शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

एनएमसी ई-कनेक्ट अ‍ॅपवर  दोन महिन्यांत साडेपाच हजार तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:17 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जुने ‘स्मार्ट नाशिक’ अ‍ॅप बंद करून दि. १ मार्चपासून नव्याने कार्यान्वित केलेल्या एनएमसी ई-कनेक्ट या मोबाइल अ‍ॅपवर दोन महिन्यांत तब्बल साडेपाच हजार तक्रारींचा पाऊस पडला आहे. अ‍ॅपवर प्राप्त ५५२६ तक्रारींपैकी ५१९४ तक्रारींचा निपटारा झाला असून, ३३२ तक्रारी प्रलंबित आहेत. तक्रारी सोडविण्याचे प्रमाण ९४ टक्के असल्याने अ‍ॅपवर तक्रारी मांडणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढते आहे.

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जुने ‘स्मार्ट नाशिक’ अ‍ॅप बंद करून दि. १ मार्चपासून नव्याने कार्यान्वित केलेल्या एनएमसी ई-कनेक्ट या मोबाइल अ‍ॅपवर दोन महिन्यांत तब्बल साडेपाच हजार तक्रारींचा पाऊस पडला आहे. अ‍ॅपवर प्राप्त ५५२६ तक्रारींपैकी ५१९४ तक्रारींचा निपटारा झाला असून, ३३२ तक्रारी प्रलंबित आहेत. तक्रारी सोडविण्याचे प्रमाण ९४ टक्के असल्याने अ‍ॅपवर तक्रारी मांडणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढते आहे.आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबईच्या धर्तीवर एनएमसी ई-कनेक्ट हे मोबाइल अ‍ॅप १ मार्चपासून कार्यान्वित केले. या अ‍ॅपवर तक्रारी केल्यानंतर त्या सोडविण्यासंबंधीचा कालबद्ध कार्यक्रमही त्यांनी आखून दिला. शिवाय धोरणात्मक बाबी वगळता अन्य तक्रारी तत्काळ सोडविण्यावर भर देण्यासंबंधीचे आदेश अधिकारीवर्गाला दिल्याने त्याचा एकूणच चांगला परिणाम दिसून येऊ लागला आहे. आतापर्यंत एनएमसी ई-कनेक्ट या अ‍ॅपवर ५५२६ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ५१९४ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. ३३२ तक्रारी प्रलंबित असून, त्यात अतिक्रमण विभागाच्या सर्वाधिक ८६, विद्युत विभागाच्या ४६, भटके कुत्रे/मलेरिया २६, पाणीपुरवठा २५, बांधकाम विभाग २३, मलनिस्सारण २०, उद्यान १७, नगररचना १५, पावसाळी गटार विभाग १२ या तक्रारींचा समावेश आहे. अ‍ॅपवर सर्वाधिक तक्रारी या विद्युत विभागाच्या ११८१ इतक्या प्राप्त झाल्या आहेत. त्याखालोखाल अतिक्रमण विभाग ७७९, घनकचरा व्यवस्थापन ७६२, पाणीपुरवठा ७०३, बांधकाम विभाग ५५९, भटके कुत्रे/मलेरिया ३९१, उद्यान ३३९, मलनिस्सारण ३१५, पावसाळी गटार १५१, तर नगररचना विभागाच्या ९४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आयुक्तांनी या अ‍ॅपवर येणाºया तक्रारी सोडविण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले असल्याने आणि आयुक्तांकडून दर सोमवारी खातेप्रमुखांच्या होणाºया बैठकीत आढावा घेतला जात असल्याने तक्रारींचा निपटारा होण्याचे प्रमाण ९४ टक्के आहे. त्यामुळे अ‍ॅपवर तक्रारी करण्याकडेही नागरिकांचा कल वाढत चालला आहे.अ‍ॅप डाऊनलोडला प्रतिसादशहरातील ६८ हजार नागरिकांनी एनएमसी ई-कनेक्ट हे मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करून घेतले आहे. यापूर्वी, अस्तित्वात असलेले स्मार्ट नाशिक अ‍ॅप हे ५२ हजार लोकांनी डाऊनलोड करून घेतले होते. आता त्यात नागरिकांची हळूहळू भर पडत चालली आहे. प्रशासनाकडून नगरसेवकांनाही त्यांच्या तक्रारी अ‍ॅपवर मांडण्याचे आवाहन केले जात असल्याने अ‍ॅप हेच आता तक्रार सोडविण्याचे माध्यम बनू पाहत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका