शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

खरीप हंगामासाठी पाणी हवयं, मग चोरी नको रितसर अर्ज करा!

By अझहर शेख | Updated: August 6, 2023 18:43 IST

१५ ऑगस्ट अखेरची मुदत, शेतकरी, पाणी वापर संस्थांना देणार लाभ

अझहर शेख, नाशिक: खरीप हंगामासाठी पिकांना सिंचनाकरिता पाणीपुरवठा पाटबंधारे खात्याकडून केला जाणार आहे. नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, सिन्नर, दिंडोरी या पाच तालुक्यांकरिता ३३ टक्के पाणीसाठी उपलब्ध झाला आहे. यामुळे शेतकरी, पाणी वापर संस्थांनी येत्या १५ तारखेपर्यंत जवळच्या सिंचन शाखेत अर्ज सादर करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले आहे. नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील वरील पाच तालुक्यांमधील १९ लघु प्रकल्पातील व १० कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील ३३ टक्के पाणी उपलब्ध झाल्याने खरीप हंगाम २०२३-२४ करिता पिकांना सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

यावर्षी धरणात व लघु तलावांमध्ये जसजसा पाऊस पडून नवीन पाण्याचा साठा उपलब्ध होईल, त्या पाणीसाठ्याच्या अनुमानानुसार चालू खरीप हंगामातील विहिरीवरील पिके व पेरणी झालेली चारा पिके, अन्नधान्य, कडधान्य व तेलबियांची पिके यांना नमुना क्रमांक-७च्या अटी व शर्तीनुसार पाणी पुरविले जाणार आहे. सहकारी पाणीवापर संस्थेच्या लाभक्षेत्रात नमुना क्र-७ची मंजुरी आवश्यक राहणार नाही. या उपलब्ध होणाऱ्या पाण्यात तेलबिया व चारा पिकास प्राधान्य असणार असून पाण्याची उपलब्धता विचारात घेऊन मंजुरी देण्यात येईल.

...तर मंजुरी होऊ शकते रद्द

पाणीपुरवठा करतांना पाऊस कमी झाल्यास किंवा धरणातील पाणीसाठा कमी झाल्यास अथवा आपत्ती म्हणून पिण्याचे पाणी राखून ठेवण्याची आवश्यकता भासल्यास अशावेळी दिलेले परवाने व मंजुरी रद्द करण्यात येईल. याबाबत कोणतीही नुकसान भरपाई देण्यात येणार नाही अथवा त्याअनुषंगाने न्यायालयात दावा दाखल करता येणार नाही, याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी, असेही शहाणे यांनी स्पष्ट केले आहे.

पाणीचोरी खपवून घेणार नाही

शेतपीक सिंचनासाठी कालव्यांवरील मंजूर उपसाधारकांशिवाय अन्य कोणीही पाण्याचा उपसा अवैधमार्गाने करताना आढळून आल्यास पाटबंधारे खात्याकडून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा शहाणे यांनी दिला आहे. कालव्यांमध्ये पाणीचोरीसाठी कोणीही इलेक्ट्रिक मोटारी, डिझेल, ऑइल इंजिन ठेवून अथवा पाइपलाइन, डोंगले टाकून पाणी चोरी करू नये, असे करताना आढळून आल्यास साहित्य जप्ती भरारी पथकाद्वारे केली जाईल.

टॅग्स :Nashikनाशिक