शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

निसर्ग माहिती केंद्र उरले शोभेपुरतेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 01:21 IST

नाशिक : येथील त्र्यंबक रोडवरील पश्चिम वन विभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच २००३ साली सिंहस्थ कुंभपर्वानिमित्त साकारण्यात आलेले ‘निसर्ग माहिती केंद्र’ सध्या धूळखात पडून आहे. या केंद्राची पूर्णत: रया गेली असून, देखभाल, दुरुस्तीअभावी या वास्तूची दुर्दशा होऊन अवकळा आली आहे. हे माहिती केंद्र मागील काही वर्षांपासून कुलूपबंदच असल्याने केवळ शोभेपुरतेच उरले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या औचित्याने २००३ साली वन विभाग कार्यालयाच्या आवारात निसर्ग माहिती केंद्र उभारण्यात आले होते.

ठळक मुद्देनिधीही मिळेना अन‌् कोणी लक्षही देईना

नाशिक : येथील त्र्यंबक रोडवरील पश्चिम वन विभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच २००३ साली सिंहस्थ कुंभपर्वानिमित्त साकारण्यात आलेले ह्यनिसर्ग माहिती केंद्रह्ण सध्या धूळखात पडून आहे. या केंद्राची पूर्णत: रया गेली असून, देखभाल, दुरुस्तीअभावी या वास्तूची दुर्दशा होऊन अवकळा आली आहे. हे माहिती केंद्र मागील काही वर्षांपासून कुलूपबंदच असल्याने केवळ शोभेपुरतेच उरले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या औचित्याने २००३ साली वन विभाग कार्यालयाच्या आवारात निसर्ग माहिती केंद्र उभारण्यात आले होते.कुंभमेळ्याच्यानिमित्ताने शहरात देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविक, पर्यटकांना नाशिक जिल्ह्याची जैवविविधता आणि निसर्गाची ओळख व्हावी, हा यामागील उद्देश होता. नव्याचे नऊ दिवसांपुरते या केंद्राचे अस्तित्व टिकून राहिले; मात्र काळानुरूप येथील केंद्राचे तीनतेरा वाजले. २०१५ साली झालेल्या कुंभमेळ्यातसुद्धा या केंद्राला लागलेले दुरवस्थेचे ग्रहण दुर्दैवाने सुटू शकले नाही. कुंभमेळा होऊन पाच ते सहा वर्षांचा कालावधी लोटला असून, अद्यापही या केंद्राची अवकळा दूर करण्याकरिता संबंधित विभागाकडून कुठलेही प्रयत्न होत नसल्याने सर्वसामान्यांमध्ये निसर्गप्रेम वाढणार तरी कसे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.लोकोपयोगी विविध विकासकामांवर लाखो ते कोट्यवधी रुपयांचा खर्च शासनाकडून होत असताना जिल्हा प्रशासन किंवा वन विभागाने हे माहिती केंद्र पुन्हा नव्याने अस्तित्वात आणण्याकरिता प्रयत्न केल्याचे अजून तरी दिसून येत नाही. शहरात निसर्गाचा परिचय करून देणारे एकही केंद्र सध्या अस्तित्वात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात हे केंद्र उभारण्यात आलेले असताना केवळ देखभाल, दुरुस्तीअभावी पश्चिम वन विभागीय कार्यालयातील माहिती केंद्राला अवकळा प्राप्त झाली, हे विशेष!निधीही मिळेना अन‌् कोणी लक्षही देईना२००३ साली उभारण्यात आलेल्या हे निसर्ग माहिती केंद्र पुन्हा नव्याने सुरू करण्याकरिता भल्या मोठ्या निधीची आवश्यकता भासणार आहे, असे नाही; मात्र मागील आठ ते दहा वर्षांमध्ये या केंद्राला आलेली अवकळा दूर करण्याकरिता कोणत्याही अधिकाऱ्याने लक्ष दिले नाही. पश्चिम वन विभागीय कार्यालयातून नाशिक जिल्ह्याच्या आठ ते नऊ वनपरिक्षेत्रांचे नियंत्रण केले जाते; मात्र याच कार्यालयाच्या आवारात असलेली ही लोकोपयोगी वास्तू दुर्लक्षित राहिल्याने संताप व्यक्त होत आहे. 

टॅग्स :forest departmentवनविभागNashikनाशिक