शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
2
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
3
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
4
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
5
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
6
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
7
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
8
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
9
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
10
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
11
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
12
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
13
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
14
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
15
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
16
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
17
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
18
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
19
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
20
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना

राष्ट्रवादी-सेनेत काट्याची टक्कर

By admin | Updated: February 10, 2017 23:08 IST

महिला राज येणार : सभापतिपदासाठी गणांमध्ये वाढली चुरस

 नितीन बोरसे  सटाणाबागलाण तालुक्यातील वीरगाव गट व गण हे अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झाल्याने येथे साहजिकच महिला राज येणार आहे. भाजपाचा हक्काचा हा गट गेल्या दशकापासून कॉँग्रेसच्या ताब्यात आहे. या निवडणुकीत शिवसेना, भाजपा, कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराने रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने येथे पंचरंगी सामना रंगण्याची चिन्ह दिसत असले तरी खरी लढत शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्येच दिसून येत आहे.वीरगाव गट, कंधाणे गण, वीरगाव गण या निवडणुकीत अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्याने अनेक मातब्बरांचा हिरमोड होऊन त्यांना सोयीस्कर गट शोधावा लागला आहे. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रा. अनिल पाटील हे या गटाचे नेतृत्व करत होते. हा गट राखीव झाल्याने प्रा. पाटील यांनी ठेंगोडा गटात पत्नी सारिका यांना उमेदवारी देऊन उतरविले आहे. हा गट तसा भाजपाचा बालेकिल्ला परंतु गेल्या दहा वर्षांपूर्वी कॉँग्रेसचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी सभापती यशवंत पाटील यांनी पत्नी संगीता यांना मैदानात उतरवून हा गट हस्तगत केला होता. गेल्या निवडणुकीतही कॉँग्रेसचे प्रा. पाटील यांनी हा गड राखला. या निवडणुकीत हा गट राखीव झाला असला तरी तिकिटासाठी अंतिम क्षणी अनेक राजकीय उलथापालथ झाल्याचे बघायला मिळाले. भाजपाने गेलेला गट मिळविण्यासाठी इलेक्टिव्ह मेरिटचा आग्रह धरून आदर्श गाव किकवारी खुर्दच्या सरपंच मंजुळाबाई कैलास जहागीरदार (सोनवणे) यांच्या नावाला पसंती दिली होती. मात्र ऐनवेळी दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी गट हस्तक्षेप करून जहागीरदार यांचे तिकीट कापून शिवसेनेच्या कार्यकर्त्या व खासदार चव्हाण यांची भाची साधना गवळी यांना उमेदवारी बहाल केली. चव्हाण यांच्या जातीय राजकारणामुळे सुमारे साडेचौदा हजार भिल्ल समाजाचे मतदार जहागीरदार यांचे तिकीट कापल्यामुळे नाराज झाल्याची सर्वत्र चर्चा आहे. तिकीट कापल्यामुळे जहागीरदार यांच्यासारखा मोठा उमेदवार शिवसेनेच्या गळाला लागला आहे. राष्ट्रवादी र्कांग्रेसमध्येही असेच महाभारत घडले. पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सदस्य वीरेश घोडे यांनी पत्नी वंदना यांना उमेदवारी मिळविण्यासाठी सुरुवातीला भाजपाकडून प्रयत्न केले; मात्र तेथे घोडेंची नाकाबंदी केल्याने त्यांनी तत्काळ राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पुन्हा स्वगृही परतले आणि तिकिटासाठी दावेदारी केली; त्यांना ज्याची भीती होती तेच घडले. येथेही त्यांचे तिकीट कापून व्यक्तिगत दुश्मनी काढल्याचा घोडे यांचा आरोप आहे. राष्ट्रवादीने घोडे यांना उमेदवारी नाकारून जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभापती व देवळ्याचे रहिवासी उषा बच्छाव यांना आयात करून उमेदवारी बहाल केली.