शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

अभय योजनेचा पालिकेला ‘नो इफेक्ट’

By admin | Updated: April 24, 2015 00:01 IST

एलबीटी : २३ दिवसांत ५० कोटींची वसुली

नाशिक : एलबीटी न भरणाऱ्या करबुडव्या व्यापाऱ्यांसाठी राज्य सरकारने दंड व व्याज माफीची अभय योजना लागू करण्याची घोषणा केली असली आणि अद्याप त्याची अंमलबजावणी सुरू झाली नसली तरी या घोषणेचा कोणताही परिणाम नाशिक मनपाच्या एलबीटी वसुलीवर झाला नाही. २३ दिवसांत मनपाच्या खजिन्यात सुमारे ५० कोटी रुपये जमा झाले आहेत. महिनाभरात सरचार्जसह वसुली ६२ कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी वर्तविला आहे.राज्य सरकारने एलबीटी रद्द करण्याची घोषणा केली आहे. तत्पूर्वी एलबीटीचा भरणा न करणाऱ्या व्यापाऱ्यांनी मूळ रक्कम अदा करावी, त्यांना दंड व व्याज माफ केले जाईल, अशी अभय योजना सरकारने घोषित केली आहे. त्याचा राज्यातील मनपांच्या वसुलीवर परिणाम होत आहे. मात्र, नाशिक मनपात या योजनेच्या घोषणेचा कोणताही परिणाम जाणवलेला नाही. २३ दिवसांत एलबीटीच्या माध्यमातून तब्बल ५० कोटी रुपये जमा झाले आहेत. एक टक्का सरचार्जची सुमारे पाच कोटी रुपये धरून महिनाअखेर वसुली ६० ते ६२ कोटी रुपयांपर्यंत जाण्याची चिन्हे आहेत.