शहरं
Join us  
Trending Stories
1
सुपरओव्हरमध्ये दिल्लीचा राजस्थानवर रोमहर्षक विजय!
2
गुरुची विद्या गुरुलाच? ठाकरेंनी आतल्या गोटातून माहिती काढली; भाजपाला शह देण्याची रणनीती आखली
3
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स कुटुंबासह लवकरच भारत दौऱ्यावर; टॅरिफच्या गोंधळामध्ये पंतप्रधान मोदींशी घेणार भेट
4
कर्नाटकात मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण मिळणार की नाही? आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ठरवणार!
5
भारतीय धावपटूचं शर्यत जिकण्याआधीच सेलीब्रेशन, मागचा पुढं गेला आणि गोल्ड हुकलं!
6
भारतीय विद्यार्थ्याने ट्रम्प प्रशासनाविरोधात दाखल केला खटला; अचानक इमिग्रेशन दर्जा रद्द केल्यानंतर कोर्टात धाव
7
उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...”
8
ऑलिंपिकमधील क्रिकेट सामने खेळवण्यासाठी ऐतिहासिक ठिकाणाची घोषणा!
9
“आपले कुणी ऐकत नाही, म्हणून बाळासाहेबांचा आवाज वापरण्याचा पोरकटपणा”; भाजपाची ठाकरेंवर टीका
10
“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे
11
"हिंदूंना घंटा अन् मुस्लिमांना सौगात...! त्या वक्फ बिलाचा आणि हिंदूंचा काडीचा संबंध नाही"; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
12
"नेहरू नेहमी उघड्या गाडीतून फिरायचे, पण महाराष्ट्रात...! तुमची मस्ती इकडे नाही चालणार"; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
13
"पक्षात ज्येष्ठ नेत्यासारखे फिरतात पण साधा बूथ जिंकू शकत नाही"; राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं
14
सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीचा 'दी एंड'! नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात; महिलेनं रडत-रडत केला धक्कादायक खुलासा
15
'मला कर्करोग आहे, कोणाला सांगायचे नव्हते"; पत्नीला वेदनादायक मृत्यू देऊन पतीने स्वतःला संपवले
16
तामिळनाडूला जाऊन जबाब नोंदवायला काय हरकत आहे? कुणाल कामराला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश
17
दरोडा दहा लाखाचा अन् तपासात मिळाले अडीच कोटी; ‘लाईव्ह लोकेशन’ मिळवून दरोडा
18
तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : पोलिसांनी ससूनला सादर केलेल्या अहवालानंतर चर्चा
19
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
20
गर्भवती मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या डॉ. घैसास यांना पोलीस प्रोटेक्शन..! 

‘अभिनव भारत’च्या स्मारकाची राज्य सरकारकडूनही उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 00:52 IST

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत संस्थेच्या वाड्याचे नूतनीकरण करून आधुनिक स्मारक साकारण्यासाठी यापूर्वी केवळ घोषणाच झाली असून, सार्वजनिक बांधकाम खात्याने पर्यटन मंत्रालयाला आराखडा सादर केला आहे.

नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत संस्थेच्या वाड्याचे नूतनीकरण करून आधुनिक स्मारक साकारण्यासाठी यापूर्वी केवळ घोषणाच झाली असून, सार्वजनिक बांधकाम खात्याने पर्यटन मंत्रालयाला आराखडा सादर केला आहे. मात्र, पर्यटन मंत्रालयाने निधीच न दिल्याने हा प्रस्ताव धूळखात पडला आहे. राज्य सरकारचा कार्यकाळ पूर्ण होत आला असून, आता तरी याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा सावरकरप्रेमी स्वत:च या कामी पुढाकार घेण्याच्या तयारीत आहेत.नाशिकचे भूमिपुत्र असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये अध्ययन करत असतानाच मित्र मेळा ही संस्था स्थापन केली, पुढे तिचे नाव बदलून अभिनव भारत या संघटनेची स्थापना १९०४ मध्ये केली. नाशिकमधील तीळभांडेश्वरमध्ये त्याचे कार्यालय होते. ब्रिटिशांच्या विरोधात लढणारे अनेक क्रांतिकारी या संघटनेशी जोडलेले होते. देशभरात या संघटनेच्या अनेक शाखा त्याकाळी उघडल्या गेल्या आणि सावरकर लंडनमध्ये गेल्यानंतर तेथेदेखील अभिनव भारतचा प्रसार झाला. १९५२ मध्ये म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सावरकर यांनी स्वत:च या संघटनेचे कार्य आता संपल्याचे सांगून ती संघटना विसर्जित केली. नाशिकमध्ये असलेल्या संघटनेच्या कार्यालयाची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे त्याच्या नूतनीकरणाची गरज असतानाच पर्यटन खात्याच्या माध्यमातून अद्ययावत स्मारक करण्याचे ठरविण्यात आले. आमदार देवयानी फरांदे यांनी याकामी पुढाकार घेतला. परंतु आता सरकारची पाच वर्षे संपत आली तरी स्मारकासाठी निधीच उपलब्ध करून दिलेला नाही. विशेष म्हणजे अन्य अनेक धार्मिक संस्था, क्रीडा संस्थांना पर्यटन महामंडळाने निधी उपलब्ध करून दिल्यानंतर त्याचे कामही सुरू झाले आहे. सावरकर यांना मानणाऱ्या विचारांचे सरकार असूनही जर त्याचा विकास होत नसेल तर तसे स्पष्ट झाले पाहिजे, म्हणजे आता सावरकरप्रेमीच हे काम हाती घेतील, अशा प्रतिक्रिया सावरकरप्रेमींनी व्यक्त केल्या.

टॅग्स :BJPभाजपाNashikनाशिक