शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

बालसाहित्यात आधुनिकतेचा सूर आवश्यक : किरण केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:43 IST

नाशिक : बालसाहित्यातून अजूनही झुक झुक आगीन गाडीचे चित्र जात नाही. यात काळाप्रमाणे बदल होणे अपेक्षित असून, बालमनाच्या वेगासोबतच ...

नाशिक : बालसाहित्यातून अजूनही झुक झुक आगीन गाडीचे चित्र जात नाही. यात काळाप्रमाणे बदल होणे अपेक्षित असून, बालमनाच्या वेगासोबतच बालसाहित्यिकांनीही त्यांच्या कल्पक तेत बदल करून आपल्या साहित्यातून आधुनिकतेचा नावीन्यपूर्ण सूर उमटविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन बालभारतीच्या किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांनी केले.कालिकादेवी मंदिराच्या सभागृहात शनिवारी (दि.२९) साहित्यिक तथा कवी संजय वाघ लिखित ‘गाव मामाचं हरवलं’ या बालकाव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख तथा साहित्य समीक्षक डॉ. रणधीर शिंदे, ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल, कालिकादेवी संस्थानचे अध्यक्ष केशव पाटील, ज्येष्ठ साहित्यिक रामदास वाघ उपस्थित होते. अध्यक्षस्थानी हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी होते. यावेळी केंद्रे म्हणाले, अवांतर वाचनाशिवाय शिक्षण प्रक्रिया अपुरी आहे. पुस्तक मुलांचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. उद्याची पिढी घडवायची असेल तर आजच मुलांमध्ये बालसाहित्याची गोडी निर्माण करावी लागेल, त्यासाठी बालसाहित्यिकांनी त्याच जुन्या कथा, कवितांच्या कल्पनांतून बाहेर पडण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. लेखक संजय वाघ यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. श्रावणी गिते हिने काव्यसंग्रहातील ‘माय करुणासागर, माय वात्सल्य घागर’ कवितेचे सादरीकरण के ले. प्रास्ताविक प्रा. शंकर बोºहाडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. राहुल पाटील यांनी केले. प्रकाशक सुनील वाघ यांनी आभार मानले.बालसाहित्यात अधिक वास्तविकतेची गरजसामाजिक, कौटुंबिक विखुरलेपण आणि नागरीकरणाच्या वाढत्या कोलाहलात खरोखरच मामाचे गाव हरवून गेले आहे. मामाचे गाव ही संस्काराची शिदोरी देणारी संस्कृती असते. पण उद्याचे भविष्य घडविणाऱ्या अलिकडच्या बाल साहित्यात पुरेशा ताकदीने हे संस्कार व वास्तविकता येत नाही. संजय वाघ यांच्या कवितांमधून यादृष्टीने सूर मिळण्याची अपेक्षा किरण अग्रवाल यांनी यावेळी व्यक्त केली.सध्याच्या साहित्यिकांचे बालवाङमयाकडे दुर्लक्ष होत आहे. लहान मुलांना मनोरंजक पद्धतीने त्यांच्याशी संवाद साधू शकेल, असे बालसाहित्य उपलब्ध होत नाही. त्यामुळे मुलांचे डोळे कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि मोबाइलवर स्थिरावले आहे. यातून त्यांना बाहेर काढायचे असेल तर मुलांच्या मनाला पडणाºया विविध प्रश्नांची उत्तरे बालसाहित्यातून त्यांना मिळणे आवश्यक आहे.- डॉ. रणधीर शिंदे, समीक्षक

टॅग्स :Nashikनाशिक