शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

निफाडचा पारा १० अंशांवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 13:11 IST

सायखेडा: निफाड तालुक्यातील थंडीचे वाढते प्रमाण आणि पहाटे पसरलेली धुक्याची चादर यामुळे महाबळेश्वरच्या थंडीची अनुभूती तालुक्यात येत आहे.

सायखेडा: निफाड तालुक्यातील थंडीचे वाढते प्रमाण आणि पहाटे पसरलेली धुक्याची चादर यामुळे महाबळेश्वरच्या थंडीची अनुभूती तालुक्यात येत आहे. निफाडचा पारा १० अंशांवर आला आहे.राज्यात सर्वात थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर आहे. हिवाळ्यातील थंडी अनुभवायची असल्यास हिवाळा ऋतूत एकदातरी महाबळेश्वरची सहल करावी आणि थंडीची मजा लुटावी अस म्हटलं जातं, मात्र हा अनुभव आता निफाड तालुक्यात येत आहे. दिवस लहान होत असल्याने सायंकाळी सहा वाजता अंधार पडतो. सात वाजता खेड्यातील घरांपुढे शेकोटी पेटवल्या जातात. लहान मुले, माणसे, वृद्ध माणसे रात्रि उशीरपर्यंत थंडीपासून संरक्षण करण्यासाठी शेकोटीची आश्रय घेत आहे. निफाड तालुक्यात गोदावरी ,कादवा, बाणगंगा , विनिता, नदीचे खोरे आहे, काळी कसदार जमीन, मुबलक पाणी, ऊसाचे शेती, द्राक्षाचे मळे, नगदी पिकांची शेती असा सुजलाम सुफलाम असलेला भौगोलिक परिसर आण िनांदूरमध्यमेश्वर धरनाचा पाणथळ ,दलदलीचा प्रदेश यामुळे मोठ्या प्रमाणावर थंडी असते ,मागील दोन वर्षे सातत्याने ० अंश सेल्शिअस तापमानाची नोंद झाली आहे. हिमकन आणि गोठलेले पाणी, पिकांच्या पानावर, ऊसाच्या पाचटावर, घराबाहेर उभ्या असलेल्या गाडीवर अनेक वेळा हिमकन दिसले आहे ,यंदा जरी आध्याप तसा प्रकार दिसला नसला तरी , आठ दिवसांपासून सातत्याने थंडी वाढत असल्याने लवकरच तशी वेळ येईल असं जाणकार सांगत आहेतवाढत्या थंडीचा सर्वाधिक फटका द्राक्ष पिकाला बसतो, भुरी रोगाचा प्रादुर्भाव आण िमण्यांची थांबलेली फुगवण शेतकर्यांची डोकेदुखी ठरतेकांदा , गहू, हरबरा या पिकांना फायदेशीर असणारी थंडी द्राक्ष पिकाला मात्र मारक ठरते.------------------------------राज्यात सर्वाधिक थंड हवेचे ठिकाण महाबलेश्वर असले तरी काही वर्षापासून निफाडचा घसरणारा पारा आणि वाढते थंडीचे प्रमाण यामुळे महाबळेश्वरचे गुड फिल निफाड तालुक्यात होत आहे. सायंकाळी सहा वाजता सुरु होणारी थंडी दिवसभर काही प्रमाणात सुरु असते. सद्या तालुक्यात कुल कुल वातावरण निर्माण झाले आहे.-डॉ विजय डेर्ले, सायखेडा---------------------------थंडीच्या वाढत्या प्रमाणाने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहे , इतर पिकांसाठी मात्र थंडी अनुकूल आहे, कांदा, गहू, हरबरा, ऊस या पिकांना थँडी फायदेशीर ठरत आहे. थंडीमुळे पिके जोमदार होतात रोगप्रतिकारक शक्ती वाढते, द्राक्ष मात्र भुरी आणि मण्यांच्या फुगवणीवर त्याचा परिणाम होत असतो-वाळू जाधव, शेतकरी

टॅग्स :Nashikनाशिक