शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
4
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
5
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
6
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
7
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
8
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
9
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
10
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
11
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
12
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
13
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
14
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
15
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
16
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
17
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
18
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
19
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
20
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप

‘अभिनव भारत’च्या स्मारकाची राज्य सरकारकडूनही उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 00:52 IST

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत संस्थेच्या वाड्याचे नूतनीकरण करून आधुनिक स्मारक साकारण्यासाठी यापूर्वी केवळ घोषणाच झाली असून, सार्वजनिक बांधकाम खात्याने पर्यटन मंत्रालयाला आराखडा सादर केला आहे.

नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत संस्थेच्या वाड्याचे नूतनीकरण करून आधुनिक स्मारक साकारण्यासाठी यापूर्वी केवळ घोषणाच झाली असून, सार्वजनिक बांधकाम खात्याने पर्यटन मंत्रालयाला आराखडा सादर केला आहे. मात्र, पर्यटन मंत्रालयाने निधीच न दिल्याने हा प्रस्ताव धूळखात पडला आहे. राज्य सरकारचा कार्यकाळ पूर्ण होत आला असून, आता तरी याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा सावरकरप्रेमी स्वत:च या कामी पुढाकार घेण्याच्या तयारीत आहेत.नाशिकचे भूमिपुत्र असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये अध्ययन करत असतानाच मित्र मेळा ही संस्था स्थापन केली, पुढे तिचे नाव बदलून अभिनव भारत या संघटनेची स्थापना १९०४ मध्ये केली. नाशिकमधील तीळभांडेश्वरमध्ये त्याचे कार्यालय होते. ब्रिटिशांच्या विरोधात लढणारे अनेक क्रांतिकारी या संघटनेशी जोडलेले होते. देशभरात या संघटनेच्या अनेक शाखा त्याकाळी उघडल्या गेल्या आणि सावरकर लंडनमध्ये गेल्यानंतर तेथेदेखील अभिनव भारतचा प्रसार झाला. १९५२ मध्ये म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सावरकर यांनी स्वत:च या संघटनेचे कार्य आता संपल्याचे सांगून ती संघटना विसर्जित केली. नाशिकमध्ये असलेल्या संघटनेच्या कार्यालयाची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे त्याच्या नूतनीकरणाची गरज असतानाच पर्यटन खात्याच्या माध्यमातून अद्ययावत स्मारक करण्याचे ठरविण्यात आले. आमदार देवयानी फरांदे यांनी याकामी पुढाकार घेतला. परंतु आता सरकारची पाच वर्षे संपत आली तरी स्मारकासाठी निधीच उपलब्ध करून दिलेला नाही. विशेष म्हणजे अन्य अनेक धार्मिक संस्था, क्रीडा संस्थांना पर्यटन महामंडळाने निधी उपलब्ध करून दिल्यानंतर त्याचे कामही सुरू झाले आहे. सावरकर यांना मानणाऱ्या विचारांचे सरकार असूनही जर त्याचा विकास होत नसेल तर तसे स्पष्ट झाले पाहिजे, म्हणजे आता सावरकरप्रेमीच हे काम हाती घेतील, अशा प्रतिक्रिया सावरकरप्रेमींनी व्यक्त केल्या.

टॅग्स :BJPभाजपाNashikनाशिक