शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अर्थचक्र सुरू करताना संयमाची आवश्यकता

By कुलदीप घायवट  | Updated: June 6, 2021 00:39 IST

पहिल्या लाटेवर देशाने मात केल्याचे ढोल आम्ही जगभर वाजविले आणि दुसऱ्या लाटेने आपले हाल साऱ्या जगाने पाहिले, अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये असे वाटत असेल तर संयम अत्यंत आवश्यक आहे.

ठळक मुद्देप्रशासनाला जाग आली. पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थांचा या समितीत समावेश प्रवृत्तींना रोखण्याचा यशस्वी प्रयत्न

मिलिंद कुलकर्णीनाशिक जिल्हा रेडझोनमधून बाहेर पडला. पॉझिटीव्हीटी दर शहरात ३ टक्के तर ग्रामीण भागात ८ टक्के राहिल्याने राज्य शासनाच्या निकषांत बसल्याने निर्बंधामध्ये शिथीलता मिळाली. सामूहिक प्रयत्नांचे हे यश आहे. परंतु, अनलॉक होत असताना प्रशासन व समाज या दोन्ही घटकांनी संयम बाळगण्याची आवश्यकता आहे. अलीकडे घडलेल्या दोन घटना पाहता अशा संयमाची नितांत आवश्यकता अधोरेखित होते. निर्बंध शिथील झाल्यानंतर मोबाईल दुकानांसमोर लागलेल्या रांगा, दुपारी २ वाजल्यानंतरदेखील दुकाने सुरू राहणे... असा नियमभंग चुकीचा आहे. दीड वर्षांपासून व्यापारी व नागरिक निर्बंध सहन करत असल्याने अचानक असे होऊ शकते, हे मान्य केले तरी स्वनियमन व स्वनियंत्रण गरजेचे आहे. दुसरीकडे राज्यातील १८ जिल्ह्यांत अनलॉक करण्याचा मंत्री विजय वडेट्टीवार यांची घोषणा आणि त्यावर राज्य सरकारची वेगळीच भूमिका जाहीर होणे हा अंतर्विरोध दुर्दैवी आहे. त्यातून गोंधळ वाढतो. अर्थचक्राशी निगडित संवेदनशील विषयात शासकीय पातळीवर असा गोंधळ अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम करणारा आहे. त्यामुळे संयमाने परिस्थिती हाताळायला हवी. पहिल्या लाटेवर देशाने मात केल्याचे ढोल आम्ही जगभर वाजविले आणि दुसऱ्या लाटेने आपले हाल साऱ्या जगाने पाहिले. अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये असे वाटत असेल तर संयम अत्यंत आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन उपाययोजनांकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यायला हवी आणि लोकप्रतिनिधींनी त्याचा पाठपुरावा करायला हवा. कुठेही हलगर्जीपणा, निष्काळजीपणा होणार नाही, हे प्राधान्याने बघायला हवे. सध्या ७ हजार रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनातून बरे होण्याची जिल्ह्याची टक्केवारी ९६ टक्के अशी चांगली आहे. दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवत असताना बळींची संख्या का आटोक्यात येत नाही, हा चिंतेचा विषय आहे. ३० पेक्षा अधिक मृत्यू रोज होत आहेत. सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होत असताना आणि रुग्णसंख्या कमी होत असताना बळी का वाढत आहेत? रुग्णांची तपासणी वेळेवर होत नाही का?, रुग्ण वेळेवर रुग्णालयात दाखल होत नाही का? उशिरा रुग्ण आल्याने उपचाराला पुरेसा वेळ मिळत नाही का, हे गांभीर्याने शोधायला हवे.

अखेर प्रशासनाला आली जाग

ब्रह्मगिरी पर्वत वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी अभियान सुरू केल्यानंतर प्रशासनाला जाग आली. हालचाली सुरू झाल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यातील पर्यावरणरक्षणासाठी टास्क फोर्स गठीत केला, हे स्वागतार्ह पाऊल आहे. या टास्क फोर्सचे समन्वयक अपर जिल्हाधिकारी असतील. त्यात उपवनसंरक्षक, भूमिअभिलेख विभाग, नगररचना विभाग, वरिष्ठ भूवैज्ञानिक, प्रदूषण नियंत्रण मंडळ, मेरी, पुरातत्त्व विभाग, जिल्हा खनिकर्म विभाग या शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी सदस्य म्हणून समाविष्ट आहेत. पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था तसेच क्रेडाई, नरेडको या संस्थांचे पदाधिकारी सहभागी होतील. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील अशा डोंगररांगा, टेकड्या, जंगले, गड, किल्ले याठिकाणी उत्खनन होऊ नये. पर्यावरण संतुलन राखत समतोल व स्थायी विकास साधण्याचा प्रयत्न या टास्क फोर्समार्फत करण्याचा प्रशासनाचा निर्धार आहे. त्यासाठी दर तीन महिन्याने बैठक घेण्यात येणार आहे. ह्यआणखी एक समिती आणि औपचारिक बैठकाह्ण असे या टास्क फोर्सचे होऊ नये, एवढीच अपेक्षा आहे. प्रशासनाने अभियानाची दखल घेण्यामागे जनमानसाचा रेटादेखील कारणीभूत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी बचाव समिती गठीत केली. पर्यावरण अभ्यासक देवचंद महाले हे समितीचे प्रवक्ते असणार आहे. पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थांचा या समितीत समावेश आहे. जलतज्ज्ञ राजेंद्रसिंहदेखील या अभियानात सहभागी झाले. गोदावरीच्या उगमाला धोका निर्माण झाल्यास गोदावरी प्रवाहित होत असलेल्या सहा राज्यांत परिणाम संभवत असल्याने तेथे जनचळवळ उभारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. ब्रह्मगिरीच्या बचावाचा हा मुद्दा आता राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. केवळ राज्य सरकार नव्हे तर केंद्र सरकारनेदेखील या प्रश्नात लक्ष घालायला हवे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी या अभियानाची दखल घेऊन पाठपुरावा करायला हवा. हे अभियान गतिमान होणे म्हणजे विकासाच्या नावाखाली विनाश घडवून आणणाऱ्या प्रवृत्तींना रोखण्याचा यशस्वी प्रयत्न म्हणून त्याची दखल घेतली जाईल.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या