शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी-सेनेत काट्याची टक्कर

By admin | Updated: February 10, 2017 23:08 IST

महिला राज येणार : सभापतिपदासाठी गणांमध्ये वाढली चुरस

 नितीन बोरसे  सटाणाबागलाण तालुक्यातील वीरगाव गट व गण हे अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झाल्याने येथे साहजिकच महिला राज येणार आहे. भाजपाचा हक्काचा हा गट गेल्या दशकापासून कॉँग्रेसच्या ताब्यात आहे. या निवडणुकीत शिवसेना, भाजपा, कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराने रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने येथे पंचरंगी सामना रंगण्याची चिन्ह दिसत असले तरी खरी लढत शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्येच दिसून येत आहे.वीरगाव गट, कंधाणे गण, वीरगाव गण या निवडणुकीत अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्याने अनेक मातब्बरांचा हिरमोड होऊन त्यांना सोयीस्कर गट शोधावा लागला आहे. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रा. अनिल पाटील हे या गटाचे नेतृत्व करत होते. हा गट राखीव झाल्याने प्रा. पाटील यांनी ठेंगोडा गटात पत्नी सारिका यांना उमेदवारी देऊन उतरविले आहे. हा गट तसा भाजपाचा बालेकिल्ला परंतु गेल्या दहा वर्षांपूर्वी कॉँग्रेसचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी सभापती यशवंत पाटील यांनी पत्नी संगीता यांना मैदानात उतरवून हा गट हस्तगत केला होता. गेल्या निवडणुकीतही कॉँग्रेसचे प्रा. पाटील यांनी हा गड राखला. या निवडणुकीत हा गट राखीव झाला असला तरी तिकिटासाठी अंतिम क्षणी अनेक राजकीय उलथापालथ झाल्याचे बघायला मिळाले. भाजपाने गेलेला गट मिळविण्यासाठी इलेक्टिव्ह मेरिटचा आग्रह धरून आदर्श गाव किकवारी खुर्दच्या सरपंच मंजुळाबाई कैलास जहागीरदार (सोनवणे) यांच्या नावाला पसंती दिली होती. मात्र ऐनवेळी दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी गट हस्तक्षेप करून जहागीरदार यांचे तिकीट कापून शिवसेनेच्या कार्यकर्त्या व खासदार चव्हाण यांची भाची साधना गवळी यांना उमेदवारी बहाल केली. चव्हाण यांच्या जातीय राजकारणामुळे सुमारे साडेचौदा हजार भिल्ल समाजाचे मतदार जहागीरदार यांचे तिकीट कापल्यामुळे नाराज झाल्याची सर्वत्र चर्चा आहे. तिकीट कापल्यामुळे जहागीरदार यांच्यासारखा मोठा उमेदवार शिवसेनेच्या गळाला लागला आहे. राष्ट्रवादी र्कांग्रेसमध्येही असेच महाभारत घडले. पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सदस्य वीरेश घोडे यांनी पत्नी वंदना यांना उमेदवारी मिळविण्यासाठी सुरुवातीला भाजपाकडून प्रयत्न केले; मात्र तेथे घोडेंची नाकाबंदी केल्याने त्यांनी तत्काळ राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पुन्हा स्वगृही परतले आणि तिकिटासाठी दावेदारी केली; त्यांना ज्याची भीती होती तेच घडले. येथेही त्यांचे तिकीट कापून व्यक्तिगत दुश्मनी काढल्याचा घोडे यांचा आरोप आहे. राष्ट्रवादीने घोडे यांना उमेदवारी नाकारून जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभापती व देवळ्याचे रहिवासी उषा बच्छाव यांना आयात करून उमेदवारी बहाल केली.