शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

निफाडचा पारा १० अंशांवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 13:11 IST

सायखेडा: निफाड तालुक्यातील थंडीचे वाढते प्रमाण आणि पहाटे पसरलेली धुक्याची चादर यामुळे महाबळेश्वरच्या थंडीची अनुभूती तालुक्यात येत आहे.

सायखेडा: निफाड तालुक्यातील थंडीचे वाढते प्रमाण आणि पहाटे पसरलेली धुक्याची चादर यामुळे महाबळेश्वरच्या थंडीची अनुभूती तालुक्यात येत आहे. निफाडचा पारा १० अंशांवर आला आहे.राज्यात सर्वात थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर आहे. हिवाळ्यातील थंडी अनुभवायची असल्यास हिवाळा ऋतूत एकदातरी महाबळेश्वरची सहल करावी आणि थंडीची मजा लुटावी अस म्हटलं जातं, मात्र हा अनुभव आता निफाड तालुक्यात येत आहे. दिवस लहान होत असल्याने सायंकाळी सहा वाजता अंधार पडतो. सात वाजता खेड्यातील घरांपुढे शेकोटी पेटवल्या जातात. लहान मुले, माणसे, वृद्ध माणसे रात्रि उशीरपर्यंत थंडीपासून संरक्षण करण्यासाठी शेकोटीची आश्रय घेत आहे. निफाड तालुक्यात गोदावरी ,कादवा, बाणगंगा , विनिता, नदीचे खोरे आहे, काळी कसदार जमीन, मुबलक पाणी, ऊसाचे शेती, द्राक्षाचे मळे, नगदी पिकांची शेती असा सुजलाम सुफलाम असलेला भौगोलिक परिसर आण िनांदूरमध्यमेश्वर धरनाचा पाणथळ ,दलदलीचा प्रदेश यामुळे मोठ्या प्रमाणावर थंडी असते ,मागील दोन वर्षे सातत्याने ० अंश सेल्शिअस तापमानाची नोंद झाली आहे. हिमकन आणि गोठलेले पाणी, पिकांच्या पानावर, ऊसाच्या पाचटावर, घराबाहेर उभ्या असलेल्या गाडीवर अनेक वेळा हिमकन दिसले आहे ,यंदा जरी आध्याप तसा प्रकार दिसला नसला तरी , आठ दिवसांपासून सातत्याने थंडी वाढत असल्याने लवकरच तशी वेळ येईल असं जाणकार सांगत आहेतवाढत्या थंडीचा सर्वाधिक फटका द्राक्ष पिकाला बसतो, भुरी रोगाचा प्रादुर्भाव आण िमण्यांची थांबलेली फुगवण शेतकर्यांची डोकेदुखी ठरतेकांदा , गहू, हरबरा या पिकांना फायदेशीर असणारी थंडी द्राक्ष पिकाला मात्र मारक ठरते.------------------------------राज्यात सर्वाधिक थंड हवेचे ठिकाण महाबलेश्वर असले तरी काही वर्षापासून निफाडचा घसरणारा पारा आणि वाढते थंडीचे प्रमाण यामुळे महाबळेश्वरचे गुड फिल निफाड तालुक्यात होत आहे. सायंकाळी सहा वाजता सुरु होणारी थंडी दिवसभर काही प्रमाणात सुरु असते. सद्या तालुक्यात कुल कुल वातावरण निर्माण झाले आहे.-डॉ विजय डेर्ले, सायखेडा---------------------------थंडीच्या वाढत्या प्रमाणाने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहे , इतर पिकांसाठी मात्र थंडी अनुकूल आहे, कांदा, गहू, हरबरा, ऊस या पिकांना थँडी फायदेशीर ठरत आहे. थंडीमुळे पिके जोमदार होतात रोगप्रतिकारक शक्ती वाढते, द्राक्ष मात्र भुरी आणि मण्यांच्या फुगवणीवर त्याचा परिणाम होत असतो-वाळू जाधव, शेतकरी

टॅग्स :Nashikनाशिक