शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

अर्थचक्र सुरू करताना संयमाची आवश्यकता

By कुलदीप घायवट  | Updated: June 6, 2021 00:39 IST

पहिल्या लाटेवर देशाने मात केल्याचे ढोल आम्ही जगभर वाजविले आणि दुसऱ्या लाटेने आपले हाल साऱ्या जगाने पाहिले, अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये असे वाटत असेल तर संयम अत्यंत आवश्यक आहे.

ठळक मुद्देप्रशासनाला जाग आली. पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थांचा या समितीत समावेश प्रवृत्तींना रोखण्याचा यशस्वी प्रयत्न

मिलिंद कुलकर्णीनाशिक जिल्हा रेडझोनमधून बाहेर पडला. पॉझिटीव्हीटी दर शहरात ३ टक्के तर ग्रामीण भागात ८ टक्के राहिल्याने राज्य शासनाच्या निकषांत बसल्याने निर्बंधामध्ये शिथीलता मिळाली. सामूहिक प्रयत्नांचे हे यश आहे. परंतु, अनलॉक होत असताना प्रशासन व समाज या दोन्ही घटकांनी संयम बाळगण्याची आवश्यकता आहे. अलीकडे घडलेल्या दोन घटना पाहता अशा संयमाची नितांत आवश्यकता अधोरेखित होते. निर्बंध शिथील झाल्यानंतर मोबाईल दुकानांसमोर लागलेल्या रांगा, दुपारी २ वाजल्यानंतरदेखील दुकाने सुरू राहणे... असा नियमभंग चुकीचा आहे. दीड वर्षांपासून व्यापारी व नागरिक निर्बंध सहन करत असल्याने अचानक असे होऊ शकते, हे मान्य केले तरी स्वनियमन व स्वनियंत्रण गरजेचे आहे. दुसरीकडे राज्यातील १८ जिल्ह्यांत अनलॉक करण्याचा मंत्री विजय वडेट्टीवार यांची घोषणा आणि त्यावर राज्य सरकारची वेगळीच भूमिका जाहीर होणे हा अंतर्विरोध दुर्दैवी आहे. त्यातून गोंधळ वाढतो. अर्थचक्राशी निगडित संवेदनशील विषयात शासकीय पातळीवर असा गोंधळ अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम करणारा आहे. त्यामुळे संयमाने परिस्थिती हाताळायला हवी. पहिल्या लाटेवर देशाने मात केल्याचे ढोल आम्ही जगभर वाजविले आणि दुसऱ्या लाटेने आपले हाल साऱ्या जगाने पाहिले. अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये असे वाटत असेल तर संयम अत्यंत आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन उपाययोजनांकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यायला हवी आणि लोकप्रतिनिधींनी त्याचा पाठपुरावा करायला हवा. कुठेही हलगर्जीपणा, निष्काळजीपणा होणार नाही, हे प्राधान्याने बघायला हवे. सध्या ७ हजार रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनातून बरे होण्याची जिल्ह्याची टक्केवारी ९६ टक्के अशी चांगली आहे. दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवत असताना बळींची संख्या का आटोक्यात येत नाही, हा चिंतेचा विषय आहे. ३० पेक्षा अधिक मृत्यू रोज होत आहेत. सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होत असताना आणि रुग्णसंख्या कमी होत असताना बळी का वाढत आहेत? रुग्णांची तपासणी वेळेवर होत नाही का?, रुग्ण वेळेवर रुग्णालयात दाखल होत नाही का? उशिरा रुग्ण आल्याने उपचाराला पुरेसा वेळ मिळत नाही का, हे गांभीर्याने शोधायला हवे.

अखेर प्रशासनाला आली जाग

ब्रह्मगिरी पर्वत वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी अभियान सुरू केल्यानंतर प्रशासनाला जाग आली. हालचाली सुरू झाल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यातील पर्यावरणरक्षणासाठी टास्क फोर्स गठीत केला, हे स्वागतार्ह पाऊल आहे. या टास्क फोर्सचे समन्वयक अपर जिल्हाधिकारी असतील. त्यात उपवनसंरक्षक, भूमिअभिलेख विभाग, नगररचना विभाग, वरिष्ठ भूवैज्ञानिक, प्रदूषण नियंत्रण मंडळ, मेरी, पुरातत्त्व विभाग, जिल्हा खनिकर्म विभाग या शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी सदस्य म्हणून समाविष्ट आहेत. पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था तसेच क्रेडाई, नरेडको या संस्थांचे पदाधिकारी सहभागी होतील. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील अशा डोंगररांगा, टेकड्या, जंगले, गड, किल्ले याठिकाणी उत्खनन होऊ नये. पर्यावरण संतुलन राखत समतोल व स्थायी विकास साधण्याचा प्रयत्न या टास्क फोर्समार्फत करण्याचा प्रशासनाचा निर्धार आहे. त्यासाठी दर तीन महिन्याने बैठक घेण्यात येणार आहे. ह्यआणखी एक समिती आणि औपचारिक बैठकाह्ण असे या टास्क फोर्सचे होऊ नये, एवढीच अपेक्षा आहे. प्रशासनाने अभियानाची दखल घेण्यामागे जनमानसाचा रेटादेखील कारणीभूत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी बचाव समिती गठीत केली. पर्यावरण अभ्यासक देवचंद महाले हे समितीचे प्रवक्ते असणार आहे. पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थांचा या समितीत समावेश आहे. जलतज्ज्ञ राजेंद्रसिंहदेखील या अभियानात सहभागी झाले. गोदावरीच्या उगमाला धोका निर्माण झाल्यास गोदावरी प्रवाहित होत असलेल्या सहा राज्यांत परिणाम संभवत असल्याने तेथे जनचळवळ उभारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. ब्रह्मगिरीच्या बचावाचा हा मुद्दा आता राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. केवळ राज्य सरकार नव्हे तर केंद्र सरकारनेदेखील या प्रश्नात लक्ष घालायला हवे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी या अभियानाची दखल घेऊन पाठपुरावा करायला हवा. हे अभियान गतिमान होणे म्हणजे विकासाच्या नावाखाली विनाश घडवून आणणाऱ्या प्रवृत्तींना रोखण्याचा यशस्वी प्रयत्न म्हणून त्याची दखल घेतली जाईल.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या