शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

औद्योगिक विकासासाठी पोषक कायद्यांची गरज

By admin | Updated: May 8, 2015 23:48 IST

अविनाश चिंतावार : निमाच्या वतीने कार्यशाळा उत्साहात

सातपूर : औद्योगिक क्षेत्रासाठी लागणारे सर्व प्रकारचे पोेषक वातावरण नाशिकमध्ये आहे. तथापि, नाशिकचा औद्योगिक विकास वेगाने व्हावा यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. त्याचप्रमाणे प्रस्तावित कामगार आणि औद्योगिक कायद्यात बदल करताना हे कायदे सुटसुटीत असावे, असे मत बॉश कंपनीचे उपाध्यक्ष अविनाश चिंतावार यांनी व्यक्त केले.निमाच्या वतीने औद्योगिक संबंधांतील आव्हाने आणि कामगार कायद्यातील प्रस्तावित बदल या विषयावरील कार्यशाळा गेट वे येथे पार पडली. यावेळी उद््घाटन कार्यक्रमात चिंतावार बोलत होते. औद्योगिक संबंध सांभाळणे ही एक कला आहे. ही जबाबदारी सांभाळताना मोठी कसरत करावी लागते. नाशिकमध्ये औद्योगिक वातावरण चांगले आहे; परंतु शहराचा अपेक्षित विकास झालेला नाही. उद्योग क्षेत्राला लागणारे कुशल मनुष्यबळ आणि अन्य सुविधा असूनही अद्याप त्याचा उपयोग झालेला नाही. त्यामुळे त्यादृष्टीने विचार केला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. इप्कॉस कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष एच. एस. बॅनर्जी यांनी औद्योगिक विकासासाठी कामगार संघटना, उद्योजक आणि शासकीय अधिकारी एकाच व्यासपीठावर बोलवून मुक्त चर्चा झाली पाहिजे. अशा चर्चेतून सकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते. आपल्या देशात कामगार हे माफक दरात उपलब्ध होतात तरीही आपण मागे आहोत. सद्यस्थितीत असलेले कामगार आणि औद्योगिक कायदे सुस्पष्ट नाहीत ते अधिक स्पष्ट केले पाहिजेत, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक निमाचे अध्यक्ष रवि वर्मा यांनी केले. निमाच्या एच आर समितीचे अध्यक्ष मोहन पाटील यांनी औद्योगिक परिस्थिती विशद केली. मंगेश पाटणकर उपस्थित होते.