शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय?
2
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
3
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
4
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
5
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
6
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
7
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
8
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
9
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
10
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
11
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
12
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
13
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
14
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
15
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
16
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
17
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
18
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
19
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
20
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

नद्यांचे प्रदूषण रोखणे गरजेचे

By admin | Updated: September 2, 2015 23:53 IST

मुन्वर सलीम चौधरी : शंकराचार्य मठात पाणी परिषद

पंचवटी : भारतीय संस्कृतीत नद्यांना खूप महत्त्व असून, नद्यांमुळेच भारतीय संस्कृती टिकून आहे. देशाबाहेर गेल्यानंतर आपली ओळख नद्यांमुळे होत असल्याने नद्यांचे प्रदूषण रोखणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार मुन्वर सलीम चौधरी यांनी केले. तपोवनातील सेक्टर येथील पुरी पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामी श्री अधोक्षजानंद देवतीर्थ महाराज यांच्या मठात आयोजित पाणी परिषदेत ते बोलत होते. व्यासपीठावर जगद्गुरू शंकराचार्य अधोक्षजानंद देवतीर्थ महाराज, निर्माेही आखाड्याचे महंत राजेंद्रदास महाराज, १०८ श्री श्री हरिचैतन्य ब्रम्हचारी महाराज आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना चौधरी यांनी पुढे सांगितले की, गंगा गोदावरीची शुद्धता तसेच पवित्रता टिकवून ठेवणे गरजेचे आहे. विकासाच्या नावाखाली नद्यांमध्ये दूषित पाणी मिसळले जाते. अनेक ठिकाणच्या नदीपात्रालगत भूमाफियांनी अतिक्रमण केले आहे. नद्यांची गणना व त्यांचे क्षेत्र निश्चित केले जावे यासाठी अनेकदा राज्यसभेत मुद्दा मांडला आहे. आगामी कालावधीत नवा भारत बनविण्यासाठी स्वत:च नद्यांचे तसेच पाण्याचे संरक्षण करणे गरजेचे असून कोणताही जातिभेद न करता देशात जनजागृती करण्यासाठी सर्वांनी पाणी वापर, नद्यांचे संरक्षण व नद्यांचे पावित्र्य टिकविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले. जगद्गुरू अधोक्षजानंद देवतीर्थ महाराज यांनी पूर्वी नदीकाठच्या परिसरात कुंभमेळा भरायचा, आता कुंभमेळ्यासाठी महिनाभर अगोदर पाणी मागवावे लागते. नद्यांमुळेच कुंभमेळ्याची ओळख असून सर्वच भागात नद्यांची परिस्थिती जैसे थे आहे. ज्या गोदावरी नदीमुळे कुंभमेळा होतो ती गोदावरी आज प्रदूषित झालेली आहे. शासनाने नद्यांच्या बाबतीत खोटे बोलू नये. नद्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी नागरिक व शासनाची आहे, म्हणून नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे सांगितले. हरिचैतन्य महाराज यांनी पाणी बचत करतानाच नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यास कुंभमेळ्याच्या माध्यमातून देशभरात चांगला संदेश जाईल असे सांगितले. तर महंत राजेंद्रदास यांनी येणाऱ्या काळात नागरिकांनी जागृत राहून नद्यांचे संरक्षण करण्याची गरज असल्याचे मत मांडले. यावेळी लक्ष्मण मंडाले, सूर्यकांत रहाळकर, झेंडा महाराज, राजेश पंडित, धीरज बच्छाव, सुभाष सूर्यवंशी आदिंसह नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)