शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
2
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
3
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
4
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
5
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
6
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
7
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
8
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
9
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
10
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
11
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
12
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
13
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
14
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
15
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
16
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
17
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
18
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
19
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
20
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
Daily Top 2Weekly Top 5

नद्यांचे प्रदूषण रोखणे गरजेचे

By admin | Updated: September 2, 2015 23:53 IST

मुन्वर सलीम चौधरी : शंकराचार्य मठात पाणी परिषद

पंचवटी : भारतीय संस्कृतीत नद्यांना खूप महत्त्व असून, नद्यांमुळेच भारतीय संस्कृती टिकून आहे. देशाबाहेर गेल्यानंतर आपली ओळख नद्यांमुळे होत असल्याने नद्यांचे प्रदूषण रोखणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार मुन्वर सलीम चौधरी यांनी केले. तपोवनातील सेक्टर येथील पुरी पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामी श्री अधोक्षजानंद देवतीर्थ महाराज यांच्या मठात आयोजित पाणी परिषदेत ते बोलत होते. व्यासपीठावर जगद्गुरू शंकराचार्य अधोक्षजानंद देवतीर्थ महाराज, निर्माेही आखाड्याचे महंत राजेंद्रदास महाराज, १०८ श्री श्री हरिचैतन्य ब्रम्हचारी महाराज आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना चौधरी यांनी पुढे सांगितले की, गंगा गोदावरीची शुद्धता तसेच पवित्रता टिकवून ठेवणे गरजेचे आहे. विकासाच्या नावाखाली नद्यांमध्ये दूषित पाणी मिसळले जाते. अनेक ठिकाणच्या नदीपात्रालगत भूमाफियांनी अतिक्रमण केले आहे. नद्यांची गणना व त्यांचे क्षेत्र निश्चित केले जावे यासाठी अनेकदा राज्यसभेत मुद्दा मांडला आहे. आगामी कालावधीत नवा भारत बनविण्यासाठी स्वत:च नद्यांचे तसेच पाण्याचे संरक्षण करणे गरजेचे असून कोणताही जातिभेद न करता देशात जनजागृती करण्यासाठी सर्वांनी पाणी वापर, नद्यांचे संरक्षण व नद्यांचे पावित्र्य टिकविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले. जगद्गुरू अधोक्षजानंद देवतीर्थ महाराज यांनी पूर्वी नदीकाठच्या परिसरात कुंभमेळा भरायचा, आता कुंभमेळ्यासाठी महिनाभर अगोदर पाणी मागवावे लागते. नद्यांमुळेच कुंभमेळ्याची ओळख असून सर्वच भागात नद्यांची परिस्थिती जैसे थे आहे. ज्या गोदावरी नदीमुळे कुंभमेळा होतो ती गोदावरी आज प्रदूषित झालेली आहे. शासनाने नद्यांच्या बाबतीत खोटे बोलू नये. नद्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी नागरिक व शासनाची आहे, म्हणून नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे सांगितले. हरिचैतन्य महाराज यांनी पाणी बचत करतानाच नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यास कुंभमेळ्याच्या माध्यमातून देशभरात चांगला संदेश जाईल असे सांगितले. तर महंत राजेंद्रदास यांनी येणाऱ्या काळात नागरिकांनी जागृत राहून नद्यांचे संरक्षण करण्याची गरज असल्याचे मत मांडले. यावेळी लक्ष्मण मंडाले, सूर्यकांत रहाळकर, झेंडा महाराज, राजेश पंडित, धीरज बच्छाव, सुभाष सूर्यवंशी आदिंसह नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)