शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

शेतकऱ्यांच्या जमीन लिलावासाठी बँकेला गावात ‘नो एन्ट्री’; गावांनी केला ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 18:16 IST

जिल्हा बँकेने सक्तीचे कर्ज वसुली सुरू केल्यानंतर अनेक गावांतील ग्रामपंचायतींनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहण्याची भूमिका घेतली असून कर्जवसुलीसाठी बँकांना गावात बंदी करण्याचा ठराव केला आहे.

नाशिक जिल्हा बँकेने शेतकऱ्यांच्या कर्जाची वसुली करण्यासाठी निफाड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात मोहीम उघडली असून शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर निफाडमधील हिंगलाज नगर (खेडे) आणि नांदुर्डी या दोन गावांनी ग्रामसभेत ठराव करून बँकेला शेतकऱ्यांच्या जमीन लिलावासाठी तसेच कर्ज वसुलीसाठी मनाई केली आहे. 

कोरोना काळातले संकट आणि बदलत्या हवामानामुळे अडचणीत येणारी शेती यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून त्याची कर्ज फेडण्याची पत कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज भरण्यास अडचणी येत आहेत. मात्र जिल्हा बँकेने सक्तीचे कर्ज वसुली सुरू केल्यानंतर अनेक गावांतील ग्रामपंचायतींनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहण्याची भूमिका घेतली असून कर्जवसुलीसाठी बँकांना गावात बंदी करण्याचा ठराव केला आहे. या शिवाय शेतकऱ्यांची वीजबिले खंडीत करू नये असेही या ठरावात म्हटले आहे. त्यावर सूचक म्हणून जयराम मेधाणे, तर अनुमोदक म्हणून शिवनाथ कावळे यांच्यासह सरपंचांच्या स्वाक्षऱ्या आहेत. असाच ठराव निफाड तालुक्यातील नांदुर्डी गावच्या आमसभेने केला असून त्यावर सरपंच सौ. जयश्री जाधव यांच्यासह सूचक व अनुमोदकाच्या सह्या आहेत.

शेतकऱ्यांना कर्ज देतेवेळी शासनाने कर्ज करारात हमी घेतलेली होती. मात्र तरीही शेतकऱ्यांवर कारवाई होत असल्याचा आरोप शेतकरी संघर्ष संघटनेने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केला असून बँकांच्या सक्तीच्या वसुली व जप्ती व लिलावाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. सदर कर्ज माफ करण्याची मागणीही यात केली असून शेतकऱ्यांच्या प्रश्नाची दखल न घेतल्यास १४ व १५ जुलै रोजी तीव्र नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानात शेतकरी बांधवांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही शेतकरी संघटनेच्या वतीने दिला आहे.

दरम्यान आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक महिला-पुरुष शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदनही प्रशासनाला देण्यात आले.  या निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, शेतकरी संघटना समन्वय समिती, राज्य अध्यक्ष भगवान बोराडे यांच्यासह दिलीप पाटील, कैलास बोरसे. दत्तात्रय सुडके, देवा बापु वाघ, अनंत पाटील, नंदुकुमार देवरेल दिपक निकम, बापु साहेब जाधव, सुनिल देव भाऊसाहेब पाटील यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनagitationआंदोलनfarmingशेतीgram panchayatग्राम पंचायत