शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांच्या जमीन लिलावासाठी बँकेला गावात ‘नो एन्ट्री’; गावांनी केला ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 18:16 IST

जिल्हा बँकेने सक्तीचे कर्ज वसुली सुरू केल्यानंतर अनेक गावांतील ग्रामपंचायतींनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहण्याची भूमिका घेतली असून कर्जवसुलीसाठी बँकांना गावात बंदी करण्याचा ठराव केला आहे.

नाशिक जिल्हा बँकेने शेतकऱ्यांच्या कर्जाची वसुली करण्यासाठी निफाड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात मोहीम उघडली असून शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर निफाडमधील हिंगलाज नगर (खेडे) आणि नांदुर्डी या दोन गावांनी ग्रामसभेत ठराव करून बँकेला शेतकऱ्यांच्या जमीन लिलावासाठी तसेच कर्ज वसुलीसाठी मनाई केली आहे. 

कोरोना काळातले संकट आणि बदलत्या हवामानामुळे अडचणीत येणारी शेती यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून त्याची कर्ज फेडण्याची पत कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज भरण्यास अडचणी येत आहेत. मात्र जिल्हा बँकेने सक्तीचे कर्ज वसुली सुरू केल्यानंतर अनेक गावांतील ग्रामपंचायतींनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहण्याची भूमिका घेतली असून कर्जवसुलीसाठी बँकांना गावात बंदी करण्याचा ठराव केला आहे. या शिवाय शेतकऱ्यांची वीजबिले खंडीत करू नये असेही या ठरावात म्हटले आहे. त्यावर सूचक म्हणून जयराम मेधाणे, तर अनुमोदक म्हणून शिवनाथ कावळे यांच्यासह सरपंचांच्या स्वाक्षऱ्या आहेत. असाच ठराव निफाड तालुक्यातील नांदुर्डी गावच्या आमसभेने केला असून त्यावर सरपंच सौ. जयश्री जाधव यांच्यासह सूचक व अनुमोदकाच्या सह्या आहेत.

शेतकऱ्यांना कर्ज देतेवेळी शासनाने कर्ज करारात हमी घेतलेली होती. मात्र तरीही शेतकऱ्यांवर कारवाई होत असल्याचा आरोप शेतकरी संघर्ष संघटनेने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केला असून बँकांच्या सक्तीच्या वसुली व जप्ती व लिलावाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. सदर कर्ज माफ करण्याची मागणीही यात केली असून शेतकऱ्यांच्या प्रश्नाची दखल न घेतल्यास १४ व १५ जुलै रोजी तीव्र नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानात शेतकरी बांधवांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही शेतकरी संघटनेच्या वतीने दिला आहे.

दरम्यान आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक महिला-पुरुष शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदनही प्रशासनाला देण्यात आले.  या निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, शेतकरी संघटना समन्वय समिती, राज्य अध्यक्ष भगवान बोराडे यांच्यासह दिलीप पाटील, कैलास बोरसे. दत्तात्रय सुडके, देवा बापु वाघ, अनंत पाटील, नंदुकुमार देवरेल दिपक निकम, बापु साहेब जाधव, सुनिल देव भाऊसाहेब पाटील यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनagitationआंदोलनfarmingशेतीgram panchayatग्राम पंचायत