शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

राज्यात २२ दिवसांत भारनियमन झालेले नाही : नितीन राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2022 01:46 IST

राज्य भारनियमनमुक्त झाले आहे. गेल्या २२ दिवसांत राज्यात भारनियमन झालेले नाही. यापुढेही होणार नाही, असा आमचा प्रयत्न असून, केंद्र सरकारने कोळशाचे योग्य नियोजन न केल्याने देशातील १२ ते १३ राज्यांमध्ये भारनियमन सुरू असल्याची टीका राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी नाशकात गुरुवारी (दि.१२) केली.

ठळक मुद्देकेंद्रामुळेच अनेक राज्यात भारनियमनची टीका

नाशिक : राज्य भारनियमनमुक्त झाले आहे. गेल्या २२ दिवसांत राज्यात भारनियमन झालेले नाही. यापुढेही होणार नाही, असा आमचा प्रयत्न असून, केंद्र सरकारने कोळशाचे योग्य नियोजन न केल्याने देशातील १२ ते १३ राज्यांमध्ये भारनियमन सुरू असल्याची टीका राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी नाशकात गुरुवारी (दि.१२) केली.

ऊर्जामंत्री राऊत यांनी एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, केंद्र सरकारने कोळशाचे योग्य नियोजन न केल्याने देशातील काही राज्यांमध्ये भारनियमन सुरू आहे. मात्र नियोजनामुळे राज्य भारनियमन मुक्त केले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. केंद्र सरकारने कोळशाचे नियोजन अद्याप पूर्णपणे केलेले नाही. रेल्वे प्रवासी गाड्या थांबवून मालगाड्या सुरू झाल्या असल्या तरीही देशात कोळशाचा पुरवठा जसा हवा तसा होताना दिसत नाही. त्यामुळे देशातील बारा-तेरा राज्यांत सातत्याने लोडशेडिंग होत आहे. असे सांगून मुंबईत राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी विजेची बत्ती गूल झाल्याच्या प्रकाराबद्दल माहिती घ्यावी लागेल, कारण मुंबईत महावितरण वीज पुरवठा करीत नसल्याचे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले.

राज्यातील आंबेडकर चळवळीने एकत्र यावे, या डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाबद्दल बोलताना राऊत यांनी, या चळवळीचे नेतृत्व कोणी करावे याचा निर्णय त्यांचे नेते व चळवळीचे कार्यकर्ते ठरवतील, मात्र असे प्रयत्न अनेक वेळा झाले असले तरी, त्यासाठी ज्यांनी आवाहन केले, त्यांनीदेखील पुढाकार घेतला नाही व कोणाला घेऊ दिला नसल्याचे सांगून राऊत यांनी केंद्र सरकारकडून अनुसूचित जातीच्या योजनांबाबत हात आखडता घेतला जात असल्याचा आरोप केला. लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात तरतूद अपेक्षित असताना त्यासाठी तरतूद ठेवली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत मिळत नाही, त्यातून अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, अशा प्रश्नावर चळवळीतील नेते, पदाधिकारी बोलत नसल्याची खंतही राऊत यांनी व्यक्त केली.

चौकट==

नाना पटोलेंच्या विधानाचे समर्थन

 

नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला आहे. त्याचे समर्थन नितीन राऊत यांनी केले. ते म्हणाले, नाना पटोले हे पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे ते बाेलले ते सत्यच आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकमेकांना सांभाळून घेतले पाहिजे, असे ठरलेले आहे.

टॅग्स :NashikनाशिकNitin Rautनितीन राऊतelectricityवीज