शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मास्क जवळच, पण वापरणार नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 23:15 IST

नाशिक : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होताच शहरात कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येने शहर हादरले आहेत. मात्र, अशा स्थितीत नागरिक आरोग्याबाबत नियमांचे पालन करण्यास तयार नाही. मास्क असूनदेखील ते तोंडावर लावणाऱ्यास टाळाटाळ करणाºया पाचशे नागरिकांना अडवून महापालिकेला ताकीद द्यावी लागली आहे.

ठळक मुद्दे निष्काळजी नागरिकांना ताकीद : ७३ जणांकडून चौदा हजारांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होताच शहरात कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येने शहर हादरले आहेत. मात्र, अशा स्थितीत नागरिक आरोग्याबाबत नियमांचे पालन करण्यास तयार नाही. मास्क असूनदेखील ते तोंडावर लावणाऱ्यास टाळाटाळ करणाºया पाचशे नागरिकांना अडवून महापालिकेला ताकीद द्यावी लागली आहे. याशिवाय अशाच प्रकारे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाºया पाचशे जणांनादेखील मनपा कर्मचाऱ्यांनी समज दिली आहे. याशिवाय मास्क न वापरणाºयांकडून गेल्या दोन ते तीन दिवसांत तब्बल दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. विशेषत: लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करताना जनजीवन सुरळीत व्हावे हा शासनाचा उद्देश असला तरी असे करताना नागरिकांनी सजगता बाळगावी अशा अटी होत्या तशाच सूचनादेखील करण्यात आल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही. गेल्या ६ जून रोजी महापालिकेने अधिकृतरीत्या बाजारपेठा खुल्या केल्या असल्या तरी फिजिकल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर अनिवार्य होता. मात्र खरेदीसाठी शहरात झुंबड उडाली. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला शिवाय गर्दीतदेखील नागरिक मास्क वापरत नव्हते. त्यामुळे शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत गेली. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने मास्क न वापरणाºयांना दोनशे रुपये दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची कार्यवाही आरोग्य विभाग करीत असून, ७३ नागरिकांकडून चौदा हजार ६०० रुपये वसूल करण्यात आले आहेत.शहरात सार्वजनिक ठिकाणी फिरताना अनेकांकडे मास्क असतो, परंतु तोंडावर लावण्याऐवजी गळ्यात किंवा कानात अडकवून ठेवून निष्काळजीपणे वावरणारे अनेक नागरिक आढळले आहेत, काहींनी तर चक्कखिशात मास्क ठेवले आहेत. त्यातील सुमारे पाचशे नागरिकांना मनपाच्या आरोग्य निरीक्षकांनी ताकीद दिली आहे. अशाच प्रकारे गर्दीच्या ठिकाणीदेखील फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाºयांनादेखील ताकीद देण्यात आली आहे. शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना आता नागरिकांनीदेखील काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना नागरिकांनीदेखील आरोग्य विषयक शिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे. अनेक नागरिक मास्क वापरत नाहीत आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे देखील पालन करत नाही. त्यामुळे त्यांना समज देण्यात आली आहे.- डॉ. कल्पना कुटे, संचालक, घनकचरा व्यवस्थापन.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या