शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

राज्यात २२ दिवसांत भारनियमन झालेले नाही : नितीन राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2022 01:46 IST

राज्य भारनियमनमुक्त झाले आहे. गेल्या २२ दिवसांत राज्यात भारनियमन झालेले नाही. यापुढेही होणार नाही, असा आमचा प्रयत्न असून, केंद्र सरकारने कोळशाचे योग्य नियोजन न केल्याने देशातील १२ ते १३ राज्यांमध्ये भारनियमन सुरू असल्याची टीका राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी नाशकात गुरुवारी (दि.१२) केली.

ठळक मुद्देकेंद्रामुळेच अनेक राज्यात भारनियमनची टीका

नाशिक : राज्य भारनियमनमुक्त झाले आहे. गेल्या २२ दिवसांत राज्यात भारनियमन झालेले नाही. यापुढेही होणार नाही, असा आमचा प्रयत्न असून, केंद्र सरकारने कोळशाचे योग्य नियोजन न केल्याने देशातील १२ ते १३ राज्यांमध्ये भारनियमन सुरू असल्याची टीका राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी नाशकात गुरुवारी (दि.१२) केली.

ऊर्जामंत्री राऊत यांनी एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, केंद्र सरकारने कोळशाचे योग्य नियोजन न केल्याने देशातील काही राज्यांमध्ये भारनियमन सुरू आहे. मात्र नियोजनामुळे राज्य भारनियमन मुक्त केले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. केंद्र सरकारने कोळशाचे नियोजन अद्याप पूर्णपणे केलेले नाही. रेल्वे प्रवासी गाड्या थांबवून मालगाड्या सुरू झाल्या असल्या तरीही देशात कोळशाचा पुरवठा जसा हवा तसा होताना दिसत नाही. त्यामुळे देशातील बारा-तेरा राज्यांत सातत्याने लोडशेडिंग होत आहे. असे सांगून मुंबईत राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी विजेची बत्ती गूल झाल्याच्या प्रकाराबद्दल माहिती घ्यावी लागेल, कारण मुंबईत महावितरण वीज पुरवठा करीत नसल्याचे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले.

राज्यातील आंबेडकर चळवळीने एकत्र यावे, या डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाबद्दल बोलताना राऊत यांनी, या चळवळीचे नेतृत्व कोणी करावे याचा निर्णय त्यांचे नेते व चळवळीचे कार्यकर्ते ठरवतील, मात्र असे प्रयत्न अनेक वेळा झाले असले तरी, त्यासाठी ज्यांनी आवाहन केले, त्यांनीदेखील पुढाकार घेतला नाही व कोणाला घेऊ दिला नसल्याचे सांगून राऊत यांनी केंद्र सरकारकडून अनुसूचित जातीच्या योजनांबाबत हात आखडता घेतला जात असल्याचा आरोप केला. लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात तरतूद अपेक्षित असताना त्यासाठी तरतूद ठेवली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत मिळत नाही, त्यातून अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, अशा प्रश्नावर चळवळीतील नेते, पदाधिकारी बोलत नसल्याची खंतही राऊत यांनी व्यक्त केली.

चौकट==

नाना पटोलेंच्या विधानाचे समर्थन

 

नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला आहे. त्याचे समर्थन नितीन राऊत यांनी केले. ते म्हणाले, नाना पटोले हे पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे ते बाेलले ते सत्यच आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकमेकांना सांभाळून घेतले पाहिजे, असे ठरलेले आहे.

टॅग्स :NashikनाशिकNitin Rautनितीन राऊतelectricityवीज