शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

‘अभिनव भारत’च्या स्मारकाची राज्य सरकारकडूनही उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 00:52 IST

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत संस्थेच्या वाड्याचे नूतनीकरण करून आधुनिक स्मारक साकारण्यासाठी यापूर्वी केवळ घोषणाच झाली असून, सार्वजनिक बांधकाम खात्याने पर्यटन मंत्रालयाला आराखडा सादर केला आहे.

नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत संस्थेच्या वाड्याचे नूतनीकरण करून आधुनिक स्मारक साकारण्यासाठी यापूर्वी केवळ घोषणाच झाली असून, सार्वजनिक बांधकाम खात्याने पर्यटन मंत्रालयाला आराखडा सादर केला आहे. मात्र, पर्यटन मंत्रालयाने निधीच न दिल्याने हा प्रस्ताव धूळखात पडला आहे. राज्य सरकारचा कार्यकाळ पूर्ण होत आला असून, आता तरी याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा सावरकरप्रेमी स्वत:च या कामी पुढाकार घेण्याच्या तयारीत आहेत.नाशिकचे भूमिपुत्र असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये अध्ययन करत असतानाच मित्र मेळा ही संस्था स्थापन केली, पुढे तिचे नाव बदलून अभिनव भारत या संघटनेची स्थापना १९०४ मध्ये केली. नाशिकमधील तीळभांडेश्वरमध्ये त्याचे कार्यालय होते. ब्रिटिशांच्या विरोधात लढणारे अनेक क्रांतिकारी या संघटनेशी जोडलेले होते. देशभरात या संघटनेच्या अनेक शाखा त्याकाळी उघडल्या गेल्या आणि सावरकर लंडनमध्ये गेल्यानंतर तेथेदेखील अभिनव भारतचा प्रसार झाला. १९५२ मध्ये म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सावरकर यांनी स्वत:च या संघटनेचे कार्य आता संपल्याचे सांगून ती संघटना विसर्जित केली. नाशिकमध्ये असलेल्या संघटनेच्या कार्यालयाची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे त्याच्या नूतनीकरणाची गरज असतानाच पर्यटन खात्याच्या माध्यमातून अद्ययावत स्मारक करण्याचे ठरविण्यात आले. आमदार देवयानी फरांदे यांनी याकामी पुढाकार घेतला. परंतु आता सरकारची पाच वर्षे संपत आली तरी स्मारकासाठी निधीच उपलब्ध करून दिलेला नाही. विशेष म्हणजे अन्य अनेक धार्मिक संस्था, क्रीडा संस्थांना पर्यटन महामंडळाने निधी उपलब्ध करून दिल्यानंतर त्याचे कामही सुरू झाले आहे. सावरकर यांना मानणाऱ्या विचारांचे सरकार असूनही जर त्याचा विकास होत नसेल तर तसे स्पष्ट झाले पाहिजे, म्हणजे आता सावरकरप्रेमीच हे काम हाती घेतील, अशा प्रतिक्रिया सावरकरप्रेमींनी व्यक्त केल्या.

टॅग्स :BJPभाजपाNashikनाशिक