शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
3
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
4
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
5
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
6
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
7
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
8
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
9
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
10
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
11
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
12
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
13
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
14
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
15
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
16
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
17
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
18
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
19
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
20
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या

इंटरनेटच्या वापरावर स्वयंनिर्बंध घालण्याची गरज; इंटरनेटतज्ज्ञ भाग्यश्री केंगे यांचे मत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 14:05 IST

नाशिक- अन्न, वस्त्र निवाऱ्या इतकीच इंटरनेट ही मुलभूत गरज बनली आहे. लाॅकडाऊनमध्ये तर त्याचे महत्व अधिक अधोरेखीत झाले आहे. मात्र, इंटरनेटच्या वापराचे दुष्परिणाम देखील समोर आले आहेत. आजार आणि मानवी स्वभावातील बदल तर आहेच परंतु त्यातून मनुष्यबळाच्या उत्पादकतेवर देखील प्रतिकुल परीणाम होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे  इंटरनेट हे दुधारी शस्त्र बनले आहेत, त्याचा वापर स्वयंशिस्त आणि स्वयनिर्बंधातून करावा असे मत इंटरनेट तज्ज्ञ भाग्यश्री केंगे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देआज जागतिक इंटरनेट डेलॉकडाऊनमध्ये प्रचंड वापर वाढलागैरप्रकारातही वाढ

नाशिक- अन्न, वस्त्र निवाऱ्या इतकीच इंटरनेट ही मुलभूत गरज बनली आहे. लाॅकडाऊनमध्ये तर त्याचे महत्व अधिक अधोरेखीत झाले आहे. मात्र, इंटरनेटच्या वापराचे दुष्परिणाम देखील समोर आले आहेत. आजार आणि मानवी स्वभावातील बदल तर आहेच परंतु त्यातून मनुष्यबळाच्या उत्पादकतेवर देखील प्रतिकुल परीणाम होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे  इंटरनेट हे दुधारी शस्त्र बनले आहेत, त्याचा वापर स्वयंशिस्त आणि स्वयनिर्बंधातून करावा असे मत इंटरनेट तज्ज्ञ भाग्यश्री केंगे यांनी व्यक्त केले.

आज जागतिक इंटरनेट डे आहे. अमेरिकेत २९ ऑक्टेाबर १९६९ रोजी ऑक्टोबर रोजी चार्ली क्लाईन या विद्यार्थ्याने पहिला इलेक्ट्रॉनिक मॅसेज पाठवला. त्याने पाठवलेली लॉगीन हा मॅसेज पुर्णत: पोहोचला नाही तर अवघी दोन अक्षरे पोहोचली. परंतु तरीही या घटनेची स्मृती जपण्यासाठी दरवर्षी २९ ऑक्टोबर रोजी जागतिक इंटरनेट डे साजरा केला जातो. त्यानिमित्ताने इंटरनेट तज्ज्ञ भाग्यश्री केंगे यांच्याशी साधलेला संवाद..

प्रश्न- इंटरनेटचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे, त्याविषयी काय सांगाल?केंगे- इंटरनेटचे महत्व होतेच, परंतु आता सेाशल मिडीयाचा आधार म्हणून तो वाढत गेला. लॉकडाऊनमध्ये तर इंटरनेटचे महत्व अधिकच वाढले. बँकेसह सर्व ऑनलाईन व्यवहार, ऑनलाईन ऑफीस आणि ऑनलाईन शिक्षण यामुळे इंटरनेट खूपच उपयुक्त ठरल्याचे दिसले. मुलांचे शिक्षण अशाप्रकारे झाल्याने त्यांना प्रथमच पालकांनी त्यांना मोबाईल स्वत:हून दिला. इंटरनेट किती प्रकारे उपयुक्त ठरू शकतो, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात इंटरनेटचा वापर कैकपटीने वाढल्याचे दिसले.

प्रश्न- इंटरनेटच्या अतिवापरामुळे काही दुष्परीणाम देखील झाले..केंगे- होय. इंटरनेटचा वापर हे सुयोग्य असले तरी अती वापर झाल्याने दुधारी शस्त्र आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. विशेषत इंटरनेटमुळे सोशल मिडीयावर तास न तास राहणारे नागरीक तयार झाले. सोशल मिडीयावर एखाद्याने चॅलेंज केले तर त्याला प्रतिसाद देण्याची एक इर्षा निर्माण झाली. मुलांचाही अतिवापर वाढला. जे आई वडील मुलांना मोबाईल हातात देत नव्हते त्यांनीच मुलांच्या हाती मोबाईल सोपवले. ज्येष्ठ नागरीकांकडे भरपूर मोकळा वेळ असल्याने ते देखील खूपच इंटरनेट वापर करीत असल्याचे आढळले. नोकरदारांनी वर्क फ्रॉम हेाम केले मात्र ते करताना दुसरी साईट किंवा सोशल मिडीयाचा वापर देखील झाला. अशावेळी काम करताना प्रॉडक्टीव्हीटीवर प्रतिकुल परीणाम झाल्याचे देखील आढळले.  त्यामुळे एकंदरच इंटरनेटमुळेच व्याया होणारा वेळ, स्वभावातील बदल आणि शारिरीक विकार  अशा प्रकारचे दुष्परीणाम आढळले आहेत.

प्रश्न- इंटरनेटचा वापर खूपच वाढतो आहे, त्यावर काही मर्यादा घालता येईल का?केंगे- इंटरनेटचा अमर्याद वापर कुठे तरी थांबायला हवा. वेळ घालवण्यासाठी सेाशल मिडीयाचा वापर करताना दुसरीकडे मात्र, त्याचा गरज नसताना केला जाणारा वापर अधिक आहे. त्यामुळे इंटरनेटच्या वापरावर स्वयंनिर्बंध हवेत.

मुलाखत - संजय पाठक

टॅग्स :Nashikनाशिकtechnologyतंत्रज्ञानInternetइंटरनेट