शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

कंपन्यांकडून नाशिककरांची फसवणूक : 'नेटवर्क' हवाय, मग बाल्कनीत बसा किंवा टेरेसवर जा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 14:19 IST

मोबाईल नेटवर्क पुरविणाऱ्या नामांकित कंपन्यांकडून ‘४जी’च्या नावाखाली नाशिककरांची एकप्रकारे लूट केली जात आहे. ग्राहकांना जलद इंटरनेट वापरण्यासाठी घरामधून दारात किंवा अंगणात बसण्याची वेळ येत आहे.

ठळक मुद्देउपनगरांमध्ये तर घरात प्रवेश करताच मोबाईलचे नेटवर्क सिग्नल गायब ४जी सेटींग्ज; ‘०.१४केबी’चा वेगमोबाईल नेटवर्कची बोंबाबोंब असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप

नाशिक : सर्वोत्कृष्ट, सर्वोत्तम, सुपरफास्ट इंटरनेट, नेटवर्क अशी जाहितरात करत मोबाईल नेटवर्क पुरविणाऱ्या नामांकित कंपन्यांकडून ‘४जी’च्या नावाखाली नाशिककरांची एकप्रकारे लूट केली जात आहे. ग्राहकांना जलद इंटरनेट वापरण्यासाठी घरामधून दारात किंवा अंगणात बसण्याची वेळ येत आहे. महापालिकेच्या हद्दीतील काही उपनगरांमध्ये तर घरात प्रवेश करताच मोबाईलचे नेटवर्क सिग्नल गायब होत असल्याचा अनुभव येत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.शहरात हजारो लोक स्मार्टफोनचा वापर करु लागले आहे. प्रत्येक व्यक्ती अधिक दिवसांचा कालावधी मिळविण्यासाठी किमान पाचशे रुपयांचा इंटरनेटचा रिचार्ज करतो. ५०० रुपयांमध्ये दररोज एक किंवा दीड जीबी डेटा वापराची परवानगी देत एकूण ८४ ते ९० दिवसांचा कालावधी कंपन्यांकडून दिला जातो; मात्र या कालावधीत ग्राहकांना डेटाचा स्पीड मिळविताना दमछाक करावी लागत आहे. रात्रीच्यावेळी काही भागांमध्ये तर सिग्नल येत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. अशोका मार्ग सारख्या परिसरात सोसायट्यांमध्ये प्रवेश करताच मोबाईलची ‘रेंज’ गायब होते. तसेच शरणपूररोड, गंगापूररोड, डिसूजा कॉलनी, इंदिरानगर, गोविंदनगर, सिडको, उपनगर आदि भागांमध्ये ‘इनडोअर’ मोबाईलची रेंज उपलब्ध होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.नाशिक महापालिका क्षेत्रात २० किलोमीटरच्या परिसरात मोबाईल नेटवर्कची बोंबाबोंब असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शहरात मोबाईल नेटवर्कची अशी अवस्था असेल तर ग्रामिण भागात ‘कनेक्टिवीटी’ची काय अवस्था असेल? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मोबाईल कंपन्यांकडून नेटवर्क टॉवरच्या फ्रेक्वेन्सीची अवस्था तपासून त्यामध्ये योग्य ती तांत्रिक दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे. डेटाचा स्पिड मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्राहक तक्रार निवारणासाठी वारंवार कंपनीच्या ग्राहक सेवा अधिका-यांशी संपर्क साधूनदेखील उपयोग होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले‘०.१४केबी’चा वेगइंटरनेटची ४जी सेटींग्ज  केल्यानंतर ‘०.१४ ते ०.८३केबी’चास्पीड मिळत असल्याने नेटवर्कची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नेटवर्कमध्ये सुधारणा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

टॅग्स :NashikनाशिकMobileमोबाइलInternetइंटरनेट