शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

शेतीसोबत जोडधंदे स्वीकारण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 01:13 IST

जागतिक हवामान बदल व बदलचे ऋतूचक्र, शेतीतील नापिकी यासोबतच दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे केवळ शेतीवर अवलंबून राहण्याचे दिवस संपले आहेत. त्यामुळे शेतकºयांनी आपापल्या परिसरातील आर्थिक व भौगोलिक परिस्थितीनुसार शेतीसोबत विविध जोडधंदे स्वीकारणे गरजेचे असल्याचा सूर जागतिक कृषी महोत्सवातील चर्चासत्रात शनिवारी (दि. २८) उमटला.

नाशिक : जागतिक हवामान बदल व बदलचे ऋतूचक्र, शेतीतील नापिकी यासोबतच दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे केवळ शेतीवर अवलंबून राहण्याचे दिवस संपले आहेत. त्यामुळे शेतकºयांनी आपापल्या परिसरातील आर्थिक व भौगोलिक परिस्थितीनुसार शेतीसोबत विविध जोडधंदे स्वीकारणे गरजेचे असल्याचा सूर जागतिक कृषी महोत्सवातील चर्चासत्रात शनिवारी (दि. २८) उमटला.अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि स्वामी समर्थ कृषी विकास आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर सुरू असलेल्या जागतिक कृषी महोत्सवाच्या चौथ्या दिवशी ‘कृषीमाल प्रक्रिया उद्योग व जोड व्यवसायातील संधी’ या चर्चासत्रात मुळशी येथील अभिनव फार्मर्स क्लबचे ज्ञानेश्वर बोडके व टेक्नॉलॉजी सायन्स फॉर सोसायटी संस्थेच्या डॉ. शीतल सोमाणी यांनी सहभागी होत शेतकरी व कृषी शाखेच्या विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ज्ञानेश्वर बोडके म्हणाले, ज्या शेतकºयांनी शेतीसोबत जोडधंद्याचा मार्ग स्वीकारला त्यांनी आर्थिक संपन्नतेकडे वाटचाल केली आहे. त्यामुळे अन्य शेतकºयांनीही त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार आणि आपली भौगोलिक परिस्थिती विकसित होऊ शकणारा व्यवसाय करण्याचे आवाहनही त्यांनी केले. तर शेती आणि शेतकरी टिकून राहण्यासाठी व शेती क्षेत्राचा उत्कर्ष साधण्यासाठी कृषीमाल प्रक्रिया उद्योग आणि जोडधंदे या दोन्हींची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत डॉ. शीतल सोमाणी यांनी व्यक्त केले. दरम्यान, शुक्रवारपासून कृषी महोत्सवांतर्गत वसविण्यात आलेल्या बाराबलुतेदार गावास व कृषी प्रदर्शनास शेतकरी व नागरिकांनी भेट दिली. शनिवारी वीके ण्डमुळे भेट देणाºयांच्या संख्येत आणखी भर पडल्याचे दिसून आले.

टॅग्स :Farmerशेतकरी