शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

चिमणी संवर्धनासाठी निसर्ग सेवकांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 01:38 IST

सभोवतालच्या पक्ष्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी निसर्ग सेवक युवा मंच या संस्थेने पुढाकार घेतला असून, चिमणी संवर्धनासाठी संस्थेच्या स्वयंसेवकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्य बाटल्यांचा पुनर्वापर करून त्यापासून जलपात्र तयार करून शहर परिसरातील उद्याने, शासकीय कार्यालयांच्या आवारात ते बसविण्याचे अभियान या संस्थेने हाती घेतले आहे.

ठळक मुद्देजनजागृतीवर भर : जलपात्र, घरटी वाटपास प्राधान्य; टाकाऊ बाटल्यांचा पुनर्वापर

नाशिक : सभोवतालच्या पक्ष्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी निसर्ग सेवक युवा मंच या संस्थेने पुढाकार घेतला असून, चिमणी संवर्धनासाठी संस्थेच्या स्वयंसेवकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्य बाटल्यांचा पुनर्वापर करून त्यापासून जलपात्र तयार करून शहर परिसरातील उद्याने, शासकीय कार्यालयांच्या आवारात ते बसविण्याचे अभियान या संस्थेने हाती घेतले आहे.मुलांना निसर्गाची ओळख ज्या पक्ष्यापासून होते तो पक्षी म्हणजे चिऊताई. चिऊताई सीमेंटच्या जंगलात हरविली असून, या चिऊ ताईला आपल्या अंगणात पुन्हा बोलाविण्यासाठी नाशिककरांकडून प्रयत्न सुरू आहेत. विविध संस्था त्यांच्या पातळीवर विविध उपाययोजना करत आहेत. नाशिककरांनीही आपापल्या परीने प्रयत्न सुरू केले आहेत. असाच काहीसा प्रयत्न नाशिकच्या निसर्ग सेवा युवा मंचने महिनाभरापासून हाती घेतला आहे.या संस्थेच्या सचिव अनुजा कुलकर्णी, विहार चौधरी, कचरू वैद्य आदी स्वयंसेवक मिळून चिमणी संवर्धनासाठी विविध उपाययोजना राबवित आहेत. या संस्थेने सोशल मीडियाच्या माध्यमातून चिमणी संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या माहितीचा प्रचार-प्रसार सुरू केला आहे.यासोबत पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यानात सुमारे २५ ते ३० जलपात्र बसविले आहेत. तसेच अंबड पोलीस ठाण्याच्या पाठीमागेही जलपात्र, मातीचे वाडगे ठेवले आहेत. येत्या पंधरवड्यात बेळगाव ढगा येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लाकडी घरटी बसविण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकNatureनिसर्ग