शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

स्वातंत्र्याचे मोल तरुण पिढीला सांगण्याची गरज : सच्चिदानंद शेवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:50 IST

स्वातंत्र्य मिळाले नाही तर मिळविले असे तरुण पिढीला सांगण्याची गरज आहे. परंतु, तरुणांपुढे चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडला जात आहे. स्वातंत्र्याचे मोल तरुण पिढीला सांगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी सावरकर जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना केले.

नाशिक : स्वातंत्र्य मिळाले नाही तर मिळविले असे तरुण पिढीला सांगण्याची गरज आहे. परंतु, तरुणांपुढे चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडला जात आहे. स्वातंत्र्याचे मोल तरुण पिढीला सांगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी सावरकर जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना केले.  गंगापूररोड येथील शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ‘सावरकर : एक झंझावात’ या विषयावरील आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. शेवडे यांनी सांगितले, आजची तरुण पिढी ही पूर्णत: सोशल मीडियाच्या आहारी गेली आहे. त्यामुळे त्यांच्यात नैराश्यभाव वाढत चालला आहे. हे नैराश्य घालविण्यासाठी त्यांनी सावरकर आणि शिवचरित्राचे वाचन केले पाहिजे. सावरकर हे जे बोलायचे तेच कृतीत आणायचे. आजच्या पिढीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्यातून जीवन जगण्याची प्रेरणा घ्यायला हवी, परंतु चित्रपटातील नायक, नायिका यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवल्यामुळे देशाची संस्कृती रसातळाला जायला वेळ लागणार नाही. समाजातील स्वत्व आणि अस्मिता संपली की समाजाचा ºहास सुरू होतो. राष्ट्राचा इतिहास शाईने नाही, तर क्र ांतिकारकांच्या रक्त, अश्रू आणि घामाने लिहिला जातो. जिथे आपली मान लवेल असे आपले आदर्श हवेत, परंतु आज पायावर डोके ठेवता येईल असे आदर्श व्यक्तिमत्त्वच उरले नसल्याची खंतही डॉ. शेवडे यांनी व्यक्त केली. दरम्यान, मविप्र समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनीही सावरकरांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला. यावेळी राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक विजय कदम, अक्षय जोग उपस्थित होते. सूत्रसंचालन पद्माकर देशपांडे यांनी केले. किरण शेलार यांनी आभार मानले.

टॅग्स :Nashikनाशिक