शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

उपकेंद्रासाठी नव्या सरकारचा नवा अध्याय

By admin | Updated: June 23, 2015 01:42 IST

उपकेंद्रासाठी नव्या सरकारचा नवा अध्याय

  नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक येथील उपकेंद्राला १३ आॅगस्ट २०१३ रोजी आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘नाशिक कॅम्पस’ म्हणून मान्यता दिली गेली. सरकारच्या या घोषणेनंतर लगेचच कुलगुरू डॉ. वासुदेव गाढे यांनी नाशिक गाठून विद्यार्थी संघटनांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसमवेत आनंदोत्सव साजरा केला. मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण भाजपा सरकारने उपकेंद्रासाठीची संपूर्ण प्रक्रिया नव्याने करण्याची तयारी सुरू केली असून, याकरिता समिती गठीत केली आहे. अहमदनगर व नाशिक येथे पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे मांडण्यात आला होता. त्यानुसार अहमदनगर येथे उपकेंद्र उभारले गेले. मात्र नाशिकच्या उपकेंद्रासाठीच्या जागेचा प्रश्न सुटता सुटत नव्हता. अखेर शिवनई गाव येथे शासनाने ६३ एकर जागा मंजूर करून विद्यापीठाला हस्तांतरित केली. शिवाय १३५ कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला. मात्र, नव्या भाजपा सरकारने उपकेंद्राबाबत अघाडी सरकारने घेतलेल्या सर्व निर्णयाला स्थगिती देत नव्याने प्रक्रिया करण्याचे धोरण अवलंबविले आहे. त्यामुळे उपकेंद्राची नाशिकरांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यातच शिवनई गाव येथील ६३ एकर जागेपैकी १३ एकर जागा अतिक्रमित झाल्याने केवळ ४० एकर जागेवरच उपकेंद्र उभारावे लागणार आहे. वास्तविक जिल्'ात ८५ कला, वाणिज्य व विज्ञान शाखेची महाविद्यालये आहेत. ५५ अभियांत्रिकी, ३३ एमबीए, २८ बीडी फार्म, ११ एम फार्म, सहा एमसीए, पाच विधी, तीन स्थापत्य, १२ संशोधन केंद्र आदि महाविद्यालये विद्यापीठाअंतर्गत येतात. कळवण तालुक्यातून विद्यार्थ्यास पुणे विद्यापीठास जायचे झाल्यास ११ तासांचा प्रवास करावा लागतो. ही बाब इतर विद्यार्थ्यांबाबतही लागू होत असल्याने जिल्'ात उपकेंद्र होणे जिकरीचे आहे; परंतु राजकीय अनास्थेमुळे शैक्षणिक क्षेत्रात जिल्'ाचा विकास खुंटत असल्याचा विद्यार्थ्यांमध्ये सूर उमटत आहे.