शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

शेतीसोबत जोडधंदे स्वीकारण्याची गरज : कृषी महोत्सवातील चर्चासत्राचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 17:41 IST

जागतिक हवामान बदल व बदलचे ऋतूचक्र, शेतीतील नापिकी यासोबतच दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे केवळ शेतीवर अवलंबून राहण्याचे दिवस संपले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापल्या परिसरातील आर्थिक व भौगोलिक परिस्थितीनुसार शेतीसोबत विविध जोडधंदे स्वीकारणे गरजेचे असल्याचा सूर जागतिक कृषी महोत्सवातील चर्चासत्रात शनिवारी (दि. 28) उमटला.

ठळक मुद्देकेवळ शेतीवर अवलंबून राहण्याचे दिवस संपले शेतीसोबत विविध जोडधंदे स्वीकारणे गरजेचेकृषी महोत्सवातील चर्चासत्रात तज्ज्ञांनी व्यक्त केले मत

नाशिक : जागतिक हवामान बदल व बदलचे ऋतूचक्र, शेतीतील नापिकी यासोबतच दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे केवळ शेतीवर अवलंबून राहण्याचे दिवस संपले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापल्या परिसरातील आर्थिक व भौगोलिक परिस्थितीनुसार शेतीसोबत विविध जोडधंदे स्वीकारणे गरजेचे असल्याचा सूर जागतिक कृषी महोत्सवातील चर्चासत्रात शनिवारी (दि. 28) उमटला.अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि स्वामी समर्थ कृषी विकास आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर सुरू असलेल्या जागतिक कृषी महोत्सवाच्या चौथ्या दिवशी ह्यकृषीमाल प्रक्रिया उद्योग व जोड व्यवसायातील संधीह्ण या चर्चासत्रात मुळशी येथील अभिनव फार्मर्स क्लबचे ज्ञानेश्वर बोडके व टेक्नॉलॉजी सायन्स फॉर सोसायटी संस्थेच्या डॉ. शीतल सोमाणी यांनी सहभागी होत शेतकरी व कृषी शाखेच्या विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ज्ञानेश्वर बोडके म्हणाले, ज्या शेतकऱ्यांनी शेतीसोबत जोडधंद्याचा मार्ग स्वीकारला त्यांनी आर्थिक संपन्नतेकडे वाटचाल केली आहे. त्यामुळे अन्य शेतकऱ्यांनीही त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार आणि आपली भौगोलिक परिस्थिती विकसित होऊ शकणारा व्यवसाय करण्याचे आवाहनही त्यांनी केले. तर शेती आणि शेतकरी टिकून राहण्यासाठी व शेती क्षेत्रचा उत्कर्ष साधण्यासाठी कृषीमाल प्रक्रिया उद्योग आणि जोडधंदे या दोन्हींची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत डॉ. शीतल सोमाणी यांनी व्यक्त केले. दरम्यान, शुक्रवारपासून कृषी महोत्सवांतर्गत वसविण्यात आलेल्या बाराबलुतेदार गावास व कृषी प्रदर्शनास मोठय़ा संख्येने शेतकरी व नागरिकांनी भेट दिली. शनिवारी वीकेण्डमुळे भेट देणाऱ्यांच्या संख्येत आणखी भर पडल्याचे दिसून आले.

भारुडांनी जिंकली मनेकृषी महोत्सवात शनिवारी सायंकाळच्या सत्रत कृषीविषयक सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत मनोरंजनासोबत प्रबोधनही केले. चंदाबाई तिवाडी यांच्या भारुडांनी सर्वाची मने जिंकली. यावेळी त्र्यंबकेश्वरच्या समर्थ गुरुपीठ येथील सेवामार्गाचे केंद्र प्रमुख व कार्यरत सेवेकऱ्यांची मासिक प्रशासकीय बैठक संपल्यानंतर सर्व सेवेकरी कृषी महोत्सवात सहभागी झाल्याने कृषी प्रदर्शनाचा परिसर गर्दीने फुलून गेला होता.रविवारी समारोपडोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर बुधवारपासून सुरू असलेल्या कृषी महोत्सवाचा रविवारी (दि.29) युवा महोत्सव व सरपंच मांदियाळीने समारोप होणार आहे. यावेळी चंद्रपूरचे चंदू पाटील मारकवार, यशदाचे शरद बुरटे पाटील, हिवरे बाजारचे पोपटराव पवार उपस्थित सरपंच व शेतक:यांना मार्गदर्शन करणार आहेत.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रNashikनाशिकagricultureशेतीFarmerशेतकरी