शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयावर राष्टवादीची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:15 IST

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वडपे ते धुळे रस्त्यावरील खड्डे आठ दिवसांत भरण्यात येतील. खड्डे न भरल्यास आठ दिवसांनंतर टोल बंद करू आणि अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत मिळवून देऊ, असे तोंडी आश्वासन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प अधिकारी प्रशांत खोडसकर यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांना दिले.

नाशिक : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वडपे ते धुळे रस्त्यावरील खड्डे आठ दिवसांत भरण्यात येतील. खड्डे न भरल्यास आठ दिवसांनंतर टोल बंद करू आणि अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत मिळवून देऊ, असे तोंडी आश्वासन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प अधिकारी प्रशांत खोडसकर यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांना दिले. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वरील वडपे ते धुळे या चौपदरी रस्त्याची दुरवस्था झाली असून, गेल्या आठवड्यात घोटीजवळ खड्ड्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महामार्गावरील खड्डे बुजविण्यात यावे तोपर्यंत टोल बंद करण्यात यावा यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या कार्यालयात जवळपास दीड तास ठिय्या मांडला.  यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वरील वडपे (जि. ठाणे) ते धुळे हा मार्ग बीओटीद्वारे चौपदरी करण्यात आलेला असूनही त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडून या रस्त्याची चाळण झालेली आहे. कल्याण फाटा ते वडपे या लांबीतील रस्त्याचीदेखील अशीच दुर्दशा झालेली असून, त्यामुळे या महामार्गावर अपघात होत आहेत. त्यामुळे जोपर्यंत टोल कंपन्यांकडून हा रस्ता सुस्थितीत केला जात नाही तोपर्यंत या रस्त्यावरील टोल तत्काळ बंद करावा. येत्या आठ दिवसांत या रस्त्याची सुधारणा न झाल्यास राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्या वतीने टोल बंद पाडला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले, माजी आमदार जयवंतराव जाधव, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, बाळासाहेब कर्डक, मुख्तार शेख, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, धनंजय निकाळे, हिरामण खोसकर, सुषमा पगारे, समीना मेमन, किशोरी खैरनार, संजय खैरनार, बाळासाहेब गिते, सुरेखा निमसे, दादा कापडणीस, पूनम शहा, ज्ञानेश्वर पवार आदी उपस्थित होते.आंदोलनकर्त्यांसमवेत चर्चायावेळी प्राधिकरणचे अधिकारी प्रशांत खोडसकर यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून आठ दिवसांत रस्त्यावरील खड्डे भरले जातील अन्यथा टोल बंद केला जाईल, असे लेखी व तोंडी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :tollplazaटोलनाकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस