शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

महादेवनगरातील जुन्या भूमिगत गटारी बदलण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 00:22 IST

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राबविण्यात आलेल्या शौचालयांची योजना सातपूर परिसरातील महादेववाडीत चांगल्या पद्धतीने राबविण्यात आली आहे. मात्र या शौचालयांचे आउटलेट जुन्या असलेल्या भूमिगत गटारींना जोडल्याने या गटारी तुंबल्याचे प्रमाण वाढत आहे.

सातपूर : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राबविण्यात आलेल्या शौचालयांची योजना सातपूर परिसरातील महादेववाडीत चांगल्या पद्धतीने राबविण्यात आली आहे. मात्र या शौचालयांचे आउटलेट जुन्या असलेल्या भूमिगत गटारींना जोडल्याने या गटारी तुंबल्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली असून, घरात शौचालय असून वापरता येत नसल्याने कुटुंबीयांची फरफट होत आहे.महादेवनगरातील जुन्या भूमिगत गटारी बदलून मोठ्या व्यासाची पाइपलाइन टाकणे अत्यंत गरजेचे झाले आहे. विशेषत: सातपूर बसस्टँडच्या आवाराचा शौचालयासाठी वापर केला जात होता. यात वयोवृद्ध महिला, तरु णी यांची मोठी हेळसांड होत होती. महादेवनगरात शौचालय उभारणीसाठी जागा उपलब्ध होत नव्हती. महानगरपालिकेने या वसाहतीत हागणदारीमुक्त योजनादेखील राबविली होती. शौचालयासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता ओलांडून जावे लागत असल्याने अनेक वेळा अपघातदेखील झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. दरम्यान, महानगरपालिकेने एका कोपऱ्यात सुलभ शौचालय उभारून दिलेले आहे. पैसे देऊन या शौचालयाचा वापर करावा लागत असल्याचे रामेश्वर गायकवाड यांचे म्हणणे आहे.या भूमिगत गटारी फार पूर्वीच्या आणि कमी व्यासाच्या पाइपलाइन असल्याने तुंबण्याचे प्रमाण वाढले. गटारी तुंबू लागल्याने घरात दुर्गंधी पसरू लागली. परिणामी घरात शौचालय असून, वापरता येणे अवघड झाले आहे. म्हणून काहींनी पुन्हा उघड्यावर जाणे पसंत केले आहे. अन्यथा पैसे देऊन सुलभ शौचालयाचा वापर करावा लागत आहे. काही लोकांना प्रत्येकवेळी पैसे देणे परवडत नाही. जुन्या झालेल्या भूमिगत पाइपलाइन बदलण्याची मागणी उषा खरात, बाळू खैरे यांनी केली आहे.या भागात नंदिनी नदीकाठी अनेक वर्षांपूर्वी दोन ठिकाणी महानगरपालिकेने सार्वजनिक शौचालय उभारलेले आहेत. परंतु या शौचालयांची देखील मोडतोड झाल्याने साफसफाई अभावी कोणीही वापर करीत नसल्याचे आयेशा शेख, कल्पना सोनवणे यांचे म्हणणे आहे. प्रचंड दुर्गंधी पसरत असल्याने रोगराई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या वसाहतीतील पथदीपांवरील बल्बचा उजेड फारच कमी पडत असल्याने एलइडी बल्ब बसविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या भागात तत्कालीन नगरसेवक अ‍ॅड. वसुधा कराड यांच्या नगरसेवक निधीतून समाजमंदिर उभारण्यात आलेले आहे. या समाजमंदिराचे अद्याप लोकार्पण झालेले नाही. लाखो रु पये खर्चून बांधण्यात आलेल्या समाजमंदिराचा वापर गर्दुल्यांसाठी आणि शौचालयासाठी होत असल्याचे धोंडिबा गायकवाड यांनी सांगितले़ चढ-उतार असल्याने या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. उतार असलेल्या भागात मुबलक पाणी मिळते, तर चढ असलेल्या भागात पाणी मिळत नाही. डास फवारणीसाठी कोणीही कर्मचारी या भागात फिरकत नसल्याची तक्रार मुरलीधर चव्हाण यांनी केली आहे.वसाहतीत मुख्य समस्या शौचालयाचीनाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील सातपूर गावालगत प्रभाग क्र मांक ११ मध्ये महादेवनगर वसाहत आहे.जवळपास पाच हजार लोकसंख्या असलेल्या या वसाहतीतील संपूर्ण रस्ते सीमेंट काँक्र ीटचे बनविण्यात आलेलेआहेत. तरीही काही समस्या अजूनही मूळ धरून आहेत. या वसाहतीत मूळ समस्या शौचालयाची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील रहिवाशांना शौचालयासाठी उघड्यावर जावे लागत होते. त्यामुळे शौचालयाची मागणी करण्यात येत आहे.केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत घराघरांमध्ये शौचालयांची योजना आणली. महानगरपालिकेने महादेवनगरात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली. येथील नागरिकांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला. घरात शौचालय आले खरे, पण आउटलेटची सोय मात्र करण्यात आली नाही. म्हणून नागरिकांनी भूमिगत असलेल्या सांडपाण्याच्या गटारी या शौचालयांचे आउटलेट जोडून घेतले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक