शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:29 IST

‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत शिवसेना-भाजपा युतीने सत्ता मिळवली, मात्र तीन वर्षे झाली तरी सरकारने आश्वासने न पाळता फसव्या घोषणा करत खोट्या जाहिरातीचा सपाटा लावला आहे. जनता आता त्यांच्या खोटारडेपणाला कंटाळली असून, सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरत हल्लाबोल आंदोलन पुकारले आहे. जनता आता या सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहाणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी दिंडोरी येथे केले.

ठळक मुद्देतीन वर्षे झाली तरी आश्वासने न पाळता फसव्या घोषणा सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी तहसील कार्यालयावर मोर्चा

दिंडोरी : ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत शिवसेना-भाजपा युतीने सत्ता मिळवली, मात्र तीन वर्षे झाली तरी सरकारने आश्वासने न पाळता फसव्या घोषणा करत खोट्या जाहिरातीचा सपाटा लावला आहे. जनता आता त्यांच्या खोटारडेपणाला कंटाळली असून, सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरत हल्लाबोल आंदोलन पुकारले आहे. जनता आता या सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहाणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी दिंडोरी येथे केले.  गेल्या तीन वर्षांपासून सत्तेवर असलेले भाजपा-शिवसेना युती सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. अनेक पोकळ आश्वासने देऊन युती सरकारने जनतेची फसवणूक केलेली आहे. सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. त्यावेळी तटकरे बोलत होते. दुपारी साडेबाराच्या दरम्यान दिंडोरी-नाशिक-कळवण रस्त्यावरील येथील वृंदावन गार्डन येथून भव्य हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व तटकरे यांनी केले. मोर्चात कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार जयंत जाधव, दीपिका चव्हाण, जयंत जाधव, माजी आमदार दिलीप बनकर, संजय चव्हाण, माजी खासदार देवीदास पिंगळे, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, कृउबा सभापती दत्तात्रेय पाटील, महिला आघाडी अध्यक्ष प्रेरणा बलकवडे, भारती पवार, रंजन ठाकरे, प्रकाश वडजे, गजानन शेलार, बाळासाहेब जाधव, भास्कर भगरे, राजेंद्र उफाडे, अविनाश जाधव, सचिन देशमुख, डॉ. योगेश गोसावी, श्याम हिरे, गंगाधर निखाडे, कैलास मवाळ आदींसह हजारो कार्यकर्ते सुमारे चार किलोमीटर पायी मोर्चात सहभागी झाले. मोर्चात काही शेतकरी बैलगाडीसह सहभागी झाले होते. ढोलताशांच्या गजरात सरकार विरोधात घोषणा देत एक तासाने हल्लाबोल मोर्चा दिंडोरी तहसील कार्यालयावर धडकला. तेथे सभा होत सर्वच नेत्यांनी आपल्या भाषणात शिवसेना-भाजपा युतीच्या सरकारच्या कारभारावर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना तटकरे यांनी राज्य व केंद्रातील शिवसेना-भाजपा युतीच्या कारभारावर जोरदार टीका केली. गेल्या तीन वर्षांपासून सत्तेवर असलेले भाजपा-शिवसेना युती सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. अनेक पोकळ आश्वासने देऊन युती सरकारने जनतेची फसवणूक केलेली आहे. शेतकरी, शेतमजूर, कामगार, लहान व्यावसायिक, शिक्षक, डॉक्टरांसह सर्वच क्षेत्रांमध्ये युती सरकारबद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. नोटबंदीसारख्या निर्णयामुळे देशाची व राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. शेती व शेतकºयांचे प्रश्न, विजेच्या समस्या, महागाई, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, रस्त्यांच्या समस्या, उद्योग, रोजगारात झालेली घसरण, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न, ढासळलेली शिक्षण व्यवस्था, आरोग्याच्या समस्या, कुपोषण यासारख्या विविध समस्यांवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यात येऊन जनतेच्या समस्या न सुटल्यास राष्ट्रवादी अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. सरकारच्या कारभाराचा पंचनामा करण्यासाठी ग्रामीण भागासह शहरी भागातही राष्ट्रवादी आंदोलन करणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विविध मागण्यांचे तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांना निवेदन दिले. यावेळी पोलीस उपअधीक्षक देवीदास पाटील, पाटील आदींनी चोख बंदोबस्त ठेवला. मोर्चा रस्त्याचे एक बाजूने सुरू असल्याने वाहतूक संथगतीने सुरू होती. १२ डिसेंबरला विधानभवनावर हल्लाबोल सरकारने ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत सत्ता मिळविलेल्या शिवसेना-भाजपा युतीच्या सरकारने जनतेची फसवणूक केली असून, या सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नागपूर अधिवेशनावर हल्लाबोल मोर्चा नेण्यात येणार असल्याचे आमदार सुनील तटकरे यांनी सांगितले. सुनील तटकरे म्हणाले.....नार-पार योजना आमच्या सरकारच्या काळात महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी आखली; परंतु गुजरातच्या नेत्यांच्या इशाºयावर खाली माना घालत भाजपाचे नेते महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्याचे पाप करत आहेत. त्याच्याविरु द्ध हल्लाबोल करण्याशिवाय पर्याय नाही. सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून, मुख्यमंत्री रोज कर्जमाफीबाबत चुकीचे आकडे देत फसवणूक करत असून, उपस्थितांमध्ये कुणाला तरी कर्जमाफी मिळाली का, असा सवाल करत जर कुणाला मिळाली असेल तर त्यांचा मी लाभार्थी म्हणून फोटो लावू. शेतकºयांबाबत हे सरकार उदासीन असून, एवढे शेतकरी आत्महत्या करत असताना सांत्वन करण्यासाठी सरकारचे मंत्री जात नाही ही शोकांतिका आहे. राज्यातील रस्ते खड्ड्यातआमदार नरहरी झिरवाळ यांनी आपल्या भाषणात सरकारच्या कारभारावर हल्लाबोल करत गेल्या दोन तीन वर्षात रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी निधी न दिल्याने साºया राज्यातील रस्ते खड्ड्यात गेले असून, या सरकारला जनता कंटाळली असल्याचे सांगितले.४सर्वच विकासाच्या योजनांना सरकारने कात्री लावली असून, खोट्या जाहिरातीचा सपाटा लावला असून, आदिवासी विभागाच्या योजनांना निधी कपात करत रेशनवरील धान्यही कमी केले असल्याचे सांगितले़

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस