शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना प्रक्रीया उद्योगाकडे वळविण्याची गरज : महेश झगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 20:12 IST

जिल्हा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आणि शेतीसंदर्भातील नवनवीन तंत्रज्ञानाचे आदान प्रदाण होणो अपेक्षित आहे. त्यासोबतच उत्पादित कृषीमालाला योग्य दर मिळणून देण्यासाठी बाजारपेठेची व्याप्ती वाढवून कृषी उद्योगाला नवी दिशा देताना शेतकऱ्यांना अन्न प्रक्रीया उद्योगाकडे वळविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.

ठळक मुद्देनाशिक जिल्हा कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन महेश झगडे यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शनअन्न प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याचे आवाहन

नाशिक : जिल्हा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आणि शेतीसंदर्भातील नवनवीन तंत्रज्ञानाचे आदान प्रदाण होणो अपेक्षित आहे. त्यासोबतच उत्पादित कृषीमालाला योग्य दर मिळणून देण्यासाठी बाजारपेठेची व्याप्ती वाढवून कृषी उद्योगाला नवी दिशा देताना शेतकऱ्यांना अन्न प्रक्रीया उद्योगाकडे वळविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यातर्फे बुधवारी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर नाशिक जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार नरहरी ङिारवाळ, डॉ.राहुल आहेर, सीमा हिरे, देवयानी फरांदे, जिल्हा परिषद अध्यक्ष शितल सांगळे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते, आत्माचे संचालक सुभाष खेमनर, कृषि सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम जगताप, अशोक कांबळे आदी उपस्थित होते. झगडे म्हणाले, प्रक्रीया केलेले अन्न खाण्याकडे नागरिकांचा कल वाढतो आहे. ही चांगली संधी समजून शेतकऱ्यांनी शेतमालाचे उत्पादन घ्यावे आणि एकित्रत येऊन त्यावर प्रक्रीया करावी. त्यासाठी कृषि विभागाला प्रयत्नपूर्वक शेतकऱ्यांची मानिसकता तयार करावी लागेल अशी अपेक्षा झगडे यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ह्यकिडनाशके-ओळख व हाताळणीह्ण या पुस्तकाचे आणि शेतकऱ्यांच्या यशकथेवर आधारीत पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच कृषी क्षेत्रत उलेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी गटांना आणि शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आले.शेंद्रीय शेतीचे 236 स्टॉलकृषी महोत्सवात एकूण 236 स्टॉलची उभारणी करण्यात आली असून यात जिल्ह्यातील शेतकरी बचत गटांनी सहभाग घेतला आहे. त्यांनी सेंद्रीय भाजीपाला, फळे आणि अन्नधान्य या प्रदर्शनातून उपलब्ध करून दिली आहेत. हे प्रदर्शन 25 फेब्रुवारीर्पयत रोज सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकFarmerशेतकरी