शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

कट प्रॅक्टीस विरोधी कायद्यापेक्षा शासकिय आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची गरज: शाम अष्टेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:36 IST

अशाप्रकारच्या कायद्यांनी काही फरक पडणार नाही. मुळातच कायदा केल्याने व्यवस्था सुधारू शकते. परंतु प्रवृत्ती नाही असे मला वाटते. जर एखाद्या माणसाची सवयच वेगळी असेल तर त्याला कायदा काय करणार, त्यापेक्षा सरकारने अन्य पर्याय शोधले पाहिजे.

ठळक मुद्दे सवयच वेगळी असेल तर त्याला कायदा काय करणारसरकारच्या आरोग्य सेवा सक्षम झाल्या पाहिजेत.

नाशिक- आरेग्य क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करणारे आणि ग्रामीण आरोग्य सेवेचा गाढा अभ्यास असलेले डॉ. शाम विनायक अष्टेकर हे महाराष्टÑाला सुपरिचीत आहेत वीस वर्षाहून अधिक काळ त्यांचा शेतकरी संघटनेशी संबंध राहीला आहे. बीजे मेडीकलमधून एम डी पदवी घेतल्यानंतर त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आशा समितीवर देखील काम केले आहे. इंग्लड आणि जर्मनीत त्यांनी अभ्यास दौरे केले आहेत. तसेच चीन आणि फिलीपाईन्स भारतात मध्य प्रदेश व छत्तीसगढ येथील आरोग्य सेवेवर त्यांचा अभ्यास आहे. राज्य सरकारच्या वतीने कट प्रॅक्टीस विरोधी कायदा करण्यात येणार असून त्यासंदर्भात त्यांनी परखड मते व्यक्त केली.प्रश्न- राज्य सरकारच्या वतीने वैद्यकिय व्यवसायिकांच्या कट प्रॅक्टीस विरोधी कायदा बनवण्याच्या प्रयत्नाबद्दल काय वाटते?अष्टेकर: मला वाटते अशाप्रकारच्या कायद्यांनी काही फरक पडणार नाही. मुळातच कायदा केल्याने व्यवस्था सुधारू शकते. परंतु प्रवृत्ती नाही असे मला वाटते. जर एखाद्या माणसाची सवयच वेगळी असेल तर त्याला कायदा काय करणार, त्यापेक्षा सरकारने अन्य पर्याय शोधले पाहिजे.प्रश्न: मग, शासनाने काय केले पाहिजे असे वाटते?अष्टेकर: मुळात रूग्ण हे शासकिय आरोग्य केंद्रांकडे गेले पाहिजेत. त्यासाठी आरोग्य व्यवस्था सुधारली पाहिजे. सध्या केंद्र ्रसरकारने आयुष्यमान भारत आणि प्रधानमंत्री आरोग्य विमान या दोन चांगल्या योजना आणल्या आहेत त्यातून आजारपणातील गणित जमले की मग खासगी सेवेकडे जाण्याची गरज पडणार नाही, असे वाटते.प्रश्न: सरकारच्या आरोग्य सेवेविषयी काय मत आहे.अष्टेकर: सरकारच्या आरोग्य सेवा सक्षम झाल्या पाहिजेत. तसेच त्यात पारदर्शकता आली पाहिजेत. राज्य आणि केंद्राने काही जुन्या योजनांची नावे बदलली असली तरी आरोग्य विम्याच्या किंवा भरपाईच्या योजना चांगल्या आहेत. मुळात जर एखादे काम एक लाख रूपयांच्या आरोग्य विम्यात होत असेल तर आकारण कोणी खासगी व्यवसायिकांकडे जाणे शक्यच नाही. त्यावरच भर दिला पाहिजे. शासकिय आरोग्य सेवा सक्षम झाल्या तर कोणी खासगी सेवेकडे वळणार नाही.मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :NashikनाशिकState Governmentराज्य सरकारMedicalवैद्यकीयHealthआरोग्यdocterडॉक्टर