शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

दुसऱ्या दिवशीही विसर्ग सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 02:09 IST

नाशिक : चार दिवसांपासून संततधार असलेल्या पावसाने मंगळवारी दुपारनंतर काहीशी विश्रांती घेतली असली तरी, धरण क्षेत्रात हजेरी कायम आहे. गंगापूर, दारणासह चार धरणांतून दुसºया दिवशीही पाण्याचा विसर्ग कायम आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

ठळक मुद्देपावसाची उघडीप : सतर्कतेचा इशारा कायम

नाशिक : चार दिवसांपासून संततधार असलेल्या पावसाने मंगळवारी दुपारनंतर काहीशी विश्रांती घेतली असली तरी, धरण क्षेत्रात हजेरी कायम आहे. गंगापूर, दारणासह चार धरणांतून दुसºया दिवशीही पाण्याचा विसर्ग कायम आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.मंगळवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यात २८७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, त्यात सर्वाधिक पाऊस पेठ तालुक्यात ८४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्या खालोखाल सुरगाणा ६०, इगतपुरी ५८ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. तर त्र्यंबकेश्वर येथे २७ व आंबोली येथे सायंकाळपर्यंत ६० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आल्यामुळे गंगापूर धरण ७९ टक्के भरले आहे. परिणामी धरणक्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने सोमवारी सकाळपासून सोडण्यात येत असलेले पाणी मंगळवारीही कायम ठेवण्यात आले. गंगापूरमधून ९३०२ क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. दारणा धरणातदेखील ७९ टक्के साठा झाल्यामुळे धरणातून १०६०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. चणकापूरमधून ३०८५ व पुनदमधून ११९८ क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे.पावसाने मंगळवारी दुपारी उघडीप दिल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली आहे. दुसरीकडे मालेगाव, नांदगाव, बागलाण, चांदवड, देवळा, येवला व निफाड तालुक्यांकडे पावसाची वक्रदृष्टी आहे.मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ६५६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, त्यात सर्वाधिक पाऊस इगतपुरी येथे १४५ मिलिमीटर इतका विक्रमी नोंदविण्यात आला आहे. त्या खालोखाल पेठला १३६, त्र्यंबकला ११३, सुरगाणा ९४ व नाशिकला ६६ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

टॅग्स :floodपूर