शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

कंपन्यांकडून नाशिककरांची फसवणूक : 'नेटवर्क' हवाय, मग बाल्कनीत बसा किंवा टेरेसवर जा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 14:19 IST

मोबाईल नेटवर्क पुरविणाऱ्या नामांकित कंपन्यांकडून ‘४जी’च्या नावाखाली नाशिककरांची एकप्रकारे लूट केली जात आहे. ग्राहकांना जलद इंटरनेट वापरण्यासाठी घरामधून दारात किंवा अंगणात बसण्याची वेळ येत आहे.

ठळक मुद्देउपनगरांमध्ये तर घरात प्रवेश करताच मोबाईलचे नेटवर्क सिग्नल गायब ४जी सेटींग्ज; ‘०.१४केबी’चा वेगमोबाईल नेटवर्कची बोंबाबोंब असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप

नाशिक : सर्वोत्कृष्ट, सर्वोत्तम, सुपरफास्ट इंटरनेट, नेटवर्क अशी जाहितरात करत मोबाईल नेटवर्क पुरविणाऱ्या नामांकित कंपन्यांकडून ‘४जी’च्या नावाखाली नाशिककरांची एकप्रकारे लूट केली जात आहे. ग्राहकांना जलद इंटरनेट वापरण्यासाठी घरामधून दारात किंवा अंगणात बसण्याची वेळ येत आहे. महापालिकेच्या हद्दीतील काही उपनगरांमध्ये तर घरात प्रवेश करताच मोबाईलचे नेटवर्क सिग्नल गायब होत असल्याचा अनुभव येत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.शहरात हजारो लोक स्मार्टफोनचा वापर करु लागले आहे. प्रत्येक व्यक्ती अधिक दिवसांचा कालावधी मिळविण्यासाठी किमान पाचशे रुपयांचा इंटरनेटचा रिचार्ज करतो. ५०० रुपयांमध्ये दररोज एक किंवा दीड जीबी डेटा वापराची परवानगी देत एकूण ८४ ते ९० दिवसांचा कालावधी कंपन्यांकडून दिला जातो; मात्र या कालावधीत ग्राहकांना डेटाचा स्पीड मिळविताना दमछाक करावी लागत आहे. रात्रीच्यावेळी काही भागांमध्ये तर सिग्नल येत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. अशोका मार्ग सारख्या परिसरात सोसायट्यांमध्ये प्रवेश करताच मोबाईलची ‘रेंज’ गायब होते. तसेच शरणपूररोड, गंगापूररोड, डिसूजा कॉलनी, इंदिरानगर, गोविंदनगर, सिडको, उपनगर आदि भागांमध्ये ‘इनडोअर’ मोबाईलची रेंज उपलब्ध होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.नाशिक महापालिका क्षेत्रात २० किलोमीटरच्या परिसरात मोबाईल नेटवर्कची बोंबाबोंब असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शहरात मोबाईल नेटवर्कची अशी अवस्था असेल तर ग्रामिण भागात ‘कनेक्टिवीटी’ची काय अवस्था असेल? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मोबाईल कंपन्यांकडून नेटवर्क टॉवरच्या फ्रेक्वेन्सीची अवस्था तपासून त्यामध्ये योग्य ती तांत्रिक दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे. डेटाचा स्पिड मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्राहक तक्रार निवारणासाठी वारंवार कंपनीच्या ग्राहक सेवा अधिका-यांशी संपर्क साधूनदेखील उपयोग होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले‘०.१४केबी’चा वेगइंटरनेटची ४जी सेटींग्ज  केल्यानंतर ‘०.१४ ते ०.८३केबी’चास्पीड मिळत असल्याने नेटवर्कची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नेटवर्कमध्ये सुधारणा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

टॅग्स :NashikनाशिकMobileमोबाइलInternetइंटरनेट