शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

निसर्गाचा लहरीपणा द्राक्ष उत्पादकांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 00:46 IST

ओझर : ग्रामीण भागात शेवटच्या टप्प्यात रोजचा पडणारा पाऊस द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानकारक ठरण्याच्या मार्गावर आहे. गुरु वारी (दि.१०)ओझर व आसपास भागात झालेला धुवाधार पाऊस त्याचीच अनुभूती देत गेला.

ठळक मुद्देओझर : लांबलेल्या पावसाने द्राक्ष छाटण्या लांबणीवर

ओझर : ग्रामीण भागात शेवटच्या टप्प्यात रोजचा पडणारा पाऊस द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानकारक ठरण्याच्या मार्गावर आहे. गुरु वारी (दि.१०)ओझर व आसपास भागात झालेला धुवाधार पाऊस त्याचीच अनुभूती देत गेला.द्राक्ष उत्पादक बागायतदारांच्या नाशिक जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात बहुतांश भागात छाटण्या सुरू होऊन जातात. त्यात बागलाण पट्ट्यात अर्ली छाटणी मुळे तेथील शेतकऱ्यांनी आॅगस्ट महिन्यांपासून ज्या छाटण्या केल्या होत्या त्यातील बरीच द्राक्षबाग ही सततच्या ढगाळ वातावरणामुळे व पडणाºया पावसाने तेथील बागांमध्ये डावणीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर डोके वर काढत आहे. तर निफाड, चांदवड, दिंडोरी, नाशिक व सिन्नरच्या काही भागांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचा पावसाळा हा लांबल्याने व सुरवातीच्या काळात अपेक्षित पाऊस न पडल्याने या भागातील बागायतदारांमध्ये देखील चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे बागलाण पट्यातील नोव्हेंबरमध्ये सुरू होणारी द्राक्ष निर्यात यंदा पुढे जावू शकते. एकूणच या सर्व उपाययोजना बघता पाऊस आणखी किती दिवस पडतो त्यावर उत्पादन अवलंबून राहील. त्यामुळे मागील वर्षी मोठी आर्थिक झळ बसलेल्या शेतकºयांना यंदा ती भरून निघते की नाही अशी शंका आहे.प्रतिक्रि या...ग्रामीण भागातील बागलाण पट्यात अर्ली प्लॉट मध्ये अनेक ठिकाणी डावणीचा प्रादुर्भाव आहे. तर मुख्य भागात मात्र लांबलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी अद्याप त्या सुरू व्हायच्या आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात छाटण्या एकाच वेळी झाल्यास बाजारात तयार माल मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकºयांनी योग्य उपाय योजना करावी.- गौरव कर्पे, द्राक्ष उत्पादक शेतकरी.

टॅग्स :FarmerशेतकरीNatureनिसर्ग