शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लीम धर्मगुरू, इमाम यांच्यासोबत महत्त्वाची बैठक
2
दौंड गोळीबार: आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह तिघांना अटक; प्रकरण अखेर बाहेर आलेच...
3
भारताचे तसे शेजारीच: आशियातील दोन देश सीमेवर भिडले; सैन्यामध्ये गोळीबार, युद्धपूर्व तणाव...
4
सेल्फी काढायला बोलावलं, गाडीत ओढून चौघांनी मारहाण केली; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं अपहरण
5
अखेरचा श्वास सोबत घेतला, मैत्रीचा धागा तुटला; नाशिकात एकाचवेळी निघाली २ मित्रांची अंत्ययात्रा
6
सावधान! सिगारेटपेक्षाही जास्त हानिकारक असू शकतो अगरबत्तीचा धूर; कॅन्सरचाही मोठा धोका
7
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
8
काय घडतेय? भारतातील गर्भश्रीमंत, बिझनेसमन महागड्या गाड्यांच्या बुकिंग धडाधड रद्द करू लागले...
9
Deep Amavasya 2025: आज दिवसभरात १० मिनिटं तरी दीपपूजन कराच; पूर्ण वर्ष प्रकाशमान होईल!
10
ब्रिटिशांसारखीच भारतावरही २१ वर्षांपूर्वी वेळ आलेली...; जेव्हा मिराज-२००० मॉरीशसमध्ये अडकलेले...
11
गजकेसरी, गुरुपुष्यामृतयोग एकाच दिवशी: ७ राशींची भरघोस भरभराट, चौफेर लाभच लाभ; शुभ वरदान काळ!
12
Stock Market Today: फ्लॅट ओपनिंगनंतर शेअर बाजार घसरला, Nifty २५,२०० च्या खाली; Tata Motors, Tata Consumer मध्ये तेजी
13
"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान
14
FD, SIP सर्व विसरुन जाल... Post Office कडे आहेत जबरदस्त सेव्हिंग स्कीम्स; एकदा गुंतवणूक, दरवर्षी मिळतील २.४६ लाख
15
अभिमानास्पद! इटालियन तरुणींनी गायली 'वाजले की बारा' लावणी, समोर आलं नागपूरचं कनेक्शन
16
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
17
श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो...
18
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
19
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता
20
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन

‘न हि वैरेन’चा ‘एनसीपीए’त प्रयोग!

By admin | Updated: October 13, 2015 23:13 IST

आज सादरीकरण : नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

नाशिक : गेल्या वर्षी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथम पारितोषिक पटकावून इतिहास रचणाऱ्या येथील लोकहितवादी मंडळाच्या ‘न हि वैरेन वैराणि’ या नाटकाने नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. उद्या (दि. १४) या नाटकाचा प्रयोग मुंबईच्या नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस्मध्ये (एनसीपीए) होणार असून, यामुळे नाशिकच्या कलावंतांची मान अभिमानाने उंचावणार आहे. लोकहितवादी मंडळाच्या वतीने सादर होणाऱ्या या नाटकाचे दिग्दर्शन मुकुंद कुलकर्णी यांनी, तर लेखन भगवान हिरे यांनी केले आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेतल्या गेलेल्या ५४व्या राज्य नाट्य स्पर्धेत या नाटकाने तीन लाखांचे प्रथम पारितोषिक पटकावले होते. याशिवाय दिग्दर्शन, अभिनयासह अन्य विभागांची सतरा पारितोषिकेही या नाटकाने खिशात टाकली होती. तब्बल ७५ कलावंतांचा चमू असलेल्या या नाटकातून शांतता व अहिंसेचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला होता. या नाटकाचा प्रयोग आता ‘एनसीपीए’त होत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने मुंबईत कोकणी, हिंदी व मराठी असा त्रिभाषा नाट्य महोत्सव सुरू असून, त्यात प्रयोग सादर करण्यासाठी लोकहितवादी मंडळाला खास निमंत्रित करण्यात आले आहे. त्यानुसार उद्या (दि. १४) सायंकाळी ६ वाजता ‘न हि वैरेन वैराणि’चा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, सन १९५० मध्ये कुसुमाग्रजांनी स्थापन केलेल्या लोकहितवादी मंडळाने गेल्या ६५ वर्षांत ४५ नाटके व १५ एकांकिकांची निर्मिती केली असून, अनेक पुरस्कारही पटकावले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी दिली.