागात पर्यावरण विषयक चाचण्या घेतल्या जातात. तसेच ध्वनी आणि वायु प्रदुषणाचे मापन केले जाते. सदरचा अहवाल पुढिल वर्षीच्या जुन महिन्याच्या आत महासभेवर ठेवणे बंधनकारक असते. त्यानुसार गेल्यावर्षीही एका खासगी एजन्सीमार्फत शहराच्या विविध भागात सर्वेक्षण करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालानुसार शहराच्या अनेक भागात ध्वनी मर्यादेचे उल्लंघन होत असल्याचे आढळले आहे. त्यात शहरात अत्यंत गजबजेल्या आणि वाहनांची गर्दी तसेच वाहतूक कोंडी असलेल्या भागात ध्वनी प्रदुषणाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले असून त्यात व्दारका चौफुली, पंचवटी तसेच सीबीएस याठिकाणी दिवसा ५५ ते ६५ डेसीबल ध्वनीमर्यादा असताना प्रत्यक्षात मात्र तेथे ७० डेसीबल पेक्षा अधिक डेसीबल आवाज होत असल्याने सर्वेक्षणात आढळले आहे.

महापालिकेच्या दरवर्षीच्या या प्रदुषण तपासणी अहवालांनतर महापालिकेने दरवर्षी प्रमाणे शहरात १९ शांतता क्षेत्र करण्यात आले आहेत. रस्ता रूंदीकरण करून वाहन कोंडी फोडली जात आहे, अशाप्रकारची दरवर्षीच्याच उपाययोजना कथन केल्या आहेत. पर्यावण हा शहराच्या दृष्टीने सर्वाधिक महत्वाचा विषय असताना त्यावर महासभेत एकाही नगरसेवकाने चर्चा केली नाही की जाब विचारलेला नाही.

टॅग्स :Nashikनाशिकpollutionप्रदूषण